महाराष्ट्रात येतेय देशातील पहिली पॉड टॅक्सी! सरकारकडून ग्रीन सिग्नल

मुंबई : काही दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतातील पहिली पॉड टॅक्सी महाराष्ट्रात सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे वाहतूक कोंडीपासून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून मुंबई आणि उपनगरांतील प्रवास अधिक सोपा होणार आहे.


हा प्रकल्प एमएमआरडीएतर्फे राबवला जाणार असून लवकरच सुरूवात होणार आहे. पॉड टॅक्सी ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर शहरांना जोडणार असून, या तिन्ही शहरांमध्ये देशातील पहिली पॉड टॅक्सी सेवा सुरू केली जाणार आहे. सध्या या भागांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या तीव्र आहे. त्यामुळे पॉड टॅक्सी सुरू झाल्यानंतर या तिन्ही शहरांमधील प्रवास अधिक सहज आणि वेळेवर करता येणार आहे.


हा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत घेतला गेला, जिथे अधिकाऱ्यांनी पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) मॉडेलअंतर्गत या प्रकल्पाला मंजुरी दिली. या प्रणालीमध्ये स्वयंचलित, उंचावर धावणाऱ्या पॉड टॅक्सीचा समावेश असेल. ही टॅक्सी प्रमुख शहरी मार्गांवर थेट आणि पॉइंट-टू-पॉइंट कनेक्टिव्हिटी देण्यासाठी डिझाईन करण्यात आली आहे, ज्यामुळे पारंपरिक रस्ते वाहतुकीवरील अवलंबित्व कमी होणार आहे.


एमएमआरडीएने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाची प्राथमिक तपासणी पूर्ण झाली असून लवकरच अंतिम अहवाल तयार केला जाणार आहे. पीपीपी मॉडेलमुळे प्रकल्पाचे काम अधिक जलद आणि कार्यक्षमतेने पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.


या पॉड टॅक्सीची वैशिष्ट्ये अशी की, ही टॅक्सी पूर्णपणे स्वयंचलित असून केबल-ऑपरेटेड प्रणालीवर चालेल. मेट्रो आणि रेल्वेने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी लास्ट माइल कनेक्टिव्हिटीचा हा उत्तम पर्याय ठरणार आहे. यामुळे मुंबई आणि उपनगरांतील वाहतूक कोंडीमध्ये मोठी घट होणार आहे.

Comments
Add Comment

महापरिनिर्वाण दिनी नामांतराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर; सत्ताधाऱ्यांची सकारात्मक प्रतिक्रिया

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर स्थानकाच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा

नियोजित कामं सुरळीत पार पडली तर पुढील महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे आपण लोकार्पण करु- मुख्यमंत्री

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम नियोजित

गोरेगाव-सांताक्रूझ दरम्यान आज रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक नाही मुंबई : पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या

वांद्रे-वर्सोवा सी लिंकवरील जोड मार्गाच्या कामाला गती

आतापर्यंत २२ टक्के काम पू्र्ण मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य

Mahaparinirvan Din: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या विविधतेला एकत्र बांधणारे संविधान दिले - राज्यपाल आचार्य देवव्रत

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीमुळे भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था -- मुख्यमंत्री

चैत्यभूमीवर गर्दी टाळण्यासाठी दादरमधील वाहतुकीत बदल

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर गर्दी लक्षात घेता वाहतूक