उबाठा युवा सेनेतील ३०० कार्यकर्ते शिंदे गटात

मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलताना दिसत आहेत. काही पक्षातील लोक राजीनामे देऊन दुसऱ्या पक्षाची साथ धरताना दिसत आहेत. नुकताच बीड जिल्ह्यात अजित पवार गटाला मोठा धक्का बसल्याचे ताजे असतानाच जळगाव जिल्ह्यातही राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला. शिवसेना उद्धव ठाकरे गटातील अनेक कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.


ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा अत्यंत मोठा धक्काच ठाकरे गटाला म्हणावा लागेल. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटातील युवा सेनेतील महानगर प्रमुख यश इंद्रराज सपकाळे व गजू कोळी यांच्यासह ३०० कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला असून हा अत्यंत मोठा धक्का ठाकरे गटाला आहे.


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत, मंत्री गुलाबराव पाटील व शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे महानगराध्यक्ष संतोष पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत असल्याचे कार्यकर्त्यांनी म्हटले. आगामी निवडणुकीत शिवसेना शिंदे गटांच्या संघटनेला या प्रवेशाने बळकटी मिळाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता हा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.


आगामी काळात पक्षाचे संघटन अधिकाधिक मजबूत करू असे आश्वासन यावेळी नवनियुक्त शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी दिले आहे. यामुळेच आगामी काळातील निवडणुकांमध्ये शिंदे गटाची ताकद जळगाव जिल्ह्यांत बघायला मिळेल. आगामी निवडणुकीत पक्षाची ताकद वाढवण्याची सर्वच राजकीय पक्षांकडून प्रयत्न केली जात आहेत. राज्यात महायुती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये असणार की नाही? हे स्पष्ट झाले नाहीये.

Comments
Add Comment

Women's Day : जागतिक महिला दिनानिमित्त राज्यात ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहीमेचा शुभारंभ

- आरोग्य क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान मुंबई : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सार्वजनिक आरोग्य

मध्य रेल्वेवर रविवारी 'मेगाब्लॉक'

मुंबई (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रविवारी

पश्चिम रेल्वेच्या ४ विशेष सुपरफास्ट गाड्या!

मुंबई (प्रतिनिधी) : प्रवाशांची वाढती गर्दी आणि प्रवासाची मागणी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने वांद्रे, अहमदाबाद,

टाटा हॉस्पिटलचा कॅन्सरविरुद्ध डिजिटल लढा

मुंबई (प्रतिनिधी) : कर्करोगाच्या वाढत्या रुग्णसंख्येचे प्रमाण पाहता, भारतातील कोट्यवधी लोकांची तपासणी करणे

मुंबईत पाण्याची समस्या, नगरसेवकांनी सुरु झाली रडारड

स्थायी समितीत विशेष सभेचे आयोजन करण्याचे अध्यक्षांचे आश्वासन मुंबई : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व

सिध्दार्थ रुग्णालयाच्या इमारतीचा पुनर्विकास संथगतीने, महापौरांनी व्यक्त केली नाराजी

मुंबई :  गोरेगाव (पश्चिम) येथील सिद्धार्थ रुग्णालयाच्या पुनर्विकास प्रकल्पाची महापौर रितू तावडे यांनी अचानक