IND vs SA Test : अवघ्या तीन दिवसांत भारताचा पराभव, मालिकेत पिछाडी, गुवाहाटीत ‘करो या मरो’ सामना

कोलकाता : ईडन गार्डन्सवरील पहिली कसोटी अवघ्या तीन दिवसांत संपली. भारताला अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला. दमदार गोलंदाजी करुनही भारतीय फलंदाजांनी निराश केले, परिणामी दक्षिण आफ्रिकेने दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. आता मालिकेत परतण्यासाठी गुवाहाटीतील दुसरी कसोटी भारतासाठी निर्णायक ठरणार आहे.


टॉस जिंकून फलंदाजी घेण्याचा निर्णय पाहुण्यांना अंगलट आला. भारतीय गोलंदाजांनी अफलातून मारा करत आफ्रिकन संघाला १५९ धावांत गुंडाळले. कोणताही फलंदाज अर्धशतक गाठू शकला नाही. एडन मार्करमने ३१ धावांसह सर्वाधिक धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराहने २७ धावांत ५ बळी घेतले.


यानंतर दक्षिण आफ्रिकेने भारताचा पहिला डाव २०० पेक्षा कमी धावांत गुंडाळला. के.एल. राहुलने ३९ धावांची सर्वोच्च खेळी केली. सुंदर (२९), जाडेजा (२७) आणि पंत (२७) यांनी चांगली सुरुवात करूनही मोठी खेळी केली नाही. कर्णधार शुभमन गिल दुखापतीमुळे फक्त ४ धावांवर रिटायर्ड हर्ट झाला. भारताचा डाव १८९ धावांवर संपला आणि ३० धावांची आघाडी मिळाली. आफ्रिकेकडून सायमन हार्मरने ४ आणि मार्को जान्सेनने ३ बळी घेतले.


दुसऱ्या डावातही भारतीय गोलंदाजांनी आफ्रिकेचा डाव मोडून काढला. ९१ वरच त्यांचे सात गडी बाद झाले. जाडेजाने मार्करम, मुल्डर, डी झोरजी आणि स्टब्सला बाद करत आफ्रिकेची वाटचाल थांबवली. तथापि, कर्णधार टेम्बा बावुमाने जबरदस्त जिद्द दाखवत संघाला सावरले. कॉर्बिन बॉशसोबत ४४ धावांची भागीदारी करीत त्याने नाबाद ५५ धावा केल्या. अखेरीस दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव १५३ धावांवर आटोपला. जाडेजाने भारताकडून पुन्हा ४ बळी घेतले.



भारताचा दुसरा डाव : १२४ धावांचे सोपे लक्ष्य, पण फलंदाजांचे घसरले पाय


पहिल्या डावातील ३० धावांच्या आघाडीनंतर भारतासमोर १२४ धावांचे साधारण लक्ष्य होते. मात्र सुरुवातीलाच जान्सेनने यशस्वी जयस्वाल आणि के.एल. राहुलला स्वस्तात बाद करून भारताला धक्का दिला. त्यानंतर जुरेल, जाडेजा आणि सुंदर यांनाही मोठी भागीदारी करणे जमले नाही. हार्मरच्या फिरकीने भारताचे चक्र विस्कटले.


भारताने २३व्या षटकात ५० धावांचा टप्पा ओलांडला तरी मधल्या फळीने सलग चुका केल्या. सुंदर (३१) बाद झाल्यानंतर दडपण वाढतच गेले. जाडेजालाही हार्मरने पायचीत केले. अखेरीस भारताचा डाव कोलमडत गेला आणि दक्षिण आफ्रिकेने पहिला कसोटी सामना ३० धावांनी जिंकला.

Comments
Add Comment

टीम इंडिया 'यशस्वी', रो'Hit' चा विक्रम, विशाखापट्टणममध्ये भारताने साजरा केला मालिका विजय

विशाखापट्टणम : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात विशाखापट्टणम येथे झालेला निर्णायक एकदिवसीय सामना भारताने

भारताने दक्षिण आफ्रिकेचा डाव ४८ व्या षटकात गुंडाळला, जिंकण्यासाठी हव्या २७१ धावा

विशाखापट्टणम : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात विशाखापट्टणम येथे निर्णायक एकदिवसीय सामना सुरू आहे. हा सामना

आयपीएलमध्ये विदेशी खेळाडूंना मिळणार केवळ १८ कोटीच!

लिलावापूर्वीच बीसीसीआयच्या नियमांचा अनेक खेळाडूंना फटका मुंबई  : आयपीएल २०२६ च्या मिनी लिलावाची सध्या तयारी

इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची विराटला ७ वर्षांनी संधी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना ६ डिसेंबर

टी-२० सामन्याची तिकीट विक्री सुरू असताना चाहत्यांवर लाठीचार्ज

कटक : भारतात क्रिकेट केवळ एक खेळ नसून तो धर्म आहे. या शब्दाची सत्यता पुन्हा एकदा ओडिशातील कटक शहरात सिद्ध झाली. ९

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण