पालघर नगर परिषदेत तिरंगी लढतीची चिन्हे!

मोबिन शेख पालघर : आगामी पालघर नगर परिषद निवडणुकीत राजकीय समीकरणांमध्ये चुरस वाढली असून तिरंगी लढतीचे संकेत स्पष्ट दिसू लागले आहेत. शिवसेना (शिंदे गट), ठाकरे गट आणि भारतीय जनता पक्ष हे तीनही पक्ष आपापल्या ताकदीवर मैदानात उतरण्याची शक्यता असल्याने पालघरची निवडणूक रंगणार आहे.


शिंदे गटाकडून उत्तम घरत, भाजपकडून कैलास म्हात्रे, तर ठाकरे गटाकडून उत्तम पिंपळे यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू असताना राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आणि ट्री मॅन अशी प्रतिमा असलेले प्रीतम राऊत यांनीही आपण नगराध्यक्ष व्हावे, अशी इच्छा राजकीय वर्तुळात सुरू आहे. राऊत यांनी मात्र आपला पक्ष जाहीर केला नसला तरी नगराध्यक्ष पदासाठी प्रबळ दावेदार म्हणून त्यांचे नाव समोर येत आहे.


याशिवाय शिंदे गटातील बंड्या म्हात्रे हेही नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे शिंदे गटातच उमेदवारीसाठी अंतर्गत चढाओढ दिसत आहे.दरम्यान, उबाठाचे गटनेते कैलास म्हात्रे यांनी अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केला असून त्यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारीवर दावा केला आहे. मात्र, नुकतेच पक्षात दाखल झालेल्यांना थेट उमेदवारी देऊ नये, असा मतप्रवाह भाजपच्या काही कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. स्थानिक कार्यकर्त्यांनी जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांनाच संधी द्यावी, अशी मागणी केली आहे.


भाजपचे जिल्हास्तरीय नेते प्रशांत पाटील यांनीही उमेदवारीसाठी तयारी दर्शवली असून "कुठल्याही स्थितीत ही निवडणूक मी लढवणारच," असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे भाजपमध्येही उमेदवारीवरून मतभेद उफाळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, ठाकरे गटानेही संघटनात्मक पातळीवर तयारी सुरू केली असून पालघर नगर परिषदेत पुन्हा आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे, तर शिंदे गटाचे कार्यकर्ते "विकासाच्या राजकारणा"चा मुद्दा घेऊन मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. या सर्व घडामोडींमुळे पालघर नगर परिषद निवडणूक ही केवळ स्थानिक न राहता राज्यातील मोठ्या राजकीय शक्तींच्या प्रतिष्ठेची लढत ठरणार आहे. पुढील काही दिवसांत प्रत्येक पक्षाची उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होणार असून त्यानंतरच या तिरंगी लढतीचे नेमके चित्र स्पष्ट होईल.

Comments
Add Comment

Indian Fishermen : शिक्षा पूर्ण होऊनही १७८ भारतीय मच्छीमार पाकिस्तानच्या तुरुंगात

कॉन्स्युलर कराराचे उल्लंघन; डहाणू-तलासरीतील १८ कुटुंबांचा न्यायासाठी आक्रोश डहाणू : भारत-पाकिस्तानदरम्यान

Heavy Rain In Palghar : घोणसई गावाला पाण्याचा वेढा; मुख्य पूल पाण्याखाली

- मुख्य पूल बुडाल्याने गावाचा बाहेरील संपर्क खंडित वाडा : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार

Vasai-Virar Rain Update : वसई-विरारमध्ये पावसाचा कहर! पूर, वीज आणि इंटरनेट बंद; हजारो नागरिकांचे जनजीवन विस्कळीत

पालघर : वसई-विरार (Vasai- Virar) परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सलग दोन

Vandri Dam Waterfall : धबधब्यावर जाताय? थांबा! पालघरच्या वांद्री धबधब्यावर घडला थरार

धबधब्यांवर पाणी अचानक वाढलं आणि पर्यटकांची उडाली तारांबळ पालघर : मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पालघर

Girish Mahajan : पालघर पूरस्थितीवर सरकार ॲक्शन मोडमध्ये; गिरीश महाजनांचा दौरा, अभ्यासगटाची घोषणा

पालघर : मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) पालघर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती (Flood Situation) निर्माण झाली असून जनजीवन (Normal

Vasai Rain : मुसळधार पावसाचा फटका! वसईत इमारतीचा सज्जा कोसळला, रस्ते जलमय

वसई : मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरू असतानाच वसई (Vasai) परिसरात इमारतींशी संबंधित दुर्घटनांची (Building Accidents) मालिका सुरूच आहे.