एनएसईवर २४ कोटी खात्यांचा टप्पा ओलांडला गेला गुंतवणूकदार वाढीत २२ वर्षातील नवा उच्चांक प्रस्थापित!

मुंबई: नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया (NSE) कडून नोव्हेंबर २०२५ मध्ये आणखी एक टप्पा गाठला गेला आहे. एक्सचेंजने आपल्या दिलेल्या माहितीनुसार, एकूण युनिक ट्रेडिंग अकाउंट्स गुंतवणूकदारांची संख्या २४ कोटी (२४० दशलक्ष) ओलांडली गेली आहे. एक्सचेंजने दिलेल्या माहितीनुसार, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत, वैयक्तिक गुंतवणूकदार थेट सहभागी आणि म्युच्युअल फंडांद्वारे गुंतवणूक करणारे अशा दोन्ही प्रकारच्या गुंतवणूकदार एनएसई-सूचीबद्ध कंपन्यांपैकी १८.७५% हिस्सा बाळगतात.त्यामुळे २२ वर्षांतील हा नवा उच्चांक एनएसईत गाठला गेला आहे. गेल्या वर्षी एक्सचेंजने ऑक्टोबरमध्ये २० कोटींचा टप्पा (२०० दशलक्ष) पार केल्यानंतर अवघ्या एका वर्षात इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) हा टप्पा गाठण्यात एनएसई यशस्वी ठरले आहे. उपलब्ध माहितीनुसार, युनिक नोंदणीकृत गुंतवणूकदारांची संख्या (३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत) १२.२ कोटी असून २२ सप्टेंबर २०२५ रोजी १२ कोटी युनिक नोंदणीकृत गुंतवणूकदारांचा (१२० दशलक्ष) टप्पा ओलांडला आहे.


आता गुंतवणूकदार वेगवेगळ्या ब्रोकरमध्ये खाती ठेवू शकतात ज्यामुळे एकाच व्यक्तीसाठी अनेक क्लायंट कोड तयार होतात. महाराष्ट्राने ४ कोटींहून अधिक गुंतवणूकदार खात्यांसह (१७% वाटा) अव्वल स्थान कायम ठेवले आहे, त्यानंतर उत्तर प्रदेश (२.७ कोटी, ११% वाटा), गुजरात (२.१ कोटी, ९% वाटा), पश्चिम बंगाल (१.४ कोटी, ६% वाटा) आणि राजस्थान (१.४ कोटी, ६% वाटा) यांचा क्रमांक लागतो. माहितीनुसार, सर्व गुंतवणूकदार खात्यांमध्ये पहिल्या पाच राज्यांचा वाटा सुमारे ४९% होता, तर पहिल्या १० राज्यांचा वाटा ७३% पेक्षा जास्त होता.


आर्थिक समावेशनाने (Financial Inclusion) या वाढीत महत्वाची भूमिका बजावली आहे. भारतीय शेअर बाजारात कोविड महामारीनंतर गुंतवणूकदारांच्या सहभागात झालेल्या तीव्र वाढी ही गुंतवणूकदारांचे शिक्षण व गुंतवणूकदारांमध्ये वाढलेली जनजागृती यामुळे ही वाढ आणखी महत्त्वाची ठरली आहे. गेल्या पाच वर्षांत, निफ्टी ५० आणि निफ्टी ५०० निर्देशांकांनी अनुक्रमे १५% आणि १८% वार्षिक परतावा दिला आहे.


एनएसईने आपल्या दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,' पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माननीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारमण यांच्या नेतृत्वाखाली, गेल्या काही वर्षांत गुंतवणूकदारांच्या संरक्षणासाठी अनेक उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत ज्यामुळे बाजारपेठेतील आत्मविश्वास वाढला आहे, त्याचबरोबर प्रचंड डिजिटलायझेशन, शाश्वत नवोन्मेष (Sustainable Innvoation) मध्यमवर्गीयांची वाढ आणि प्रगतीशील धोरणात्मक उपाययोजना यासारख्या बाबीही समोर आल्या आहेत. एनएसई,सेबी आणि सरकारने गुंतवणूकदार जागरूकता आणि आर्थिक समावेशनासाठी सामूहिक वचनबद्धता बळकट केली आहे.'


