शीतल म्हात्रे यांचा मोठा निर्णय : महापालिका निवडणूक लढवणार नाही, आमदारकीवर लक्ष केंद्रित!

मुंबई : शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे मुंबईच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर अनेक माजी नगरसेवकांनी महापालिकेच्या निवडणुकीसाठी हातपाय हलवण्यास सुरुवात केली आहे. यादरम्यान, अपेक्षेच्या विरुद्ध पाऊल उचलत शीतल म्हात्रे यांनी महापालिकेची निवडणूक लढवण्यास स्पष्ट नकार दिला आहे. पक्षातर्फे उमेदवारी मिळाली तरी त्या निवडणूक लढवणार नाहीत, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे.



“मी निवडणूक लढवणार नाही, पक्षाच्या उमेदवारासाठी काम करणार”


शीतल म्हात्रे यांनी सांगितले की, त्या दहिसरमधील वॉर्ड क्रमांक ८ च्या दोन वेळा नगरसेविका राहिल्या आहेत आणि पक्ष संघटनेत महिला पदाधिकारी म्हणूनही त्यांनी सक्रिय काम पाहिलं आहे. मात्र आता त्या स्वतः निवडणूक लढवणार नसून, वॉर्ड क्रमांक ७ मधून ज्याला पक्ष उमेदवारी देईल, त्याच्या समर्थनार्थ काम करणार आहेत. यावेळी मुंबई महापालिकेची निवडणूक लढवणार नसल्याचे शीतल म्हात्रे यांनी जाहीर केले.


शीतल म्हात्रे यांनी स्पष्ट केले की, आता त्यांचा फोकस स्थानिक निवडणुकीवर नसून आगामी विधानसभा निवडणुकीत आमदारकीसाठी प्रयत्न करणार आहेत. त्यांच्या मते, दोन कार्यकाळ नगरसेविका म्हणून काम करून त्यांनी स्थानिक प्रशासनाचा पुरेसा अनुभव घेतला आहे, आणि आता हे अनुभव मोठ्या पातळीवर उपयोगात आणायचे आहेत.


महायुतीकडून यावेळी मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अ.प.गट) मिळून निवडणूक लढवणार असून, या पार्श्वभूमीवर शीतल म्हात्रे यांचा हा निर्णय पक्षासाठी महत्त्वाचा ठरू शकतो.


मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून, शीतल म्हात्रे आता नगरसेविकेऐवजी आमदारकीच्या मैदानावर उतरायला सज्ज झाल्या आहेत, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : आता शाळेत मिळणार 'ड्रग्ज'च्या दुष्परिणामांचे धडे

मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; अंमली पदार्थमुक्त महाराष्ट्र व्यूहरचना आणि कृती योजनेबाबत

Central Railway : कर्जत-लोणावळा रेल्वे मार्ग पूर्णपणे पूर्ववत; 17 जुलैपासून अनेक एक्सप्रेस गाड्या पुन्हा मूळ मार्गावर

मुंबई : कर्जत-लोणावळा (Karjat lonavala) दरम्यानच्या मध्य रेल्वेच्या दक्षिण-पूर्व डाऊन मार्गावरील रेल्वे सेवा पूर्णपणे

Transformation of railway stations : पंतप्रधान मोदी उद्या ७५ स्थानके राष्ट्राला करणार समर्पित; 'अमृत भारत' योजनेचा वेग वाढला

मुंबई: रेल्वे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात आणि स्थानकांचे रूप पालटावे, या उद्देशाने

Pratap Sarnaik : ओला, उबरसह सर्व कंपन्यांना आता राज्य सरकारचा परवाना बंधनकारक

महाराष्ट्राचे नवे ॲग्रीगेटर धोरण लागू; रिक्षा टॅक्सीप्रमाणे चालकांना बॅच बंधनकारक मुंबई : महाराष्ट्रातील

Devendra Fadnavis : महाराष्ट्राला सर्वाधिक सुलभ शासकीय सेवा देणारे राज्य बनवा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; गव्हर्नन्स प्रोसेस रि-इंजिनियरिंग संदर्भात तिसऱ्या टप्प्याची बैठक मुंबई : राज्य

Mumbai News : पवई-विहार तलाव परिसरातील अवैध बांधकामांवर खासदार रवींद्र वायकर आक्रमक; केंद्राकडे तातडीच्या कारवाईची मागणी

मुंबई : पवई, पासपोली आणि विहार तलाव परिसरात सुरू असलेल्या कथित अवैध बांधकामांमुळे येथील जैवविविधता धोक्यात आली