महापालिकेच्या निवडणुकीआधीच मुंबईतला राष्ट्रवादीचा चेहरा पडला

मुंबई : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे. लवकरच महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याच्या शक्यता आहे. याआधीच अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचा मुंबईतला चेहरा असलेले नवाब मलिक कायद्याच्या कचाट्यात अडकले आहेत.


राज्यात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी ३ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे. एकूण ६,८५९ जागांसाठी मतदान होणार आहे. २८८ नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदासाठी थेट पद्धतीने निवडणूक होईल. नगरपालिकांसाठी दोन सदस्यीय प्रभाग पद्धत तर नगरपंचायतींसाठी एक सदस्यीय प्रभाग पद्धत आहे. नगरपालिकांमध्ये मतदारांना नगराध्यक्षपदासाठी एक तर प्रभागासाठी दोन अशी तीन मते द्यावी लागणार आहेत. नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्ष व सदस्यपदासाठी प्रत्येकी एक अशी दोन मते द्यावी लागतील. मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याच्या शक्यता आहे. याआधीच नवाब मलिक यांच्यावर मुंबई सत्र न्यायालयाच्या अंतर्गत पीएमएलए न्यायालयामध्ये आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आरोप निश्चित करण्यात आले. यामुळे नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.


नवाब मलिक यांच्यावर डी कंपनीच्या हसीना पारकर, सलीम पटेल आणि १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सरदार खान यांच्याशी संगनमत करून बळकावलेल्या मालमत्तेच्या आर्थिक गैरव्यवहारात सहभाग असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. सर्व आरोपींविरुद्ध पुरेसे पुरावे आहेत; असेही ईडीच्यावतीने न्यायालयात सांगण्यात आले. पीएमएलए कायद्याच्या कलम ३,४ आणि १७ अंतर्गत आरोप निश्चित करण्यात आले. नवाब मलिक यांनी आरोप फेटाळले आहेत. आता पीएमएलए न्यायालयात नवाब मलिक यांच्या विरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू होणार आहे. जर पुरवणी आरोपपत्र दाखल झालं तर दाऊद किंवा दाऊदशी संबंधित आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.


नवाब मलिक यांना २०२२ मध्ये अटक झाली होती. तब्येतीच्या कारणामुळे सध्या नवाब मलिक जामिनावर आहेत. नवाब मलिक यांनी डी कंपनीच्या हसीना पारकर, सलीम पटेल आणि १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सरदार खान यांच्याशी संगनमत करून गोवावाला कम्पाउंडमधील मुनीरा प्लंबर या महिलेची तीन एकर जमीन कट रचून बळकावल्याचा आरोप आहे. या प्रकरणी १९ डिसेंबर २०२५ रोजी पुढील सुनावणी होणार आहे. त्यानंतर दैनंदिन सुनवणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

IndiGo Airlines Crisis: सरकार अ‍ॅक्शन मोडवर ! डीजीसीएकडून सीईओ पीटर इलिबर्स यांना उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स

मुंबई: इंडिगो एअरलाईन्स (Interglobe Aviation Limited) कंपनीचे सीईओ पीटर इलिबर्स यांना सरकारने चौकशीसाठी तत्काळ समन्स बजावले आहे.

संगमनेर येथील 'पोकळी हिस्से' नोंदीचा प्रश्न मार्गी

नागपूर : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील इंदिरा नगर भागात सर्वे

पुण्यात पोर्शे कार अपघात प्रकरणी पोलिसांविरोधात मोठी कारवाई

पुणे : पुण्याच्या कल्याणीनगर भागात १९ मे २०२४ रोजी पोर्शे कारचा अपघात झाला होता. पोर्शे कारने अश्विनी कोस्टा आणि

नाशिक - पुणे रेल्वे मार्गात बदल, अहिल्यानगरचे नागरिक नाराज

नागपूर : कित्येक वर्षांपासून बहुचर्चित नाशिक - पुणे लोहमार्ग होण्याच्या दिशेने गंभीरपणे हालचाली सुरू झाल्या

दीपावलीला युनेस्कोचा दर्जा; सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी सभागृहात केले निवेदन

नागपूर : युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत दीपावलीचा समावेश करण्यात आल्याने भारतीय संस्कृतीचा जगभर

महाराष्ट्रात बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांचा गंभीर प्रश्न; नागपूर अधिवेशनात आमदार सोनवणे यांनी वेधले लक्ष, 'राज्य आपत्ती' घोषित करण्याची मागणी

नागपूर : महाराष्ट्रात बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे आणि त्यांच्या मानवी वस्तीत घुसून होणाऱ्या जीवघेण्या