एका नरभक्षक बिबट्याचा शेवट; दुसऱ्या बिबट्यालाही ठार करण्याची परवानगी

कोपरगाव : कोपरगाव तालुक्यात दहशत माजवणाऱ्या व दोन जिवांचे बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला अखेर ठार करण्यात आले. शनिवारी मध्यरात्री धारणगाव शिवारात वन विभागाच्या पथकाने त्याला गोळ्या घातल्याची माहिती सहायक उपवनरक्षक गणेश मिसळ आणि वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश रोडे यांनी दिली.


गेल्या आठवड्यात तीन वर्षांची नंदिनी चव्हाण आणि नंतर शांताबाई निकोले या ६० वर्षीय महिलेचा मृत्यू या बिबट्याच्या हल्ल्यात झाला होता. सलग हल्ल्यांमुळे संतापलेल्या नागरिकांनी दोनदा रास्ता रोको करत प्रशासनावर दबाव आणला होता. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बिबट्याला ठार मारण्यास परवानगी दिली. पुण्यातून बोलावण्यात आलेल्या दोन शूटरांनी ही कारवाई केली.


नाशिक विभागाचे मुख्य वनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी संपूर्ण बंदोबस्त उभारला होता. वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल आणि रेस्क्यू टीमने सलग अनेक दिवस मेहनत घेऊन ऑपरेशन यशस्वी केले. या कार्याबद्दल परिसरात समाधान व्यक्त होत आहे.


तथापि, परिसरात इतर काही बिबट्यांमुळे अजूनही पशुधनावर हल्ले होत असल्याने त्यांच्याही बंदोबस्ताची मागणी आता जोर धरत आहे.


दरम्यान, अहमदनगर शहराजवळील निंबळक शिवारात लहान मुलगी आणि आठ वर्षांच्या मुलावर हल्ला करणाऱ्या दुसऱ्या बिबट्याच्या संदर्भातही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. गाव बंद ठेवावे लागले होते, तर नागरिकांनी रास्ता रोको करत या बिबट्याला ठार करण्याची मागणी केली होती. विविध पथकांचे प्रयत्न, पिंजरे लावूनही हा बिबट्या सतत चकवत असल्याने जिल्हा उपवनसंरक्षकांनी त्याला ठार मारण्याचा प्रस्ताव मुख्य वन्यजीव रक्षक विभागाकडे पाठवला होता. या प्रस्तावाला रात्री मंजुरी मिळाली असून आदेश ३१ डिसेंबरपर्यंत लागू राहणार आहेत.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : सुमार कामगिरी करणाऱ्यांना मुख्यमंत्री देणार नारळ?

- मंत्रिमंडळात फेरबदलांचे संकेत; चांगले काम करणाऱ्या मंत्र्यांचे 'प्रमोशन' मुंबई : महायुती सरकारमध्ये सुमार

Chandrashekhar Bawankule : ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजने’साठी ९१ विधानसभा मतदारसंघांत 'सह अध्यक्षां'ची नेमणूक; महसूलमंत्री बावनकुळेंचा निर्णय

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी जिव्हाळ्याच्या असलेल्या ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजने’च्या

Narendra Modi : सीईटीए' करारामुळे शेतकरी, उद्योजक आणि एमएसएमईंना नवी गती : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यातील 'सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार' आणि ऐतिहासिक 'सामाजिक

Jaykumar Gore : सोलापूर-मुंबई विमानसेवा २ ऑगस्टपासून पुन्हा सुरू होणार, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पाठपुराव्याला यश

सोलापूर : सोलापूर विमानतळावरून २८ जून पासून बंद असलेली सोलापूर ते मुंबई विमानसेवा स्टार एअरलाईन कंपनीकडून २

PoK : पाकिस्तानी सैनिकांच्या गोळीबारात PoK मध्ये 12 नागरिकांचा मृत्यू

मुझफ्फराबाद : पाकिस्तानव्याप्त काश्मीर (POK)मध्ये सरकारविरोधी आंदोलन अधिक तीव्र झाले असून, मंगळवारी आंदोलक आणि

Harbour Line Block : हार्बर मार्गावर चार दिवस मध्यरात्री विशेष ट्रॅफिक ब्लॉक

काही लोकल सेवा रद्द; प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना मुंबई : मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरीय रेल्वे