२५ डिसेंबरपासून नवी मुंबई विमानतळावरून इंडिगो आणि अकासा विमानसेवा सुरू

मुंबई : २५ डिसेंबर रोजी नवी मुंबईच्या विमान तळावरून प्रत्यक्षात पहिले व्यवसायिक विमान उड्डाण घेणार आहे. शिवाय प्रत्यक्ष उड्डाणासाठी तिकीट नोंदणीची प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. ही बाब विमान प्रवाशांसाठी दिलासादायक ठरणार आहे. इंडिगोने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशांतर्गत उड्डाणांसाठी सविस्तर योजना जाहीर केली आहे. २५ डिसेंबरपासून, इंडिगो नवी मुंबई विमानतळावरून देशभरातील १० शहरांमध्ये उड्डाणे चालवेल. यामध्ये दिल्ली, बंगळूरु, हैदराबाद, अहमदाबाद, लखनऊ, उत्तर गोवा (मोपा), जयपूर, नागपूर, कोची आणि मंगलोर यांचा समावेश आहे. एअरलाइन हळूहळू इतर शहरांमध्ये उड्डाणे वाढवण्याची योजना
आखत आहे.


एअर इंडियाने नवी मुंबईवरून चालणाऱ्या उड्डाणांसाठी आधीच सविस्तर योजना जाहीर केली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात, एअर इंडिया २० डेली फ्लाइट्स (४० एटीएम) चालवत आहे. अकासा एअरची चार शहरांसाठी थेट फ्लाइट्स: अकासा एअर २५ डिसेंबरपासून नवी मुंबई विमानतळावरून थेट चार भारतीय शहरांना जोडेल. एअरलाइन पहिल्या दिवशी दिल्ली आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान पहिली फ्लाइट चालवेल. नवी मुंबईहून गोवा, कोची आणि अहमदाबादलाही फ्लाइट्स चालवल्या जातील. बुकिंग आधीच सुरू झाले आहे.

Comments
Add Comment

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात एका कॅचमुळे जोरदार राडा! भारतीय खेळाडूंनी पंचांना घेरले

दोहा : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप एमर्जिंग स्पर्धेतील कालच्या (१६ नोव्हेंबर) सामन्यात एका कॅचमुळे

माकडांची मस्ती बेतली तरुणीच्या जीवावर; राजगडावर घडली भयंकर घटना

पुणे : राजगड किल्ला सर करण्यासाठी गेलेल्या मुंबईच्या तरुणीच्या डोक्यात दगड पडल्याने तरुणी जखमी झाली आहे.

विक्रोळीच्या बुद्ध विहारातून भगवान गौतमांची चोरीला गेलेली मूर्ती मिळाली, सीसीटीव्हीच्या सहाय्याने पोलिसांनी केला चोराचा पर्दाफाश

मुंबई: विक्रोळी येथील बुध्द विहारातून भगवान गौतम बुध्दांची पुरातन मूर्ती चोरणाऱ्यांना विक्रोळी पोलिसांनी

विश्वास नांगरे पाटील यांना मातृशोक; मंगल नांगरे पाटील यांचे निधन

मुंबई : महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांना मातृशोक झाला आहे. त्यांच्या मातोश्री

बॉलीवूडचे खलनायक प्रेम चोप्रांची तब्येत स्थिर, लीलावती रुग्णालयातून दिला डिस्चार्ज

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते प्रेम चोप्रा यांची तब्येत बरी नव्हती. वयानुसार

मुलांच्या तिकीट बुकिंगच्या नियमात बदल ५-१२ वर्षे वयादरम्यान तिकिटाचे धोरण ठरणार

मुंबई : भारतीय रेल्वेच्या २०२५ च्या बाल तिकीट धोरणानुसार ५ वर्षांखालील मुले स्वतंत्र बर्थ किंवा सीट न घेता