सात महिन्यांत ‘फुकट्यां’कडून मध्य रेल्वेची १४१ कोटींची दंड वसुली

मुंबई  : मध्य रेल्वेने २०२५-२६ मध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या २३.७६ लाख प्रवाशांकडून १४१ कोटी रुपये दंड वसूल केला. प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास घडावा यासाठी मध्य रेल्वे प्रशासन प्रयत्नशील आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ, नागपूर या विभागात अनधिकृत आणि विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रोखण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलली आहेत. यासाठी सातत्याने आणि सखोल तिकीट तपासणी मोहीम सुरू केली.


मध्य रेल्वेने २०२५-२६ मध्ये (एप्रिल – ऑक्टोबर २०२५) विनातिकीट प्रवाशांच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवले. मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकांनी २०२५-२६ मध्ये विनातिकीट, वैध तिकीटविना प्रवास करणाऱ्या २३.७६ लाख प्रवाशांना पकडले. ही संख्या २०२४-२५ मध्ये २२.०९ लाख इतकी होती. त्यात ८ टक्क्यांची वाढ झाल्याचे निदर्शनास आले. प्रशासनाला २०२५-२६ मध्ये दंडाच्या रूपात १४१.२७ कोटी रुपये विक्रमी रक्कम वसूल करण्यात यश आले. २०२४-२५ मध्ये विनातिकीट प्रवाशांकडून १२४.३६ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला होता. यामध्ये १४ टक्क्यांची वाढ झाली.


मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकांनी ऑक्टोबर २०२५ मध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या ३.७१ लाख प्रवाशांना पकडले. तर ऑक्टोबर २०२४ मध्ये ३ लाख प्रवाशांची धरपकड करण्यात आली होती. त्यात सुमारे २४ टक्क्यांची वाढ झाली. विनातिकीट प्रवाशांकडून ऑक्टोबर २०२५ मध्ये २४.८१ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.


विनातिकीट प्रवासी आणि वसूल केलेला दंड : भुसावळ विभागात ६.०७ लाख प्रकरणांमधून ५१.७४ कोटी रुपये, मुंबई विभागात ९.६३ लाख प्रकरणांमधून ४०.५९ कोटी रुपये, नागपूर विभागात २.५३ लाख प्रकरणांमधून १५.६२ कोटी रुपये, पुणे विभागात २.६७ लाख प्रकरणांमधून १५.५७ कोटी रुपये, सोलापूर विभागात १.४१ लाख प्रकरणांमधून ६.७२ कोटी रुपये आणि मध्य रेल्वे मुख्यालयात १.४५ लाख प्रकरणांमधून ११.०३ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. मध्य रेल्वेवर दररोज ८० वातानुकूलित लोकल धावतात. या लोकलमध्ये विनातिकीट प्रवाशांसंबंधी तक्रारींवर त्वरित प्रतिसाद देण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली. यासाठी व्हॉट्सॲॅप तक्रार क्रमांक ७२०८८१९९८७ उपलब्ध करण्यात आला आहे. आता वातानुकूलित लोकल तिकीट तपासणी पथक दररोज सरासरी ३६८ विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून सरासरी १.१९ लाख रुपये दंड वसूल करीत आहे.

Comments
Add Comment

Sarsanghchalak Dr. Mohan Bhagwat : 'जेन-झी' आणि 'जेन-अल्फा' जुन्या पिढीपेक्षा अधिक प्रामाणिक!

- सरसंघचालक डॉ. मोहन भागवत; लोकशाहीत आंदोलनसुद्धा संवादाचेच एक माध्यम मुंबई : "भारताच्या शिक्षणव्यवस्थेत अजूनही

Air India New CEO : टाटांचा मास्टरस्ट्रोक! पाकिस्तानकडे जाणारे टेवोल्डे गेब्रेमरियम आता एअर इंडियाचे नवे बॉस

मुंबई : टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाला अखेर नवे नेतृत्व मिळाले आहे. इथियोपियन एअरलाइन्स ग्रुपचे माजी

Mohan Bhagwat : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचा 'जेन-झी'शी संवाद

Mumbai : शिक्षणाच्या क्षेत्रात अनेक गोष्टी करता येऊ शकतात. मात्र हे सर्व करताना समाजात फूट पाडण्यासाठी नव्हे, तर

Mahalaxmi Dhobi Ghat PNG Gas Connection : महालक्ष्मी धोबीघाट धूरमुक्त होणार! लाकूड-कोळशाला रामराम, १५० पीएनजी गॅस जोडण्यांमुळे प्रदूषणमुक्तीच्या दिशेने पाऊल

मुंबई : मुंबईची ऐतिहासिक आणि जागतिक ओळख असलेल्या महालक्ष्मी धोबीघाटाने (Mahalaxmi Dhobighath) आता वायू प्रदूषणावर मात

Chandrashekhar Bawankule : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची १,०५३ एकर वनजमीन सुरक्षित! महसूलमंत्री बावनकुळेंच्या निर्णयाने वन विभागाचा हक्क कायम

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या (Sanjay Gandhi National Park forest) महत्त्वाच्या वनक्षेत्राबाबत राज्य सरकारने मोठा

Special Trains : मुंबई आणि मडगाव दरम्यान धावणार ४ साप्ताहिक विशेष गाड्या; प्रवाशांना मोठा दिलासा

मुंबई: आठवड्याच्या अखेरीस आणि आगामी सणासुदीच्या काळात प्रवासाचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने एक