एनएसईवर २४ कोटी खात्यांचा टप्पा ओलांडला गेला गुंतवणूकदार वाढीत २२ वर्षातील नवा उच्चांक प्रस्थापित!

मुंबई: नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया (NSE) कडून नोव्हेंबर २०२५ मध्ये आणखी एक टप्पा गाठला गेला आहे. एक्सचेंजने आपल्या दिलेल्या माहितीनुसार, एकूण युनिक ट्रेडिंग अकाउंट्स गुंतवणूकदारांची संख्या २४ कोटी (२४० दशलक्ष) ओलांडली गेली आहे. एक्सचेंजने दिलेल्या माहितीनुसार, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत, वैयक्तिक गुंतवणूकदार थेट सहभागी आणि म्युच्युअल फंडांद्वारे गुंतवणूक करणारे अशा दोन्ही प्रकारच्या गुंतवणूकदार एनएसई-सूचीबद्ध कंपन्यांपैकी १८.७५% हिस्सा बाळगतात.त्यामुळे २२ वर्षांतील हा नवा उच्चांक एनएसईत गाठला गेला आहे. गेल्या वर्षी एक्सचेंजने ऑक्टोबरमध्ये २० कोटींचा टप्पा (२०० दशलक्ष) पार केल्यानंतर अवघ्या एका वर्षात इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) हा टप्पा गाठण्यात एनएसई यशस्वी ठरले आहे. उपलब्ध माहितीनुसार, युनिक नोंदणीकृत गुंतवणूकदारांची संख्या (३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत) १२.२ कोटी असून २२ सप्टेंबर २०२५ रोजी १२ कोटी युनिक नोंदणीकृत गुंतवणूकदारांचा (१२० दशलक्ष) टप्पा ओलांडला आहे.


आता गुंतवणूकदार वेगवेगळ्या ब्रोकरमध्ये खाती ठेवू शकतात ज्यामुळे एकाच व्यक्तीसाठी अनेक क्लायंट कोड तयार होतात. महाराष्ट्राने ४ कोटींहून अधिक गुंतवणूकदार खात्यांसह (१७% वाटा) अव्वल स्थान कायम ठेवले आहे, त्यानंतर उत्तर प्रदेश (२.७ कोटी, ११% वाटा), गुजरात (२.१ कोटी, ९% वाटा), पश्चिम बंगाल (१.४ कोटी, ६% वाटा) आणि राजस्थान (१.४ कोटी, ६% वाटा) यांचा क्रमांक लागतो. माहितीनुसार, सर्व गुंतवणूकदार खात्यांमध्ये पहिल्या पाच राज्यांचा वाटा सुमारे ४९% होता, तर पहिल्या १० राज्यांचा वाटा ७३% पेक्षा जास्त होता.


आर्थिक समावेशनाने (Financial Inclusion) या वाढीत महत्वाची भूमिका बजावली आहे. भारतीय शेअर बाजारात कोविड महामारीनंतर गुंतवणूकदारांच्या सहभागात झालेल्या तीव्र वाढी ही गुंतवणूकदारांचे शिक्षण व गुंतवणूकदारांमध्ये वाढलेली जनजागृती यामुळे ही वाढ आणखी महत्त्वाची ठरली आहे. गेल्या पाच वर्षांत, निफ्टी ५० आणि निफ्टी ५०० निर्देशांकांनी अनुक्रमे १५% आणि १८% वार्षिक परतावा दिला आहे.


एनएसईने आपल्या दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,' पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माननीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारमण यांच्या नेतृत्वाखाली, गेल्या काही वर्षांत गुंतवणूकदारांच्या संरक्षणासाठी अनेक उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत ज्यामुळे बाजारपेठेतील आत्मविश्वास वाढला आहे, त्याचबरोबर प्रचंड डिजिटलायझेशन, शाश्वत नवोन्मेष (Sustainable Innvoation) मध्यमवर्गीयांची वाढ आणि प्रगतीशील धोरणात्मक उपाययोजना यासारख्या बाबीही समोर आल्या आहेत. एनएसई,सेबी आणि सरकारने गुंतवणूकदार जागरूकता आणि आर्थिक समावेशनासाठी सामूहिक वचनबद्धता बळकट केली आहे.'


