पालघर नगर परिषदेत तिरंगी लढतीची चिन्हे!

मोबिन शेख पालघर : आगामी पालघर नगर परिषद निवडणुकीत राजकीय समीकरणांमध्ये चुरस वाढली असून तिरंगी लढतीचे संकेत स्पष्ट दिसू लागले आहेत. शिवसेना (शिंदे गट), ठाकरे गट आणि भारतीय जनता पक्ष हे तीनही पक्ष आपापल्या ताकदीवर मैदानात उतरण्याची शक्यता असल्याने पालघरची निवडणूक रंगणार आहे.


शिंदे गटाकडून उत्तम घरत, भाजपकडून कैलास म्हात्रे, तर ठाकरे गटाकडून उत्तम पिंपळे यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू असताना राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आणि ट्री मॅन अशी प्रतिमा असलेले प्रीतम राऊत यांनीही आपण नगराध्यक्ष व्हावे, अशी इच्छा राजकीय वर्तुळात सुरू आहे. राऊत यांनी मात्र आपला पक्ष जाहीर केला नसला तरी नगराध्यक्ष पदासाठी प्रबळ दावेदार म्हणून त्यांचे नाव समोर येत आहे.


याशिवाय शिंदे गटातील बंड्या म्हात्रे हेही नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे शिंदे गटातच उमेदवारीसाठी अंतर्गत चढाओढ दिसत आहे.दरम्यान, उबाठाचे गटनेते कैलास म्हात्रे यांनी अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केला असून त्यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारीवर दावा केला आहे. मात्र, नुकतेच पक्षात दाखल झालेल्यांना थेट उमेदवारी देऊ नये, असा मतप्रवाह भाजपच्या काही कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. स्थानिक कार्यकर्त्यांनी जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांनाच संधी द्यावी, अशी मागणी केली आहे.


भाजपचे जिल्हास्तरीय नेते प्रशांत पाटील यांनीही उमेदवारीसाठी तयारी दर्शवली असून "कुठल्याही स्थितीत ही निवडणूक मी लढवणारच," असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे भाजपमध्येही उमेदवारीवरून मतभेद उफाळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, ठाकरे गटानेही संघटनात्मक पातळीवर तयारी सुरू केली असून पालघर नगर परिषदेत पुन्हा आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे, तर शिंदे गटाचे कार्यकर्ते "विकासाच्या राजकारणा"चा मुद्दा घेऊन मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. या सर्व घडामोडींमुळे पालघर नगर परिषद निवडणूक ही केवळ स्थानिक न राहता राज्यातील मोठ्या राजकीय शक्तींच्या प्रतिष्ठेची लढत ठरणार आहे. पुढील काही दिवसांत प्रत्येक पक्षाची उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होणार असून त्यानंतरच या तिरंगी लढतीचे नेमके चित्र स्पष्ट होईल.

Comments
Add Comment

Bullet Train : बुलेट ट्रेनचे राज्यातील काम जोरात, तंत्रज्ञांनी पालघर जिल्ह्यात केली कमाल

पालघर : मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर आहे. केंद्रातल्या मोदी सरकार आणि राज्यातल्या फडणवीस

Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन: पालघरमध्ये तिसऱ्या डोंगराळ बोगद्याचे काम फत्ते; अवघ्या ५ महिन्यांत महाराष्ट्रातील 'हे' मोठे आव्हान पूर्ण

पालघर : देशातील पहिल्या हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाच्या (high-Speed Railway Project) म्हणजेच 'मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन'च्या

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातात ठार १३ जणांवर अंत्यसंस्कार, पीडित कुटुंबांचे पालकत्व शासन स्वीकारणार

डहाणू : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील धनिवरी येथे १८ मे रोजी झालेल्या भीषण अपघातातील १३ मृतांवर आज अत्यंत

Palghar Accident : काळजाचा ठोका चुकवणारं दृश्य! एकाच रांगेत १२ मृतदेह, बापूगावात महिलांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश

पालघर : आनंदाने नटलेले घर, साखरपुड्याच्या निमित्ताने जमलेले सर्व नातेवाईक आणि उत्साहाचे वातावरण... पण नियतीच्या

Palghar Accident : साखरपुड्याच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १३ जणांचा मृत्यू; मृतांच्या वारसांना मदत जाहीर

डहाणू : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील धानोरी येथे रविवारी दुपारी एक अत्यंत भीषण आणि

Mumbai- Ahemdabad Expressway Accident : डहाणूमध्ये 100 वऱ्हाड्यांनी भरलेल्या ट्रकला भरधाव कंटेनरची धडक; 12 जणांचा जागीच मृत्यू, 25 हून अधिक गंभीर

डहाणू : साखरपुड्याचा आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या पाहुण्यांवर काळाने अचानक