गेल्या काही वर्षांत एनएसईने गुंतवणूकदार शिक्षणाच्या क्षेत्रात आपले प्रयत्न वाढवले आहेत. एनएसईने केवळ आर्थिक वर्ष २६ च्या पहिल्या सहामाहीत ११८७५ गुंतवणूकदार जागरूकता कार्यक्रम (IAP) आयोजित केले, ज्यामध्ये सुमारे ६.२ लाख सहभागी सहभागी झाले, जे संपूर्ण आर्थिक वर्ष २५ मध्ये १४६७९ होते तर ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत एनएसईचा गुंतवणूकदार संरक्षण निधी (आयपीएफ) १९% वार्षिक वाढीसह २७१९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.


या मोठ्या घडामोडीवर एनएसईचे मुख्य व्यवसाय विकास अधिकारी श्रीराम कृष्णन म्हणाले आहेत की,' मोबाइल-आधारित ट्रेडिंग सोल्यूशन्सचे मानकीकरण, अधिक सुव्यवस्थित नो युवर कस्टमर (केवायसी) प्रक्रियेची अंमलबजावणी आणि गुंतवणूकदार जागरूकता उपक्रमांना बळकटी देण्यासह गेल्या काही वर्षांत अंमलात आणलेल्या मजबूत उपाययोजनांमुळे किरकोळ गुंतवणूकदार भारतीय भांडवली बाजारांबद्दल आशावादी आहेत. या उपाययोजनांमुळे जागतिक व्यापार पद्धतींमध्ये बदल आणि वेगाने विकसित होणाऱ्या भूराजकीय परिस्थितीत स्थिर गुंतवणूकदारांचा सहभाग टिकवून ठेवण्यास मदत झाली आहे, तसेच बाजारपेठेतील सुलभता देखील सुधारली आहे, विशेषतः टियर २,३ आणि ४ शहरांमध्ये राहणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी... गुंतवणूकदारांना आता विविध प्रकारच्या साधनांमध्ये प्रवेश आहे ज्यामध्ये क्विटी, कर्ज सिक्युरिटीज, एक्सचेंज-ट्रेडेड फंड (ईटीएफ), रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (आरईआयटी), इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (इनव्हिट), सरकारी बाँड्स आणि कॉर्पोरेट बाँड्स यांचा समावेश आहे जे तंत्रज्ञान-चालित आणि समावेशक आर्थिक परिसंस्थेच्या उत्क्रांतीचे प्रतिबिंब आहेत. या प्रयत्नांमुळे या वर्षी एक्सचेंजने आणखी एक मोठा टप्पा गाठला, नोव्हेंबरमध्ये एनएसईवरील गुंतवणूकदार खात्यांची संख्या २४ कोटींपेक्षा जास्त झाली.'

Comments
Add Comment

Palghar : अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या पालघरची सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेंनी केली पाहणी

पालघर : पालघर जिल्ह्यात २२ ते २४ जुलै २०२६ या कालावधीत झालेल्या विक्रमी अतिवृष्टीमुळे सार्वजनिक रस्ते, पूल आणि

Kangana Ranaut : समाज म्हणून आपण अपयशी, आत्मपरीक्षण करावे लागेल; कंगना राणावत यांची संतप्त प्रतिक्रिया

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याप्रकरणी माफी मागणाऱ्या एका

Maharashtra Weather Update : पुढील चार दिवसांसाठी विजांचा कडकडाट आणि काही जिल्ह्यांत जोरदार पावसाचा वेधशाळेचा अंदाज

मुंबई : मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने राज्यासाठी पुढील चार दिवसांचा हवामानाचा अंदाज जाहीर केला असून,

Bomb Making Paper In Collage : धक्कादायक! अयोध्येच्या मेडिकल कॉलेजच्या एक्स-रे विभागात सापडला बॉम्ब बनवण्याचा कथित आराखडा; तीन विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

अयोध्या : उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील राजर्षी दशरथ मेडिकल कॉलेजमध्ये शनिवारी सकाळी एक धक्कादायक प्रकार

Tax Devolution To Maharashtra : केंद्र सरकारकडून राज्यांना १ लाख हजार कोटींचे कर वितरण

महाराष्ट्राला ७ हजार २२ कोटींचा अतिरिक्त निधी नवी दिल्ली : राज्यांच्या वित्तीय व्यवस्थेला बळकटी देत

Nashik Crime : अखेर 'त्या' शिक्षिकेच्या हत्येचा लागला छडा, प्रेमसंबंध अन्...

Nashik Crime News : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात एका शिक्षिकेच्या हत्येने तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. अखेर