मुंबईतील २७ टक्केच नागरिक साखरेपासून राहतात लांब, व्यायामचा अभाव आणि चुकीचा आहारामुळे असंसर्गजन्य आजारांना दिले जाते निमंत्रण

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेतील २४ प्रशासकीय विभागांमध्ये जानेवारी २०२५ पासून 'मीठ - साखर अभियान २०२५' जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने केलेल्या एका सर्वेक्षण पाहणीत असे आढळून आले की, फक्त २७ टक्के मुंबईकरांना साखरेच्या अतिसेवनाचे दुष्परिणाम माहीत होते. मुंबईसारख्या महानगरामध्ये नागरिकांमधील व्यायामाचा अभाव आणि आहाराच्या चुकीच्या सवयी यामुळे मधुमेह, उच्चरक्तदाब, ह्दयरोग यासारख्या असंसर्गजन्य आजाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.


विविध उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना योग्य व संतुलित आहाराचे महत्त्व पटवून दिल्यास ते नागरिकांच्या जीवनशैलीत आवश्यक तो सकारात्मक बदल घडेल. मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकते. मधुमेहाचा प्रादुर्भाव रोखण्याचसाठी नागरिकांनी ‘हेल्दी कॅम्पस अभियान’ यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जागतिक मधुमेह दिनानिमित्त मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी केले आहे.


जागतिक आरोग्या संघटनेनुसार ३ पैकी १ एक व्यक्ति असंसर्ग आजाराने पीडित असतो. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून यामागील मुख्य कारणे म्हणजे नागरीकरण, बसून राहण्याची जीवनशैली, अयोग्य आहाराच्या सवयी इत्यादी होत. तसेच मुंबईमध्ये एकूण १५.६ % मधुमेहपूर्व व्यक्ती आढळले आहेत.


आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघाच्याअंदाजानुसार, भारतामध्ये सुमारे १,२८,५०० बालक आणि किशोरवयीन मुले टाइप १ मधुमेहाने (डायबिटीज) प्रभावित आहेत. जागतिक आरोग्य संघटना व महानगरपालिका यांनी संयुक्तपणे मुंबईमध्ये सन २०२१ मध्ये केलेल्या स्टेप्स सर्वेक्षणानुसार, १८ टक्के (१८-६९ वयोगटात) व्यक्तींमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण वाढलेले आढळले आहे.



'हेल्दी कॅम्पस उपक्रम'


'हेल्दी कॅम्पस उपक्रम' हा मीठ-साखर अभियान म्हणून राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत मुंबईतील सुमारे १०० हून आधिक महाविद्यालयांमध्ये 'हेल्दी खा, स्वस्थ रहा, मस्त रहा' या घोषवाक्याबाबत जनजागृती करण्यात येईल. आरोग्यदायी कँटिन मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी केली जाईल. ‘राष्ट्रीय छात्र सेवा' आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांद्वारे 'हेल्दी फूड फेस्ट’ स्पर्धा आणि डिजिटल मोहीमेचे आयोजन करण्यात येणार आहे. आहार तज्ज्ञांद्वारे विद्यार्थ्यांना पोषण दूत म्हणून प्रशिक्षित केले जाईल. तसेच स्वयंपाकी, पाककला तज्ज्ञ आणि महिला स्वयंसेविका व समुदाय प्रतिनिधी यांच्या सहकार्याने कमी मीठ - साखरयुक्त पाककृती, आरोग्यदायी खाद्यपदार्थ (मेन्यू) विकसित करून समाजात आरोग्यदायी आहाराबाबत जनजागृती केली जाईल.

Comments
Add Comment

NEET UG 2026 : नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा मांढरेला CBI कोठडी, नांदेडमधये पालकांची सीबीआय चौकशी

मुंबई : नीट युजी २०२६ पेपरफुटी प्रकरणी मनीषा मांढरेला १४ दिवसांची सीबीआय कोठडी ठोठावण्यात आली आहे.

Krunal Pandya : हार्दिकच्या लग्नाला कृणाल पांड्या गैरहजर राहणार ? चर्चांमागचं नेमकं कारण काय ?

IPL 2026 : हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आहे. आयपीएल २०२६ संपण्याआधीच हार्दिक पांड्या मॉडेल आणि इन्फ्लुएंसर

Kirit Somaiya : मुंबईत उघड्यावर कुर्बानी देण्यास बंदी घाला, किरीट सोमय्यांची मागणी

मुंबई : मुंबईत उघड्यावर कुर्बानी देण्यास बंदी घाला, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. बीएमसी आणि

BMC Waste Management : मोठ्या प्रमाणात कचरा निर्मिती: महानगरपालिकेकडे नोंदणी न करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आयुक्तांचे आदेश

मुंबई : घनकचरा व्यवस्थापन नियमांनुसार मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या संस्था व व्यक्तींनी

BMC News : एकही मॅनहोल्स उघडे राहता कामा नये

महापालिका आयुक्तांनी दिले संबंधित खात्यांसह सहायक आयुक्तांनाही निर्देश मुंबई : सध्या सुरू असलेली सर्व

Devendra Fadnavis : कला, संस्कृती अन् खाद्यसंस्कृतीची ओळख पटवून देणारा 'माटी ९ पूर्वांचल महोत्सव' : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारतीय संस्कृती महान असून ही संस्कृती समृद्ध करण्यासाठी महाराष्ट्राने anj पूर्वांचलने महत्त्वपूर्ण