“जो जीता वही सिकंदर” शरद पवारांच्या बिनबुडाच्या आरोपानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार!

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होताच राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचं चित्र समोर आलं आहे. यंदाच्या निवडणुकीत एनडीएने जोरदार कामगिरी करत तब्बल २०२ जागांवर विजयाची नोंद केली. तर महागठबंधनाला केवळ ३५ जागांवर समाधान मानावं लागलं. या निकालानंतर राजकीय चर्चांना वेग आला असून अनेक नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत.


शरद पवारांनी बिहारच्या निवडणुकीवर भाष्य करताना म्हटलं की, महिलांनी मोठ्या प्रमाणावर एनडीएला मतदान केलं आणि त्यामागे त्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेल्या १० हजार रुपयांच्या योजनेचा प्रभाव दिसतो.


पुढे ते म्हणाले “महाराष्ट्रातही निवडणुकीपूर्वी सरकारी योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत देण्यात आली. भविष्यात सत्ताधारी पक्षांनी अशा पद्धतीने निवडणुकांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला तर लोकशाहीवरील विश्वास ढळू शकतो. एवढ्या मोठ्या रकमेचं वाटप योग्य आहे का, निवडणूक आयोगाने याचा गांभीर्याने विचार करावा.”



“जो जीता वही सिकंदर” फडणवीसांचा पलटवार


राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार यांनी बिहारमधील महिलांना १० हजारांची मदत देणाऱ्या योजनेमुळे मतदानात परिणाम झाला, अशी टीका केल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना थेट प्रत्युत्तर दिलं. फडणवीस म्हणाले, “जो जीता वही सिकंदर. पराभवानंतर आपली चूक मान्य करणं हे विरोधकांना जमत नाही. आमच्या योजना लोकांना आवडल्या म्हणून त्यांनी मतदान केलं. मग त्यात दोष कोणाचा? तुमच्या सरकारच्या काळात तुम्ही अशा योजना राबवल्या नाहीत, ही आमची चूक कशी?”


मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मते, लोकशाही प्रक्रियेत जनता प्रामाणिकपणे आपले मत विकासाला करते, आणि योजनांचा प्रभाव हे नैसर्गिक आहे, आरोप करण्याचा विषयच येत नाही.

Comments
Add Comment

Shaina NC : मुंबईतील सर्व धोकादायक झाडांचे त्रयस्थ संस्थेकडून ऑडिट करा; शिवसेना राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन सी यांची मागणी

- चेंबूरमधील झाड पडून झालेल्या दुर्घटनेतील ११ वर्षीय विहान श्रीवास्तवच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांवर कारवाई

Devendra Fadnavis : गेमिंगमध्ये भारताची मोठी झेप! ई-स्पोर्ट्स वर्ल्ड कप २०२६ साठी ‘इंडिया रायझिंग’चा ऐतिहासिक मार्ग खुला

- ई-स्पोर्ट्स वर्ल्ड कप २०२६ च्या माध्यमातून महाराष्ट्र डिजिटल क्रिएटिव्ह अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करेल –

Devendra Fadnavis : राज्य सहकारी संघाचा शिक्षण निधी पुन्हा सुरू करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

- सहकारात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव मुंबई : "महाराष्ट्र राज्य सहकारी संघाला १०७ वर्षांची उज्ज्वल परंपरा

Devendra Fadanvis : मुंबई, ठाणे, कोकणाला पावसाने झोडपले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रशासनाला दिल्या 'या' सूचना

मुंबई : राज्यातील अनेक भागांसह मुंबईत सध्या मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे

Mumbai Rain : धक्कादायक! भांडूपमध्ये रस्ता खचून टेम्पो अन् झाड बघता बघता जमिनीच्या पोटात गायब

पुढचे काही तास मुसळधार पावसाची शक्यता Mumbai : मुंबईत आज सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. परिणामी, शहराच्या काही

मागील सहा तासात पावसाने मुंबईला झोडपले... अनेक परिसर जलमय, वाहतुकीसाठी मार्ग केले बंद

मुंबई  : मुंबईत सकाळपासून मुसळधार पावसाच्या सरी कोसळत असून उपनगरात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. सकाळी आठ ते