एआयसह सायबर हल्ले थांबवण्यासाठी येत्या १२ महिन्यात कंपन्या मोठी भरती करणार - अहवाल

प्रतिनिधी: गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात सायबर सिक्युरिटीवर वेळोवेळी तज्ञांनी चिंता व्यक्त केली होती. नैतिकदृष्ट्याही आयटीसह एआय तंत्रज्ञानातील युजरचेच नाही तर एकूण व्यवसायिक कंपन्यांच्या कामकाजातील सायबर सुरक्षाही महत्वाची आहे. आर्थिक व सामाजिक दृष्ट्या एआयचा गैरवापर सुरु असताना आता रूब्रिक झिरो लॅब्स (Rubrik Zero Labs) कडून नवा अहवाल सादर केला आहे. त्यामध्ये महत्वाचे निरीक्षण म्हणजे ९०% भारतीय कंपन्या पुढील १२ महिन्यात डिजिटल आयडिंटी मॅनेजमेंट, आयटी इन्फ्रास्ट्रक्चर, व इतर तांत्रिक प्रकिया सुरक्षित आहेत हे सुनिश्चित करण्यासाठी नवे सायबर सिक्युरिटी एक्स्पर्ट भरती करू शकतात.


मोठ्या प्रमाणात दैनंदिन कामकाजात एआयचा (Artificial Intelligence) वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. नुसतेच ए आय नाही तर एआय एजंटचा वापर वाढल्याने केवळ तांत्रिक दृष्ट्या नाही तर मानवी दृष्टिकोनातून वैयक्तिक ओळख जगाच्या दृष्टीक्षेपात येत आहे. रिपोर्टमधील महत्वाचे निरीक्षण म्हणजे यावेळी कंपन्या पुढील १२ महिन्यात सीआयओ (Chief Information Officer), सीआयएसओ (Chief Information Security Officer CISO) यांची भरती मोठ्या प्रमाणात कंपन्या करू शकतात. कारण यामुळे मोठ्या प्रमाणात कंपनीवर वैयक्तिक सिक्युरिटीसह कंपन्यांच्या माहितीचे संरक्षण करणे हा मुद्दा ऐरणीवर आला आहे.


अहवालावर आपले भाष्य करताना,'हल्लेखोर आता वारंवार मानवी आणि गैर-मानवी ओळखींना (Indentity) लक्ष्य करत आहेत. हा महत्त्वाचा प्रणाली आणि डेटा मिळवण्याचा सर्वात जलद मार्ग आहे, जो भारतीय सायबर संरक्षणाचा चेहरामोहरा मूलभूतपणे बदलत आहे' असे रुब्रिकचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक आणि अभियांत्रिकी प्रमुख आशिष गुप्ता यांनी निवेदनात म्हटले आहे.


वेकफिल्ड रिसर्च (Wakefield Research) संस्थेने हा सर्व्ह घोषित करण्यात आला आहे. भारतासह युएस, युरोप, जपान, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर अशा विभागात हा रिसर्च करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

America Iran war : अमेरिका-इराण संघर्ष शिगेला : सलग सहाव्या रात्री इराणच्या नागरी सुविधांवर अमेरिकेचे जोरदार हल्ले, इराणकडूनही जशास तसे प्रत्युत्तर

वॉशिंग्टन : होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अमेरिका आणि इराण यांच्यात उडालेला भडका आता एका

Nashik Kumbhmela : नाशिकमधील ७० प्रमुख चौकांचा होणार कायापालट; वाहतूक होणार अधिक सुरक्षित

Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुरळीत करण्यासाठी

State Examinations : राज्यातील सर्व परीक्षा ऑनलाइन घेण्यासाठी उच्चस्तरीय समिती

'टीईटी' पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर सरकारचे पाऊल; दोन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई : राज्यात

NCP : पार्थ पवारांना केंद्रात मंत्री करा! राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षांचे सुनेत्रा पवारांना पत्र

पटेल-तटकरे मुख्यमंत्री भेटीमागे हेच पत्र जबाबदार असल्याची

Dhule Crime News : कंपनीवर 'हा' मोठा आरोप करत तरुणाची तापी नदीत उडी, आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडीओ बनवत म्हणाला...

Dhule Crime News : धुळे जिल्ह्यातील शिरपूर जवळील गिधाडे तापी नदीच्या पुलावरून उडी घेतलेल्या तरुणाचा मृतदेह अखेर सापडला

Passive Euthanasia : इच्छामरणासाठी राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांत समित्या स्थापन करणार

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कार्यवाही; खासगी रुग्णालयांचाही समावेश मुंबई : मागील काही वर्षांपासून