बिहारमध्ये नव्या सरकारच्या हालचालींना वेग; २२ नोव्हेंबरपूर्वी शपथविधीची शक्यता

पटना : बिहारमध्ये नवं सरकार येत्या २२ नोव्हेंबरपूर्वी स्थापन होईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री आणि एलजेपीचे (रामविलास) प्रमुख चिराग पासवान यांनी दिली. त्यांनी सांगितलं की, विधानसभा निवडणुकीत एनडीए आघाडीला मिळालेल्या विजयामुळे सरकार स्थापनेची हालचाल वेगाने सुरू झाली आहे.


बिहार विधानसभेचा कार्यकाळ २२  नोव्हेंबरला संपत असल्याने, त्यापूर्वीच प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी चर्चा सुरू आहे. घटक पक्षांमध्येही मंत्रिमंडळ वाटप आणि पुढील धोरणांवर विचारमंथन सुरू असल्याचं समजतं.


विधानसभेच्या निवडणुकीत एनडीएने अभूतपूर्व यश मिळवत २४३ पैकी २०२ जागांवर विजय मिळवला. भाजप ८९ जागांसह सर्वात मोठा पक्ष झाला तर जेडीयूने ८५ जागा जिंकल्या. लोक जनशक्ती पक्षाने १९, हिंदुस्थानी अवाम मोर्चाने पाच आणि राष्ट्रीय लोक मोर्चाने चार जागांवर विजय मिळवला.


महागठबंधनमधील आरजेडीने २५, काँग्रेसने सहा, सीपीआयएमएलएलने दोन, सीपीआयएम आणि आयआयपीने प्रत्येकी एक जागा जिंकली.


बीएसपीने एक तर एमआयएमने ५ जागांवर विजय मिळवला. नव्या कॅबिनेटमध्ये भाजपचं प्रतिनिधित्व वाढण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रीपदासाठी नितीशकुमार यांचं नाव निश्चित मानलं जात आहे. नव्या मंत्रिमंडळात जेडीयूचे १४ आणि भाजपचे १६ मंत्री असतील तसेच भाजपकडे अनेक महत्त्वाची खाती असतील, असे समजते.

Comments
Add Comment

India - Nepal Border : नेपाळकडून सीमेवर नवीन कडक नियम; भारतीय प्रवाशांवर परिणाम

भारत-नेपाळ सीमेवरील प्रवास आणि व्यवहारांमध्ये मोठे बदल झाले असून नेपाळ सरकारने भारतीय प्रवाशांसाठी नवीन व कडक

Heatwave in Odisha : ओडिशात उष्णतेचा कहर; झारसुगुडा ठरले देशातील सर्वाधिक तापमानाचे शहर

देशात सध्या उष्णतेची तीव्र लाट उसळली असून ओडिशा राज्य या उष्णतेच्या तडाख्यात सापडले आहे. किनारपट्टीपासून ते

Online Gaming Sector : ऑनलाइन गेमिंग क्षेत्रासाठी १ मेपासून नवा कायदा

देशातील वेगाने वाढणाऱ्या ऑनलाइन गेमिंग क्षेत्राला नियमनात आणण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले

Bengal Election 2026 : बंगाल निवडणुकीला हिंसक वळण : कुठे कार्यकर्त्यांवर हल्ले तर कुठे ईव्हीएम वादामुळे वातावरण तापले

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानादरम्यान राज्यात अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना

Share Market Update : जागतिक बाजारपेठांमध्ये कमजोरीची चिन्हे; आशियामध्ये संमिश्र व्यवहार

मुंबई : आज जागतिक बाजारपेठांमध्ये कमजोरीची चिन्हे दिसत आहेत. मागील सत्रात अमेरिकन बाजारपेठा घसरणीसह बंद झाल्या.

Rajnath Singh : भारत भविष्यात इराण-अमेरिका यांच्यात मध्यस्थीची भूमिका निभावू शकतो - राजनाथ सिंह

नवी दिल्ली : जर्मनीच्या तीन दिवसीय दौऱ्यावर गेलेले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी इराण-अमेरिका यांच्यातील