देशातील २७२ मान्यवरांचे खुले पत्र, पत्रातून राहुल गांधींचा जाहीर निषेध

नवी दिल्ली : २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेसची निवडणुकीतील पराभवाची रेषा सातत्याने खाली उतरते आहे. विविध प्रयत्नांनंतरही काँग्रेसला विजय मिळवता आलेला नाही. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी वोटचोरीचा मुद्दा उपस्थित केला आणि निवडणूक आयोग तसेच मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप केले. राहुल गांधींच्या या आरोपांवर देशभरातील बुद्धीवंतांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर २७२ नामवंत विचारवंतांनी एक खुलं पत्र लिहित, राहुल गांधी यांच्या आरोपांवर कडवट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या पत्रात, बुद्धीवंतांनी म्हटले आहे की, "आम्ही भारतीय लोकशाहीवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे चिंतित आहोत." त्यांनी असेही सांगितले की, "राजकीय मंडळी लोकांचे मन भडकवण्याऐवजी तथ्यहीन आरोप करून फुकटचे राजकारण करत आहेत."


या पत्रामध्ये बुद्धीवंतांनी निवडणूक आयोगावर झालेल्या आरोपांवर आपली नाराजी व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, "आता निवडणूक आयोगासारख्या महत्त्वाच्या संस्थेवर आरोप करून त्याची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात आहे." याशिवाय, भारतीय सैन्याच्या शौर्याबद्दल शंका उपस्थित करणे, न्यायव्यवस्थेची निष्पक्षता आणि संसद व घटनात्मक पदांवर बसलेल्या व्यक्तींविषयी शंका घेणे हे लोकशाहीसाठी घातक ठरू शकते. बुद्धीवंतांनी निवडणूक आयोगाच्या इमानदारीची आणि प्रतिष्ठेची वकिली केली असून, संस्थेने षडयंत्रकारकांच्या विरोधात तडजोड न करता आपली इमाने आणि प्रतिष्ठा जपणे आवश्यक असल्याचे सांगितले.


सामाजिक आणि राजकीय असंतोषाचा सामना करत असताना, याप्रकारचे आरोप देशाच्या राजकीय व लोकशाही प्रक्रियेवर नकारात्मक प्रभाव टाकू शकतात, असे बुद्धीवंतांचे मत आहे.

Comments
Add Comment

Nashik : नवीन वीज जोडण्यांसाठी सुमारे ₹४,००० कोटींची तरतूद, उद्योगांसाठी नवीन वीज जोडणीचा खर्च महावितरण करणार

Nashik : राज्यात नवीन वीज जोडण्यांसाठी सुमारे ₹४,००० कोटींची तरतूद करण्यात आली असून, उद्योगांसाठी नवीन वीज जोडणीचा

Nashik : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या 'सूर्य रथाला' नाशिकमध्ये प्रारंभ, ७ दिवस शहराच्या विविध भागात होणार जनजागृती

Nashik : देशात स्वच्छ आणि परवडणाऱ्या ऊर्जेला चालना देणाऱ्या ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजने’ची (Pradhan Mantri Surya Ghar Free

Digpal Lanjekar's 'Daryabhavani' Movie : 'श्री शिवराज अष्टक'मधील सातवे चित्रपुष्प 'दर्याभवानी'; दमदार टीझरने वाढवली उत्सुकता!

मुंबई : लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या बहुचर्चित 'श्री शिवराज अष्टक' (Shivraj Ashtak) चित्रपट मालिकेतील सातवे

FIFA World Cup : FIFA वर्ल्ड कपच्या नावाखाली कोट्यवधींचा ऑनलाइन सट्टा! नाशिक सायबर पोलिसांची धडक कारवाई; 5 ताब्यात

FIFA World Cup : सध्या जगभरात फिफा फुटबॉल वर्ल्ड कपचा उत्साह सुरु आहे. याचाच गैरफायदा घेत ऑनलाइन सट्टा चालवणाऱ्या

TET Paper Leaked : शिक्षक भरतीला पुन्हा धक्का! परीक्षेच्या एक दिवस आधीच टीईटीचा पेपर लीक, उद्याची परीक्षा तात्पुरती स्थगित

ठाणे : राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला मोठा धक्का बसला आहे. ठाण्यात शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपर फुटल्याची

Venezuela Earthquakes : ढिगाऱ्याखालून चक्क १८ दिवसाच्या बाळाची सुखरूप सुटका; बचावपथकाची मोठी कामगिरी

व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भीषण भूकंपानंतर दिलासादायक बातमी समोर आली आहे. ला ग्वायरा परिसरात कोसळलेल्या