उबाठा युवा सेनेतील ३०० कार्यकर्ते शिंदे गटात

मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलताना दिसत आहेत. काही पक्षातील लोक राजीनामे देऊन दुसऱ्या पक्षाची साथ धरताना दिसत आहेत. नुकताच बीड जिल्ह्यात अजित पवार गटाला मोठा धक्का बसल्याचे ताजे असतानाच जळगाव जिल्ह्यातही राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला. शिवसेना उद्धव ठाकरे गटातील अनेक कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.


ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा अत्यंत मोठा धक्काच ठाकरे गटाला म्हणावा लागेल. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटातील युवा सेनेतील महानगर प्रमुख यश इंद्रराज सपकाळे व गजू कोळी यांच्यासह ३०० कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला असून हा अत्यंत मोठा धक्का ठाकरे गटाला आहे.


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत, मंत्री गुलाबराव पाटील व शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे महानगराध्यक्ष संतोष पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत असल्याचे कार्यकर्त्यांनी म्हटले. आगामी निवडणुकीत शिवसेना शिंदे गटांच्या संघटनेला या प्रवेशाने बळकटी मिळाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता हा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.


आगामी काळात पक्षाचे संघटन अधिकाधिक मजबूत करू असे आश्वासन यावेळी नवनियुक्त शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी दिले आहे. यामुळेच आगामी काळातील निवडणुकांमध्ये शिंदे गटाची ताकद जळगाव जिल्ह्यांत बघायला मिळेल. आगामी निवडणुकीत पक्षाची ताकद वाढवण्याची सर्वच राजकीय पक्षांकडून प्रयत्न केली जात आहेत. राज्यात महायुती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये असणार की नाही? हे स्पष्ट झाले नाहीये.

Comments
Add Comment

‘पॉड टॅक्सी’साठी महापालिकांनी आराखडा तयार करावा'

मुंबई : प्रवाशांना घरापासून ते थेट कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून

विरोधी पक्षात बसताच उबाठाच्या नगरसेवकांना आसने टोचू लागली

महापालिका सभागृहातील आसन व्यवस्थेत होणार सुधारणार गटनेत्यांच्या अनौपचारिक बैठकीत प्रशासनाला दिल्या

बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांविरोधात कारवाईला वेग

मुंबई : मुंबई उपनगरचे सहपालक मंत्री गेल्या पाच वर्षापासून सातत्याने बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांच्या

मध्य, हार्बरसह पश्चिम रेल्वेवर ब्लॉक

खारबाव येथील नियोजित रात्रकालीन मेगाब्लॉक रद्द मुंबई (प्रतिनिधी) : रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि

कांजूरमार्ग कारशेडच्या जागेबाबत खासगी विकासकांची याचिका फेटाळली

मुंबई : ‘स्वामी समर्थ नगर – विक्रोळी मेट्रो ६’ मार्गिकेच्या कारशेडसाठी हस्तांतरित करण्यात आलेल्या कांजूरमार्ग

Water Metro Project: मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार; लवकरच सुरु होणार 'जल मेट्रो प्रकल्प'

मुंबई: मुंबईच्या दैनंदिन वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची लवकरच सुटका होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. खासदार