सात महिन्यांत ‘फुकट्यां’कडून मध्य रेल्वेची १४१ कोटींची दंड वसुली

मुंबई  : मध्य रेल्वेने २०२५-२६ मध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या २३.७६ लाख प्रवाशांकडून १४१ कोटी रुपये दंड वसूल केला. प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास घडावा यासाठी मध्य रेल्वे प्रशासन प्रयत्नशील आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ, नागपूर या विभागात अनधिकृत आणि विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रोखण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलली आहेत. यासाठी सातत्याने आणि सखोल तिकीट तपासणी मोहीम सुरू केली.


मध्य रेल्वेने २०२५-२६ मध्ये (एप्रिल – ऑक्टोबर २०२५) विनातिकीट प्रवाशांच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवले. मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकांनी २०२५-२६ मध्ये विनातिकीट, वैध तिकीटविना प्रवास करणाऱ्या २३.७६ लाख प्रवाशांना पकडले. ही संख्या २०२४-२५ मध्ये २२.०९ लाख इतकी होती. त्यात ८ टक्क्यांची वाढ झाल्याचे निदर्शनास आले. प्रशासनाला २०२५-२६ मध्ये दंडाच्या रूपात १४१.२७ कोटी रुपये विक्रमी रक्कम वसूल करण्यात यश आले. २०२४-२५ मध्ये विनातिकीट प्रवाशांकडून १२४.३६ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला होता. यामध्ये १४ टक्क्यांची वाढ झाली.


मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकांनी ऑक्टोबर २०२५ मध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या ३.७१ लाख प्रवाशांना पकडले. तर ऑक्टोबर २०२४ मध्ये ३ लाख प्रवाशांची धरपकड करण्यात आली होती. त्यात सुमारे २४ टक्क्यांची वाढ झाली. विनातिकीट प्रवाशांकडून ऑक्टोबर २०२५ मध्ये २४.८१ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.


विनातिकीट प्रवासी आणि वसूल केलेला दंड : भुसावळ विभागात ६.०७ लाख प्रकरणांमधून ५१.७४ कोटी रुपये, मुंबई विभागात ९.६३ लाख प्रकरणांमधून ४०.५९ कोटी रुपये, नागपूर विभागात २.५३ लाख प्रकरणांमधून १५.६२ कोटी रुपये, पुणे विभागात २.६७ लाख प्रकरणांमधून १५.५७ कोटी रुपये, सोलापूर विभागात १.४१ लाख प्रकरणांमधून ६.७२ कोटी रुपये आणि मध्य रेल्वे मुख्यालयात १.४५ लाख प्रकरणांमधून ११.०३ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. मध्य रेल्वेवर दररोज ८० वातानुकूलित लोकल धावतात. या लोकलमध्ये विनातिकीट प्रवाशांसंबंधी तक्रारींवर त्वरित प्रतिसाद देण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली. यासाठी व्हॉट्सॲॅप तक्रार क्रमांक ७२०८८१९९८७ उपलब्ध करण्यात आला आहे. आता वातानुकूलित लोकल तिकीट तपासणी पथक दररोज सरासरी ३६८ विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून सरासरी १.१९ लाख रुपये दंड वसूल करीत आहे.

Comments
Add Comment

Central Railway : मध्य रेल्वेने साजरा केला जागतिक वारसा दिन

मुंबई : मध्य रेल्वेने जागतिक वारसा दिन-२०२६ उत्साहात साजरा केला. हा कार्यक्रम युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ व मध्य

ATS : केंद्र सरकारच्या एका निर्णयामुळे राज्यातील लाखो वाहतूक व्यावसायिकांना दिलासा

मुंबई : 'एटीएस' (ऑटोमॅटिक टेस्टिंग स्टेशन) प्रणालीतील तांत्रिक बदलांमुळे रखडलेली वाहन परवाना नूतनीकरण प्रक्रिया

Uninterrupted Power Supply : अखंड वीजपुरवठ्यासाठी राज्यात होणार ‘एआय’चा वापर

मुंबई : वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर विजेची विक्रमी मागणी पूर्ण करतानाच, वीजनिर्मिती आणि पुरवठ्यात

Data Centers in Maharashtra : मध्य आशियातील नामांकित कंपन्या महाराष्ट्रात डेटा सेंटर स्थापन करणार

मुंबई : राज्यातील उद्योगस्नेही वातावरणाचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले असून, मध्य आशियातील डेटा सेंटर

Rain In Maharashtra : उष्माघातानंतर राज्यासमोर वादळी पावसाचे संकट

मुंबई : पश्चिम महाराष्ट्र (प्रामुख्याने घाट परिसर), खानदेश, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये २० ते २२

New Law : जमीनधारक होणार विकास प्रक्रियेत भागीदार

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा चेहरामोहरा बदलणाऱ्या ‘मुंबई ३.०’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी मुंबई महानगर