राज्यात अनेक जिल्ह्यांना आज थंडीचा इशारा

मुंबई : राज्यात सर्वदूर तापमानाचा पारा कमालीचा घसरला आहे. गेले अनेक दिवस थंडीचा कडाका कायम असून मंगळवारी (दि. १८ नोव्हेंबर) राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. धुळे येथे ६.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद मंगळवारी झाली. सांताक्रूझ कोकणातील अलिबाग, रत्नागिरी, डहाणू भागातही थंडी वाढली आहे.


राज्यात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रवाह वाढले आहेत. त्यामुळे कोरड्या वाऱ्यांचा परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर होताना दिसून येत आहे. परिणामी राज्यात पुढील दोन दिवस थंडीचा कडाका आणखी वाढणार आहे. विशेषत° मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील तापमानात घसरण होणार असून थंडी वाढणार आहे. राज्यातील जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड , हिंगोली या जिल्ह्यात मंगळवारी थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.


अनेक जिल्ह्यांमधील कमाल आणि किमान तापामानात वेगाने घट होत आहे. उन्हाळ्यात प्रचंड तापणाऱ्या विदर्भात देखील किमान तापमान यवतमाळ येथे ९.६ अंश सेल्सिअस तर, गोंदिया येथे १० अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले. गेल्या दोन दिवसांत राज्यातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंद धुळे तसेच जेऊर येथे ८ अंश सेल्सिअस इतकी झाली आहे.


नोव्हेंबरचा दुसरा आणि तिसरा आठवडा चांगलाच गारठवणारा ठरला. त्यामुळे ग्रामीण भागातच नाही तर शहरातही रात्रीच्या वेळी रस्त्यांवर ठिकठिकाणी मजूर, कष्टकरी थंडीपासून बचावासाठी शेकोट्यांचा आधार घेत आहेत. आतापर्यंत रात्री ते पहाटेपर्यंत जाणवणारी थंडी आता दिवसाही जाणवत आहे.


राज्यात पुढील दोन दिवस थंडीची तीव्रता अधिक जाणवणार आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत काम करणाऱ्यांनी थंडीपासून वाचण्याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. राज्यात नोव्हेंबर महिन्याचा पहिला आठवडा संपल्यानंतर अचानक थंडीत वाढ झाली. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडीचा जोर वाढला असल्याचे हवामान विभागाने सांगितले.

Comments
Add Comment

विस्तारित मेट्रो लाईन ५- ठाणे,भिवंडी,उल्हासनगरमधील कनेक्टिविटी अधिक सक्षम, ‘मुंबई इन मिनिट्स’ संकल्पनेला मोठी गती

मुंबई :मुंबई महानगर प्रदेशातील कनेक्टिविटी अधिक मजबूत करण्याच्या दिशेने मेट्रो लाईन ५ हा महत्त्वाचा प्रकल्प

Nitesh Rane Water Metro : पहिली 'वॉटर मेट्रो' मुंबईत दाखल !

मंत्री नितेश राणे यांनी दिली खुशखबर; 'कॅन्डेला पी-१२' बोटीच्या चाचण्यांना जूनमध्ये सुरुवात मुंबई : मुंबईकरांचा

Mhada : म्हाडाच्या घरांसाठी शुक्रवारपर्यंत अर्ज करता येणार

आतापर्यंत ८७ हजार २३९ अर्ज, तर ६१,१५३ अनामत रक्कमेसह अर्ज दाखल मुंबई : म्हाडाच्या २६४० घरांसाठी अर्ज करण्याची

Water Management : तलावांमध्ये १७ टक्केच पाणीसाठा शिल्लक

पाणी जपून वापरण्याचे मुंबईकरांना आवाहन मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये फक्त २,५८,४१० द. श. लि.

Nashik :नाशिकच्या TCS मध्ये कॉर्पोरेट जिहाद तर मुंबईत बँक जिहाद ? नरिमन पॉइंटच्या शाखेतील धक्कादायक घटना

मुंबई : नाशिकच्या TCS मधील कॉर्पोरेट जिहादचे प्रकरण उजेडात आले, पोलिसांनी गुन्हे नोंदवले आणि कायदेशीर कारवाई सुरू

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध – मंत्री नितेश राणे

मुंबई  : महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना