नवले पुलावर भीषण अपघात, तीन वाहनांनी घेतला पेट, सात जणांचा मृत्यू!

चालत्या कंटेनरने अचानक ब्रेक दाबला, भरधाव कार मागून धडकली, कारच्या मागून दुसरा कंटेनर घुसला


पुणे : पुणे शहरात भीषण अपघाताची घटना घडली आहे. नवले पुल परिसरात झालेल्या या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडलेल्या या अपघातात दोन ते तीन वाहनांना आग लागल्याने परिसरात मोठी धावपळ उडाली. या घटनेत सुमारे २० जण जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे, मात्र मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.


मिळालेल्या माहितीनुसार, दोन कंटेनर आणि एक कार यांची जोरदार धडक होऊन हा अपघात झाला. दोन कंटेनरच्या मधोमध एक कार अडकून पेटली. जळत असलेल्या कारमधून एक कुटुंब प्रवास करत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. आग विझवण्यात यश आले असून सध्या बचावकार्य सुरू आहे.


नवले पुल परिसरात अपघातांच्या घटना वारंवार घडत असल्याने या ठिकाणच्या सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अपघातानंतर काही काळासाठी नवले पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. सध्या रस्त्यावरची वाहतूक हळूहळू पूर्ववत केली जात आहे, मात्र परिसरात अजूनही पोलिसांचा ताफा तैनात आहे.






या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त करत, मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर केली.
Comments
Add Comment

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder)

आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा