बिहारमध्ये नव्या सरकारच्या हालचालींना वेग; २२ नोव्हेंबरपूर्वी शपथविधीची शक्यता

पटना : बिहारमध्ये नवं सरकार येत्या २२ नोव्हेंबरपूर्वी स्थापन होईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री आणि एलजेपीचे (रामविलास) प्रमुख चिराग पासवान यांनी दिली. त्यांनी सांगितलं की, विधानसभा निवडणुकीत एनडीए आघाडीला मिळालेल्या विजयामुळे सरकार स्थापनेची हालचाल वेगाने सुरू झाली आहे.


बिहार विधानसभेचा कार्यकाळ २२  नोव्हेंबरला संपत असल्याने, त्यापूर्वीच प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी चर्चा सुरू आहे. घटक पक्षांमध्येही मंत्रिमंडळ वाटप आणि पुढील धोरणांवर विचारमंथन सुरू असल्याचं समजतं.


विधानसभेच्या निवडणुकीत एनडीएने अभूतपूर्व यश मिळवत २४३ पैकी २०२ जागांवर विजय मिळवला. भाजप ८९ जागांसह सर्वात मोठा पक्ष झाला तर जेडीयूने ८५ जागा जिंकल्या. लोक जनशक्ती पक्षाने १९, हिंदुस्थानी अवाम मोर्चाने पाच आणि राष्ट्रीय लोक मोर्चाने चार जागांवर विजय मिळवला.


महागठबंधनमधील आरजेडीने २५, काँग्रेसने सहा, सीपीआयएमएलएलने दोन, सीपीआयएम आणि आयआयपीने प्रत्येकी एक जागा जिंकली.


बीएसपीने एक तर एमआयएमने ५ जागांवर विजय मिळवला. नव्या कॅबिनेटमध्ये भाजपचं प्रतिनिधित्व वाढण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रीपदासाठी नितीशकुमार यांचं नाव निश्चित मानलं जात आहे. नव्या मंत्रिमंडळात जेडीयूचे १४ आणि भाजपचे १६ मंत्री असतील तसेच भाजपकडे अनेक महत्त्वाची खाती असतील, असे समजते.

Comments
Add Comment

Chief Minister of Keral : अखेर सस्पेन्स संपला ! केरळमचे मुख्यमंत्री ठरले

Chief Minister of Keral : केरळमधील मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स अखेर संपला असून, काँग्रेसने (Congress ) व्ही. डी. सतीशन यांच्या नावाची

Delhi Bus Rape Case : दिल्ली हादरली! स्लीपर बसमध्ये विवाहित महिलेवर बलात्कार

दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर चर्चेत आली आहे. राजधानीत एका खासगी

Price Hike : सामान्यांच्या खिशाला कात्री; सोनं-चांदी ते दूधाच्या दरात मोठी वाढ

नवी दिल्ली : गेल्या चार दिवसांत देशाच्या आर्थिक आणि वित्तीय क्षेत्रात झपाट्याने घडामोडी घडताना दिसत आहेत.

Maharashtra ATS Launches Massive Crackdown : ATS चा धडाका! पाकिस्तानस्थित 'भट्टी गँग'चे जाळे उखडून फेकले; महाराष्ट्रात ४० ठिकाणी छापे, ५७ जण ताब्यात

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) बुधवारी पहाटेच्या सुमारास संपूर्ण राज्यात एक मोठी शोधमोहीम राबवली.

Uttar Pradesh Storm : उत्तर प्रदेशात निसर्गाचं तांडव! वादळ, मुसळधार पाऊस आणि वीज कोसळून ५६ जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) विविध जिल्ह्यांना बुधवारी भीषण वादळ आणि मुसळधार पावसाने झोडपून काढले. या

Monsoon Rain Update : उकाड्यापासून लवकरच सुटका! अंदमानात पुढच्या ४८ तासांत पावसाच्या सरी कोसळणार!

देशभरात उन्हाचा चटका वाढत असतानाच भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department) एक दिलासादायक बातमी दिली आहे. नैऋत्य