एका नरभक्षक बिबट्याचा शेवट; दुसऱ्या बिबट्यालाही ठार करण्याची परवानगी

कोपरगाव : कोपरगाव तालुक्यात दहशत माजवणाऱ्या व दोन जिवांचे बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला अखेर ठार करण्यात आले. शनिवारी मध्यरात्री धारणगाव शिवारात वन विभागाच्या पथकाने त्याला गोळ्या घातल्याची माहिती सहायक उपवनरक्षक गणेश मिसळ आणि वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश रोडे यांनी दिली.


गेल्या आठवड्यात तीन वर्षांची नंदिनी चव्हाण आणि नंतर शांताबाई निकोले या ६० वर्षीय महिलेचा मृत्यू या बिबट्याच्या हल्ल्यात झाला होता. सलग हल्ल्यांमुळे संतापलेल्या नागरिकांनी दोनदा रास्ता रोको करत प्रशासनावर दबाव आणला होता. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बिबट्याला ठार मारण्यास परवानगी दिली. पुण्यातून बोलावण्यात आलेल्या दोन शूटरांनी ही कारवाई केली.


नाशिक विभागाचे मुख्य वनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी संपूर्ण बंदोबस्त उभारला होता. वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल आणि रेस्क्यू टीमने सलग अनेक दिवस मेहनत घेऊन ऑपरेशन यशस्वी केले. या कार्याबद्दल परिसरात समाधान व्यक्त होत आहे.


तथापि, परिसरात इतर काही बिबट्यांमुळे अजूनही पशुधनावर हल्ले होत असल्याने त्यांच्याही बंदोबस्ताची मागणी आता जोर धरत आहे.


दरम्यान, अहमदनगर शहराजवळील निंबळक शिवारात लहान मुलगी आणि आठ वर्षांच्या मुलावर हल्ला करणाऱ्या दुसऱ्या बिबट्याच्या संदर्भातही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. गाव बंद ठेवावे लागले होते, तर नागरिकांनी रास्ता रोको करत या बिबट्याला ठार करण्याची मागणी केली होती. विविध पथकांचे प्रयत्न, पिंजरे लावूनही हा बिबट्या सतत चकवत असल्याने जिल्हा उपवनसंरक्षकांनी त्याला ठार मारण्याचा प्रस्ताव मुख्य वन्यजीव रक्षक विभागाकडे पाठवला होता. या प्रस्तावाला रात्री मंजुरी मिळाली असून आदेश ३१ डिसेंबरपर्यंत लागू राहणार आहेत.

Comments
Add Comment

जेम पोर्टलवरून शालेय वस्तुंची खरेदी करताच काँग्रेसला लागल्या मिरच्या

- शालेय वस्तूंची खरेदी निविदेची चौकशी करण्याची केली मागणी - मुलांना वस्तूंचे वाटप वेळेत होऊ नये यासाठी

World Environment Day 2026 : कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंड येथे होणार १६ हजार वृक्षांची लागवड

- शुक्रवारी ५ जून २०२६ रोजी सकाळी ८ वाजता या उपक्रमाचा शुभारंभ - मुंबईकर नागरिकांनी या वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी

Aamir Khan : आमिर खानची तिसऱ्या लग्नाची तयारी ; चर्चांवर आमिर खानची प्रतिक्रिया

मुंबई : वयाच्या ६१ व्या वर्षी आमिर खान तिसऱ्यांदा लग्न बंधनात अडकणार आहे अशी घोषणा त्याने स्वतःह एका मुलाखती

Wipro Office Religious Harassment : TCS नंतर आता विप्रोही वादाच्या भोवऱ्यात? धर्म बदलण्यास नकार दिल्याने नोकरी गमवावी लागली; पुण्यातील माजी कर्मचारीचा गंभीर आरोप

पुणे : नाशिकमधील TCS कार्यालयात कथित धार्मिक छळ आणि धर्मांतराच्या दबावाच्या आरोपांनंतर आता पुण्यातील आयटी कंपनी

Shrirampur ATS Raid : पाकिस्तानी गँगस्टरच्या सोशल मीडिया नेटवर्कचा महाराष्ट्रात शिरकाव? श्रीरामपूरमध्ये ATS ची मोठी कारवाई, चार जण ताब्यात

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात मोठी कारवाई करत चार संशयितांना

Minister Makarand Jadhav-Patil : राज्यात नवे पुनर्वसन धोरण येणार

मंत्री मकरंद जाधव-पाटील; कालानुरूप सर्व बदल समाविष्ट करणार मुंबई : राज्यातील दरडप्रवण गावांचे कायमस्वरूपी