गेल्या काही वर्षांत एनएसईने गुंतवणूकदार शिक्षणाच्या क्षेत्रात आपले प्रयत्न वाढवले आहेत. एनएसईने केवळ आर्थिक वर्ष २६ च्या पहिल्या सहामाहीत ११८७५ गुंतवणूकदार जागरूकता कार्यक्रम (IAP) आयोजित केले, ज्यामध्ये सुमारे ६.२ लाख सहभागी सहभागी झाले, जे संपूर्ण आर्थिक वर्ष २५ मध्ये १४६७९ होते तर ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत एनएसईचा गुंतवणूकदार संरक्षण निधी (आयपीएफ) १९% वार्षिक वाढीसह २७१९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.


या मोठ्या घडामोडीवर एनएसईचे मुख्य व्यवसाय विकास अधिकारी श्रीराम कृष्णन म्हणाले आहेत की,' मोबाइल-आधारित ट्रेडिंग सोल्यूशन्सचे मानकीकरण, अधिक सुव्यवस्थित नो युवर कस्टमर (केवायसी) प्रक्रियेची अंमलबजावणी आणि गुंतवणूकदार जागरूकता उपक्रमांना बळकटी देण्यासह गेल्या काही वर्षांत अंमलात आणलेल्या मजबूत उपाययोजनांमुळे किरकोळ गुंतवणूकदार भारतीय भांडवली बाजारांबद्दल आशावादी आहेत. या उपाययोजनांमुळे जागतिक व्यापार पद्धतींमध्ये बदल आणि वेगाने विकसित होणाऱ्या भूराजकीय परिस्थितीत स्थिर गुंतवणूकदारांचा सहभाग टिकवून ठेवण्यास मदत झाली आहे, तसेच बाजारपेठेतील सुलभता देखील सुधारली आहे, विशेषतः टियर २,३ आणि ४ शहरांमध्ये राहणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी... गुंतवणूकदारांना आता विविध प्रकारच्या साधनांमध्ये प्रवेश आहे ज्यामध्ये क्विटी, कर्ज सिक्युरिटीज, एक्सचेंज-ट्रेडेड फंड (ईटीएफ), रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (आरईआयटी), इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (इनव्हिट), सरकारी बाँड्स आणि कॉर्पोरेट बाँड्स यांचा समावेश आहे जे तंत्रज्ञान-चालित आणि समावेशक आर्थिक परिसंस्थेच्या उत्क्रांतीचे प्रतिबिंब आहेत. या प्रयत्नांमुळे या वर्षी एक्सचेंजने आणखी एक मोठा टप्पा गाठला, नोव्हेंबरमध्ये एनएसईवरील गुंतवणूकदार खात्यांची संख्या २४ कोटींपेक्षा जास्त झाली.'

Comments
Add Comment

West Bengal : पश्चिम बंगाल सरकारच्या निर्णयाने 'शांतीदूतांना' धक्का ?

कोलकाता : पश्चिम बंगालमार्गे भारतामध्ये बिनबोभाट घुसखोरी अनेक वर्षे सुरू होती. पण भाजपच्या नेतृत्वात सरकार

Crude oil Stock : काय म्हणता ? भारताकडे एवढाच उरला तेलसाठा ?

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज देशवासियांना मोठा दिलासा

IPL 2026 मध्ये वाढली Playoff ची चुरस

धरमशाला : आयपीएल २०२६ मध्ये आतापर्यंत ५४ साखळी सामने (लीग मॅच) झाले आहेत. धरमशाला येथे आज दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब

Sunil Gavasakar : IPL Final या दोन टीममध्येच रंगणार, गावस्करांची भविष्यवाणी

IPL 2026 FINAL PREDICATION : आयपीएल २०२६ मध्ये आज दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात साखळी सामना होत आहे. हा यंदाच्या

Meghna Sakore Bordikar : 'राज्य कामगार विमा योजनेच्या सेवा अधिक सक्षम करा'

मुंबई : राज्यातील कामगारांना अधिक दर्जेदार आणि सुलभ आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य कामगार विमा

Met Gala 2026 : राजा रवी वर्मा ते 'व्हीनस डी मिलो' : मेट गाला २०२६ च्या रेड कार्पेटवर पाहायला मिळाली जगप्रसिद्ध कलाकृतींची झलक!

मेट गाला २०२६ (Met Gala 2026) च्या रेड कार्पेटवर यंदा फॅशन आणि जागतिक कलेचा एक अनोखा आणि विलोभनीय संगम पाहायला मिळाला. अनेक