बांगलादेशी, रोहिंग्यांच्या घुसखोरी विरोधात कारवाई कडक करा: मंगलप्रभात लोढा यांची मागणी

मुंबई : एकीकडे मालाड आणि मालवणी परिसरात बांग्लादेशी आणि रोहिंगे घुसखोर राहत असल्याचे निदर्शनाला येत असतानाच दक्षिण मुंबईतही घुसखोरी होत असल्याचे भाजप कार्यकर्त्यांनी उघड केले आहे. यासंदर्भात घुसखोरांवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी मुंबई उपनगरचे सहपालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांची पोलीस आयुक्तालयात भेट घेतली. त्यानंतर ते प्रसिद्धि माध्यमांशी बोलत होते. गिरगाव येथे बांग्लादेशी आणि रोहिंगे फेरीवाले राजरोसपणे व्यवसाय करत असून त्यांच्याकडे बनावट आधारकार्ड आढळून आल्याची माहितीही मंत्री लोढा यांनी पोलीस आयुक्त भारती यांना दिली आहे.


मुंबईतल्या अनेक भागात बांगलादेशी आणि रोहिंग्यांची घुसखोरी वाढत असताना, मात्र त्या तुलनेत धडक कारवाई होत नसल्याबाबत मुंबई उपनगरचे सह पालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गिरगाव मध्ये काही फेरीवाले अवैध पद्धतीने व्यवसाय करत असून ते स्थानिक नागरिकांना धमकावत आहेत. भाजप कार्यकर्त्यांनी या घुसखोरांची चौकशी केली असता त्यांच्याकडे बनावट आधारकार्ड आढळून आले असून त्यावर एक सारखीच जन्मतारीख असल्याचा मुद्दाही मंत्री लोढा यांनी पोलीस आयुक्तांच्या निदर्शनाला आणून दिला आहे. यासंदर्भात दक्षिण मुंबई भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह कडक कारवाईची मागणी करणारे निवेदन पोलीस आयुक्त भारती यांना देण्यात आले.

Comments
Add Comment

BMC : मुंबई महानगरपालिका मुख्यलयात मंत्रालयाच्या धर्तीवर प्रवेश

मुंबई  : मुंबई महापालिका मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी प्राप्त झाल्यानंतर पुन्हा एकदा महापालिका

BMC मुख्यालय उडवून देण्याची धमकी, महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ

महापािलका मुख्यालय उडवून देण्याची धमकी ; महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ अशा धमक्यांना मी मुळीच घाबरत नाही-

अवकाळी पावसाने बाधित फळपिकांचे पंचनामे पूर्ण करा, कृषिमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : 'राज्यात मे आणि जून २०२६ या कालावधीत अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या फळपिकांच्या

Verification of Street Vendors : मुंबईत २० हजार फेरीवाल्यांची पडताळणी पूर्ण

येत्या २६ जून पर्यंत पडताळणी न झालेल्यांना मिळणार नाही क्यू आर कोड ओळखपत्र मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : उच्‍च

Devendra Fadnavis : समर्थ भारत ते विकसित भारत’ पंतप्रधान मोदींमुळेच शक्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्र राज्याच्या वतीने पत्र लिहून केले अभिनंदन मुंबई : देशाच्या इतिहासात

Panvel-Karjat Corridor : रेल्वेला नवी लाइफलाइन! लवकरच धावणार उपनगरी रेल्वे; पनवेल-कर्जत कॉरिडॉरचे ९८ टक्के काम पूर्ण

MUMBAI : मुंबई उपनगरी रेल्वे नेटवर्कसाठी महत्त्वाचा ठरणारा बहुप्रतीक्षित पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडॉर आता