पालघर नगर परिषदेत तिरंगी लढतीची चिन्हे!

मोबिन शेख पालघर : आगामी पालघर नगर परिषद निवडणुकीत राजकीय समीकरणांमध्ये चुरस वाढली असून तिरंगी लढतीचे संकेत स्पष्ट दिसू लागले आहेत. शिवसेना (शिंदे गट), ठाकरे गट आणि भारतीय जनता पक्ष हे तीनही पक्ष आपापल्या ताकदीवर मैदानात उतरण्याची शक्यता असल्याने पालघरची निवडणूक रंगणार आहे.


शिंदे गटाकडून उत्तम घरत, भाजपकडून कैलास म्हात्रे, तर ठाकरे गटाकडून उत्तम पिंपळे यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू असताना राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आणि ट्री मॅन अशी प्रतिमा असलेले प्रीतम राऊत यांनीही आपण नगराध्यक्ष व्हावे, अशी इच्छा राजकीय वर्तुळात सुरू आहे. राऊत यांनी मात्र आपला पक्ष जाहीर केला नसला तरी नगराध्यक्ष पदासाठी प्रबळ दावेदार म्हणून त्यांचे नाव समोर येत आहे.


याशिवाय शिंदे गटातील बंड्या म्हात्रे हेही नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे शिंदे गटातच उमेदवारीसाठी अंतर्गत चढाओढ दिसत आहे.दरम्यान, उबाठाचे गटनेते कैलास म्हात्रे यांनी अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केला असून त्यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारीवर दावा केला आहे. मात्र, नुकतेच पक्षात दाखल झालेल्यांना थेट उमेदवारी देऊ नये, असा मतप्रवाह भाजपच्या काही कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. स्थानिक कार्यकर्त्यांनी जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांनाच संधी द्यावी, अशी मागणी केली आहे.


भाजपचे जिल्हास्तरीय नेते प्रशांत पाटील यांनीही उमेदवारीसाठी तयारी दर्शवली असून "कुठल्याही स्थितीत ही निवडणूक मी लढवणारच," असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे भाजपमध्येही उमेदवारीवरून मतभेद उफाळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, ठाकरे गटानेही संघटनात्मक पातळीवर तयारी सुरू केली असून पालघर नगर परिषदेत पुन्हा आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे, तर शिंदे गटाचे कार्यकर्ते "विकासाच्या राजकारणा"चा मुद्दा घेऊन मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. या सर्व घडामोडींमुळे पालघर नगर परिषद निवडणूक ही केवळ स्थानिक न राहता राज्यातील मोठ्या राजकीय शक्तींच्या प्रतिष्ठेची लढत ठरणार आहे. पुढील काही दिवसांत प्रत्येक पक्षाची उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होणार असून त्यानंतरच या तिरंगी लढतीचे नेमके चित्र स्पष्ट होईल.

Comments
Add Comment

Vasai : रुळावर उभा राहून ट्रेन अडवण्याचा प्रयत्न? वसई-नालासोपारा दरम्यान लोकल थांबली प्रवशांना सुटला घाम!

पालघर: वसई-नालासोपारा रेल्वे स्थानकांदरम्यान पश्चिम रेल्वे मार्गावर बुधवारी एक धक्कादायक घटना घडली. एका

Flood Relief Maharashtra : पालघर, वसई-विरार पूरग्रस्तांना राज्य सरकारची विशेष मदत; घरांसाठी 1.5 लाख, कुटुंबाला 10 हजार रुपये

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली निर्णय; पूरग्रस्त, शेतकरी, मच्छीमार, दुकानदार आणि

Nalasopara News : नागेला तलाव पुन्हा ठरला जीवघेणा! 18 वर्षीय तरुणाचा बळी, सुरक्षेअभावी नागरिक आक्रमक

नालासोपारा : नालासोपारा पूर्व भागातील नागेला तलावात (Nagela Lake) बुडून १८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक

Palghar : अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या पालघरची सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेंनी केली पाहणी

पालघर : पालघर जिल्ह्यात २२ ते २४ जुलै २०२६ या कालावधीत झालेल्या विक्रमी अतिवृष्टीमुळे सार्वजनिक रस्ते, पूल आणि

Palghar Rain : मुंबई-गुजरात रेल्वे सेवेवर पावसाचा मोठा परिणाम; वंदे भारत, शताब्दीसह अनेक गाड्या रद्द

पालघर : पालघर जिल्हा आणि गुजरातमधील वलसाड (Valsad) परिसरात मुसळधार पावसाचा (Heavy Rain) जोर सलग दुसऱ्या दिवशीही कायम आहे.

Palghar Rain : पालघरमध्ये अतिवृष्टीचा इशारा; पालघर, डहाणू, तलासरीतील शाळा-महाविद्यालयांना आज सुट्टी

पालघर : भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department - IMD) पालघर जिल्ह्यासाठी २३ जुलै रोजी 'रेड अलर्ट' (Red Alert) आणि २४ जुलैसाठी