मुंबईतील २७ टक्केच नागरिक साखरेपासून राहतात लांब, व्यायामचा अभाव आणि चुकीचा आहारामुळे असंसर्गजन्य आजारांना दिले जाते निमंत्रण

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेतील २४ प्रशासकीय विभागांमध्ये जानेवारी २०२५ पासून 'मीठ - साखर अभियान २०२५' जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने केलेल्या एका सर्वेक्षण पाहणीत असे आढळून आले की, फक्त २७ टक्के मुंबईकरांना साखरेच्या अतिसेवनाचे दुष्परिणाम माहीत होते. मुंबईसारख्या महानगरामध्ये नागरिकांमधील व्यायामाचा अभाव आणि आहाराच्या चुकीच्या सवयी यामुळे मधुमेह, उच्चरक्तदाब, ह्दयरोग यासारख्या असंसर्गजन्य आजाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.


विविध उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना योग्य व संतुलित आहाराचे महत्त्व पटवून दिल्यास ते नागरिकांच्या जीवनशैलीत आवश्यक तो सकारात्मक बदल घडेल. मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकते. मधुमेहाचा प्रादुर्भाव रोखण्याचसाठी नागरिकांनी ‘हेल्दी कॅम्पस अभियान’ यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जागतिक मधुमेह दिनानिमित्त मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी केले आहे.


जागतिक आरोग्या संघटनेनुसार ३ पैकी १ एक व्यक्ति असंसर्ग आजाराने पीडित असतो. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून यामागील मुख्य कारणे म्हणजे नागरीकरण, बसून राहण्याची जीवनशैली, अयोग्य आहाराच्या सवयी इत्यादी होत. तसेच मुंबईमध्ये एकूण १५.६ % मधुमेहपूर्व व्यक्ती आढळले आहेत.


आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघाच्याअंदाजानुसार, भारतामध्ये सुमारे १,२८,५०० बालक आणि किशोरवयीन मुले टाइप १ मधुमेहाने (डायबिटीज) प्रभावित आहेत. जागतिक आरोग्य संघटना व महानगरपालिका यांनी संयुक्तपणे मुंबईमध्ये सन २०२१ मध्ये केलेल्या स्टेप्स सर्वेक्षणानुसार, १८ टक्के (१८-६९ वयोगटात) व्यक्तींमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण वाढलेले आढळले आहे.



'हेल्दी कॅम्पस उपक्रम'


'हेल्दी कॅम्पस उपक्रम' हा मीठ-साखर अभियान म्हणून राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत मुंबईतील सुमारे १०० हून आधिक महाविद्यालयांमध्ये 'हेल्दी खा, स्वस्थ रहा, मस्त रहा' या घोषवाक्याबाबत जनजागृती करण्यात येईल. आरोग्यदायी कँटिन मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी केली जाईल. ‘राष्ट्रीय छात्र सेवा' आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांद्वारे 'हेल्दी फूड फेस्ट’ स्पर्धा आणि डिजिटल मोहीमेचे आयोजन करण्यात येणार आहे. आहार तज्ज्ञांद्वारे विद्यार्थ्यांना पोषण दूत म्हणून प्रशिक्षित केले जाईल. तसेच स्वयंपाकी, पाककला तज्ज्ञ आणि महिला स्वयंसेविका व समुदाय प्रतिनिधी यांच्या सहकार्याने कमी मीठ - साखरयुक्त पाककृती, आरोग्यदायी खाद्यपदार्थ (मेन्यू) विकसित करून समाजात आरोग्यदायी आहाराबाबत जनजागृती केली जाईल.

Comments
Add Comment

Prajakta Lavangare : महिला आणि बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अधिक प्रभावी सुविधा देण्यासाठी उपाययोजना करा

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कामकाजाचा, सुविधांचा अतिरिक्त आयुक्तांकडून आढावा मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या

MPSC Exam : MPSC परीक्षेत मोठा बदल, आता २१ दिवसांत निकाल येणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरती प्रक्रियेत मोठा बदल; पूर्व परीक्षा आता CBT पद्धतीने महाराष्ट्र लोकसेवा

Lokmanya Tilak road fire : लोकमान्य टिळक रोडवर आग; परिसरातील नागरिकांची पळापळ!

मुंबई : मुंबईत आगीच्या सत्रामुळे खळबळ उडाली असून, शुक्रवारी दादरच्या (Dadar) लोकमान्य टिळक रोडवर (Lokmanya Tilak Road) आगीची

Aarey Road : गोरेगाव आरे भास्कर रस्त्यांची तात्पुरती डागडुजी

स्थानिक नगरसेविकेने रस्ता खचण्याची वर्तवली भीती पावसाळ्यात पूर्वस्थितीत रस्ता आणून देताना घेतली नाही

Mumbai Police : मुंबई पोलीस अधिकारी संभाजी गुरव यांची मोठी कामगिरी; उत्तर अमेरिकेतील सर्वोच्च डेनाली शिखर सर

मुंबई : मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक संभाजी गुरव ( Sambhaji Gurav) यांनी उत्तर अमेरिकेतील सर्वोच्च माउंट

Suicide News: धक्कादायक! वरळी सी लिंकवरून समुद्रात उडी; ठाण्यातील व्यावसायिकाचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील (Mumbai) वरळी सी लिंकवरून (Worli Sea Link) एका व्यक्तीने समुद्रात उडी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.