राज्यात गारठा वाढला !

उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडीचा सर्वाधिक प्रभाव, जळगावमध्ये तापमान ,१० अंश सेल्सियसवर


मुंबई  : राज्यात पावसाने विश्रांती घेतली असून थंडीचे जोरदार आगमन झाले. पारा घसरू लागल्याने हुडहुडी वाढली आहे. सध्या उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडीचा जोर जास्त आहे. पश्चिम महाराष्ट्रात सौम्य तर कोकणात थंडी कमी आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. दरम्यान उत्तर भारतात गारठा वाढल्याने राज्यातही त्याचा परिणाम होत आहे, दरम्यान जळगावमध्ये महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमानाची नोंद झाली आहे.
उत्तर भारतात सध्या बर्फवृष्टी होत आहे याचा परिणाम महाराष्ट्रातील हवामानावरही देखील विशेषकरून उत्तर महाराष्ट्रातील जळगावमध्ये पारा केवळ १० अंश सेल्सियसपर्यंत घसरला. नाशिकमध्ये किमान तापमान १२ अंश सेल्सियस इतके राहण्याची शक्यता आहे. मुंबई तसेच कोकणात आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज तसेच राज्यातील इतर भागांपेक्षा थंडी कमी राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि परिसरात किमान तापमान १६ अंश सेल्सियस पेक्षा कमी झाले आहे. सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वरमध्ये किमान तापमान १३.२ अंश सेल्सियस इतके नोंदविले गेले. तर कोल्हापूरमध्ये १९ अंश सेल्सियस इतके नोंदविले. मराठवाड्यातील जालना, संभाजीनगर आणि परभणीमध्ये किमान तापमान १३ अंश सेल्सियस दरम्यान आहे. याशिवाय नांदेड, धाराशिव, लातूर, हिंगोली व बीडमध्येही थंडी वाढली आहे, तर विदर्भातील अमरावतीत पारा चांगलाच घसरला असून तापमान १३ अंश सेल्सियसपर्यंत नोंदवले गेले आहे. कोकणपट्ट्यात हवामान उबदार पण धुकेदार राहील. पुणे आणि नाशिक विभागात सकाळ-संध्याकाळ गारठा वाढणार आहे. पुढील आठवड्याच्या शेवटी तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबईमध्ये मात्र १४ नोव्हेंबरपर्यंत कमाल तापमानात फारसा दिलासा मिळेल अशी शक्यता नाही.

Comments
Add Comment

Drugs Case : मीरा रोडमध्ये २३.३ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त, तिघांना अटक

मीरा रोड : मुंबईलगतच्या मीरा-भाईंदर शहरात पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत वेगवेगळ्या कारवाईत एकूण तेवीस लाख तीस

Ashok Kharat Case : धर्माच्या आड काळे कारनामे! ‘भोंदू’ अशोक खरात प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे

मुंबई : धर्माच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण आणि कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप असलेला अशोक खरात (Ashok

Toll Exemption : सिंधुदुर्गवासियांना ‘टोल माफ’, पालकमंत्री नितेश राणेंनी दिला दिलासा

सावंतवाडी : ओसरगाव टोल नाक्यावर मी आमदार असताना सिंधुदुर्ग जिल्हावासियांना टोल लागू दिला नव्हता. आता महामार्ग

Nashik Simhastha Kumbh Mela : 'कुंभमेळा कामांना अधिक गती देणार'

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे कामे समाधानकारकरितीने होत असून आगामी

River Linking : 'नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्य दुष्काळमुक्त करणार'

नाशिक : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या

E-KYC Mandatory for Teachers : शिक्षकांसाठी ई-केवायसी अनिवार्य; मे महिन्याच्या वेतनावर परिणाम होण्याची शक्यता

मुंबई : राज्य शासनाच्या वित्त विभागाने दिलेल्या आदेशानुसार शालार्थ प्रणालीद्वारे वेतन घेणाऱ्या सर्व शिक्षक व