नवले पुलावर भीषण अपघात, तीन वाहनांनी घेतला पेट, सात जणांचा मृत्यू!

चालत्या कंटेनरने अचानक ब्रेक दाबला, भरधाव कार मागून धडकली, कारच्या मागून दुसरा कंटेनर घुसला


पुणे : पुणे शहरात भीषण अपघाताची घटना घडली आहे. नवले पुल परिसरात झालेल्या या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडलेल्या या अपघातात दोन ते तीन वाहनांना आग लागल्याने परिसरात मोठी धावपळ उडाली. या घटनेत सुमारे २० जण जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे, मात्र मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.


मिळालेल्या माहितीनुसार, दोन कंटेनर आणि एक कार यांची जोरदार धडक होऊन हा अपघात झाला. दोन कंटेनरच्या मधोमध एक कार अडकून पेटली. जळत असलेल्या कारमधून एक कुटुंब प्रवास करत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. आग विझवण्यात यश आले असून सध्या बचावकार्य सुरू आहे.


नवले पुल परिसरात अपघातांच्या घटना वारंवार घडत असल्याने या ठिकाणच्या सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अपघातानंतर काही काळासाठी नवले पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. सध्या रस्त्यावरची वाहतूक हळूहळू पूर्ववत केली जात आहे, मात्र परिसरात अजूनही पोलिसांचा ताफा तैनात आहे.






या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त करत, मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर केली.
Comments
Add Comment

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार

Rajya Sabha Election 2026: राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरायला फक्त सहा दिवस उरले, शरद पवार राज्यसभा लढवणार की नाही?

मुंबई: येत्या १६ मार्चला राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील