नवले पुलावर भीषण अपघात, तीन वाहनांनी घेतला पेट, सात जणांचा मृत्यू!

चालत्या कंटेनरने अचानक ब्रेक दाबला, भरधाव कार मागून धडकली, कारच्या मागून दुसरा कंटेनर घुसला


पुणे : पुणे शहरात भीषण अपघाताची घटना घडली आहे. नवले पुल परिसरात झालेल्या या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडलेल्या या अपघातात दोन ते तीन वाहनांना आग लागल्याने परिसरात मोठी धावपळ उडाली. या घटनेत सुमारे २० जण जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे, मात्र मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.


मिळालेल्या माहितीनुसार, दोन कंटेनर आणि एक कार यांची जोरदार धडक होऊन हा अपघात झाला. दोन कंटेनरच्या मधोमध एक कार अडकून पेटली. जळत असलेल्या कारमधून एक कुटुंब प्रवास करत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. आग विझवण्यात यश आले असून सध्या बचावकार्य सुरू आहे.


नवले पुल परिसरात अपघातांच्या घटना वारंवार घडत असल्याने या ठिकाणच्या सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अपघातानंतर काही काळासाठी नवले पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. सध्या रस्त्यावरची वाहतूक हळूहळू पूर्ववत केली जात आहे, मात्र परिसरात अजूनही पोलिसांचा ताफा तैनात आहे.






या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त करत, मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर केली.
Comments
Add Comment

आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल मिसिंग लिंकचे कामही लवकरात लवकर

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १२ हेक्टर जागा मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय १०० विद्यार्थी प्रवेश ⁠४३०

पुणे एक्सप्रेस वे अपघात प्रकरणी महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेच्या १३९ फेऱ्या रद्द

मुंबई : पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या

एक्सप्रेवेवर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी अन् २५ किलोमीटर पर्यंत रांगा; नेमकं पुण्यात घडलं काय ?

लोणावळा : मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवारी सायंकाळी घडलेल्या एका अपघातामुळे संपूर्ण मार्गावर

Congress: काँग्रेसमधला वाद चव्हाट्यावर, नगरसेवक थेट दिल्लीत पोहोचले, बैठकीत नेमकं घडलं काय?

दिल्ली: चंद्रपूर महापालिकेत सर्वाधिक जागा जिंकूनही काँग्रेसमध्ये गटातील राजकारणामुळे सत्ता गमावण्याची वेळ

Ajit Pawar : विमान अपघाताआधी अजित पवारांनी सुनेत्रा वहिनींच्या नातलगाला केलेला शेवटचा फोन... काय होते अजित पवारांचे शेवटचे शब्द

धाराशिव : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या संदर्भात एक नवी