स्टेट बँकेने रचला नवा इतिहास: आज बाजार भांडवल ९ ट्रिलियन पार केले, ठरली पहिली पीएसयु बँक 'यासाठी'

मोहित सोमण: आज एसबीआयने (State Bank of India SBI) मोठी ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे. बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच बँकेच्या बाजार भांडवलात (Market Capitalisation) ९ ट्रिलियन रूपयांची पातळी पार केली आहे. त्यामुळे ९ ट्रिलियन पातळी पार केलेली ६ वी भारतीय संस्था (Organisation) ठरली आहे. आज कंपनीच्या शेअर्समध्ये दुपारी १२.१३ वाजेपर्यंत ०.५४% वाढ होत ९७४.१० रूपये प्रति शेअरवर हा समभाग व्यवहार करत होता. पीएसयु बँक श्रेणीत हा आकडा पार करणारी प्रथम बँक एसबीआय ठरली आहे. यापूर्वी एचडीएफसी व आयसीआयसीआय या बड्या खाजगी बँकांनी हा टप्पा पार केला आहे.


देशातील सर्वात मोठी बँक म्हणून ओळखली जात असलेल्या एसबीआय (State Bank of India SBI) आपला तिमाही निकाल ४ नोव्हेंबरला जाहीर केला होता. बँकेच्या फंडांमेंटल मध्ये जबरदस्त वाढ झाल्याचे आकडेवारीतून दिसून आले होते. बँकेच्या निव्वळ नफ्यात इयर ऑन इयर बेसिसवर ६.४% वाढ झाली असून बँकेच्या निव्वळ व्याज उत्पन्नात (Net Interest Income NII) ३.२८% वाढ नोंदवली गेली होती. प्रामुख्याने बँकेच्या असेट क्वालिटीतही मोठी सुधारणा झाली होती. गेल्या वर्षीच्या तिमाहीतील २०२९४ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत ९% घसरण होत निव्वळ एनपीए (Net Non Performing Assets NPA) १८४६० कोटीवर पोहोचला होता. त्यामुळे निकालानंतर शेअर ५२ आठवड्यातील निचांकी (All time Low) ६७९.६५ पातळीवरून रिबाऊंड होत आज शेअरने ९७६.०० रूपये प्रति शेअर पातळी पार केली आहे. आकडेवारीनुसार ४४% सुधारणा या शेअर्समध्ये झाली असून बँकेच्या आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा झाली होती.


सध्या अस्तित्वात असलेल्या पाच भारतीय कंपन्यांचे बाजारमूल्य ९ ट्रिलियन पेक्षा अधिक आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, टाटा कन्सल्टन्सी, सर्विसेस आणि आयसीआयसीआय बँक हे ₹९ ट्रिलियन पेक्षा जास्त बाजारमूल्य असलेल्या कंपन्यांच्या यादीत आधीपासून समाविष्ट आहेत तर बँकेच्या श्रेणीत एचडीएफसी बँक (१५.२५ ट्रिलियन) आणि आयसीआयसीआय बँक (९.८३ ट्रिलियन) यांचा समावेश होता आता त्यात एसबीआयची भर पडली आहे.

Comments
Add Comment

अमेरिकेचा नेदरलँडवर ९३ धावांनी विजय

नवी दिल्ली  : आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील २१ वा सामना अमेरिका आणि नेदरलँड्स या दोन्ही संघांमध्ये पार

‘नरेगा’ अंतर्गत मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्त्यांना मोठा दिलासा

नवी दिल्ली : ग्रामीण भागातील शेतमाल वाहतूक अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी ‘नरेगा’ अंतर्गत राबविण्यात

जेव्हा झिम्बाब्वे हरते तेव्हा भारत वर्ल्ड चॅम्पियन होतो, यंदाही होणार इतिहासाची पुनरावृत्ती ?

कोलंबो : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये शुक्रवार १३ फेब्रुवारी रोजी ऐतिहासिक घटना घडली. कोलंबोमधील

‘पॉड टॅक्सी’साठी महापालिकांनी आराखडा तयार करावा'

मुंबई : प्रवाशांना घरापासून ते थेट कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून

विरोधी पक्षात बसताच उबाठाच्या नगरसेवकांना आसने टोचू लागली

महापालिका सभागृहातील आसन व्यवस्थेत होणार सुधारणार गटनेत्यांच्या अनौपचारिक बैठकीत प्रशासनाला दिल्या

बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांविरोधात कारवाईला वेग

मुंबई : मुंबई उपनगरचे सहपालक मंत्री गेल्या पाच वर्षापासून सातत्याने बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांच्या