नवले पुलावर भीषण अपघात, तीन वाहनांनी घेतला पेट, सात जणांचा मृत्यू!

चालत्या कंटेनरने अचानक ब्रेक दाबला, भरधाव कार मागून धडकली, कारच्या मागून दुसरा कंटेनर घुसला


पुणे : पुणे शहरात भीषण अपघाताची घटना घडली आहे. नवले पुल परिसरात झालेल्या या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडलेल्या या अपघातात दोन ते तीन वाहनांना आग लागल्याने परिसरात मोठी धावपळ उडाली. या घटनेत सुमारे २० जण जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे, मात्र मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.


मिळालेल्या माहितीनुसार, दोन कंटेनर आणि एक कार यांची जोरदार धडक होऊन हा अपघात झाला. दोन कंटेनरच्या मधोमध एक कार अडकून पेटली. जळत असलेल्या कारमधून एक कुटुंब प्रवास करत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. आग विझवण्यात यश आले असून सध्या बचावकार्य सुरू आहे.


नवले पुल परिसरात अपघातांच्या घटना वारंवार घडत असल्याने या ठिकाणच्या सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अपघातानंतर काही काळासाठी नवले पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. सध्या रस्त्यावरची वाहतूक हळूहळू पूर्ववत केली जात आहे, मात्र परिसरात अजूनही पोलिसांचा ताफा तैनात आहे.






या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त करत, मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर केली.
Comments
Add Comment

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली

Navneet Rana : "हिंदूंनी किमान ३-४ मुलांना जन्म द्यावा"; लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून नवनीत राणांचा 'हुंकार', मौलाना कादरीला सडेतोड उत्तर

अमरावती : लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा आक्रमक

Sanjay Shirsat : "तुमचा डबा रुळावरून घसरलाय, आता काठावर बसा"; मंत्री शिरसाटांचा उद्धव ठाकरेंना टोला

छत्रपती संभाजीनगर : "उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाचा जीव केवळ मुंबईत अडकलेला आहे. नगरपालिका निवडणुकीत

Ladki Bahin Yojna : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेच्या ४० लाख महिला अपात्रतेच्या उंबरठ्यावर?

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक