आळंदीला निघालेल्या वारकऱ्यांवर काळाचा घाला, कंटेनर दिडींत घुसल्याने महिला किर्तनकाराचा मृत्यू!

आळंदी: आळंदीला पायी निघालेल्या दिंडीमध्ये कंटेनर ट्रेलर घुसल्याने झालेल्या अपघातात उरण येथील कीर्तनकार मंजुळा तांडेल यांचे निधन झाले आहे. गेल्या १८ वर्षांपासून उरण तालुक्यातील जासई येथील शंकर मंदिरातून उरण ते आळंदी पायी दिंडीचे आयोजन करण्यात येत आहे. यंदाही ७ नोव्हेंबर ते १३ नोव्हेंबर या कालावधीमध्ये दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. ज्यात उरण आणि जासई, करळ, कामोठे, पारगावसह इतर गावांतील अंदाजे १५० भाविक या दिंडीत सामील झाले होते. मात्र ज्ञानेश्वरांच्या भेटीला जाणाऱ्या या भाविकांवर काळाने घाला केला.


काल, ११ नोव्हेंबरच्या रात्री कामशेत येथील काळभैरव मंदिरात मुक्काम करून आज सकाळी ५.४५ वाजता दिंडी इंदुरीच्या दिशेने रवाना झाली होती. काही किलोमीटर अंतर पुढे गेल्यावर एका भरधाव कंटेनर ट्रेलरने दिंडीतील भाविकांना जोरदार धडक दिली. या अपघातात उरण तालुक्यातील करळ येथील मंजुळा तांडेल (वय ५४ ) यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य १० भाविक जखमी झाले आहेत. यातील दोन महिला गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार करण्यात येत आहेत.दरम्यान कंटेनर चालक चंद्रशेखर रमाकांत याच्याविरोधात कामशेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




दत्तात्रय विष्णू घरत (वय ६२), हिराबाई पोशा पाटील (वय ६५), शारदा नितीन ठाकूर (वय ५१), कामिनी दत्तात्रय गांधी (वय ३०), अपर्णा अनंत ठाकूर (वय ४२), प्रभाकर लक्ष्मण तांडेल (वय ६२), अशोक पायप्पा गंधाला (वय ३०) नंदू अप्पा चोपडे (वय ५५) ज्ञानदेव निवृत्ती गाडे (वय ५७), तानाजी पुनाजी हेमाडे (वय २७) अशी जखमींची नावे आहेत.

Comments
Add Comment

३ इडियट्सचे १६ वर्षे: ५ कारणे ज्यामुळे राजकुमार हिरानींचा 'हा' चित्रपट आजही तितकाच ताजा वाटतो

मुंबई : राजकुमार हिरानी हे मोजक्या अशा फिल्ममेकर्सपैकी आहेत, ज्यांच्या कथा केवळ मनोरंजन करत नाहीत, तर दीर्घकाळ

आधी रेकी, मग बुरखा घालून दरोडा; उच्चभ्रू परिसरात भरदिवसा चोरी

नवी मुंबई : नवी मुंबईतील सीवूड्स परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या सशस्त्र दरोड्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

चहा बनवण्याची योग्य पद्धत,पित्त व ॲसिडिटीच्या त्रासापासून मिळेल कायमची सुटका

मुंबईकरांच्या दिवसाची सुरुवाट होतो ती म्हणजे चहाने ... भारतातच नाही तर संपूर्ण जगात असंख्य असे चहा प्रेमी आहेत .

श्रीराम लाईफ इन्शुरन्समधून पिरामल फायनान्स बाहेर पडणार 'या' कारणामुळे,६०० कोटीचा एकूण सौदा जाहीर

मुंबई: पिरामल फायनान्स लिमिटेड (Piramal Finance Limited) कंपनीने श्रीराम लाईफ इन्शुरन्स कंपनीतील आपला संपूर्ण १४.७२% हिस्सा

या वर्षीचा ख्रिसमस ठरतोय खास का ? जाणून घेऊया कारण

अंकांचा अनोखा योग जुळून आला आहे .तारीख बघा २५ /१२/२५ आहे ना आश्चर्यकारक डिसेंबर महिना सुरु झाला की सर्वांना आतुरता

उच्च रक्तदाबाने हैराण झाला आहात? मग रोज खा सुकं खोबर

रोज जेवण बनवताना वेगवेगळ्या पदार्थांचा वापर केला जातो.त्यामध्ये आवर्जून वापरला जाणारा पदार्थ म्हणजे