राज्यात गारठा वाढला !

उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडीचा सर्वाधिक प्रभाव, जळगावमध्ये तापमान ,१० अंश सेल्सियसवर


मुंबई  : राज्यात पावसाने विश्रांती घेतली असून थंडीचे जोरदार आगमन झाले. पारा घसरू लागल्याने हुडहुडी वाढली आहे. सध्या उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडीचा जोर जास्त आहे. पश्चिम महाराष्ट्रात सौम्य तर कोकणात थंडी कमी आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. दरम्यान उत्तर भारतात गारठा वाढल्याने राज्यातही त्याचा परिणाम होत आहे, दरम्यान जळगावमध्ये महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमानाची नोंद झाली आहे.
उत्तर भारतात सध्या बर्फवृष्टी होत आहे याचा परिणाम महाराष्ट्रातील हवामानावरही देखील विशेषकरून उत्तर महाराष्ट्रातील जळगावमध्ये पारा केवळ १० अंश सेल्सियसपर्यंत घसरला. नाशिकमध्ये किमान तापमान १२ अंश सेल्सियस इतके राहण्याची शक्यता आहे. मुंबई तसेच कोकणात आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज तसेच राज्यातील इतर भागांपेक्षा थंडी कमी राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि परिसरात किमान तापमान १६ अंश सेल्सियस पेक्षा कमी झाले आहे. सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वरमध्ये किमान तापमान १३.२ अंश सेल्सियस इतके नोंदविले गेले. तर कोल्हापूरमध्ये १९ अंश सेल्सियस इतके नोंदविले. मराठवाड्यातील जालना, संभाजीनगर आणि परभणीमध्ये किमान तापमान १३ अंश सेल्सियस दरम्यान आहे. याशिवाय नांदेड, धाराशिव, लातूर, हिंगोली व बीडमध्येही थंडी वाढली आहे, तर विदर्भातील अमरावतीत पारा चांगलाच घसरला असून तापमान १३ अंश सेल्सियसपर्यंत नोंदवले गेले आहे. कोकणपट्ट्यात हवामान उबदार पण धुकेदार राहील. पुणे आणि नाशिक विभागात सकाळ-संध्याकाळ गारठा वाढणार आहे. पुढील आठवड्याच्या शेवटी तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबईमध्ये मात्र १४ नोव्हेंबरपर्यंत कमाल तापमानात फारसा दिलासा मिळेल अशी शक्यता नाही.

Comments
Add Comment

Navi Mumbai Airport Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा भव्य पुतळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १२ फूट उंच कांस्य अर्धपुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य १२ फूट उंच कांस्य

Fake cotton seeds : खरीपच्या तोंडावर मोठा घोटाळा उघड ! जामनेरमध्ये बनावट कापूस बियाण्यांचा साठा जप्त

Fake cotton seeds : जळगाव जिल्ह्यात खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा मोठा डाव उधळून लावण्यात आला आहे.

PM Suryaghar Yojana : सौर ऊर्जेत महाराष्ट्राची दमदार झेप ! पीएम सूर्यघर योजनेत ८ राष्ट्रीय पुरस्कार; जळगाव देशात टॉप-१० मध्ये

PM Suryaghar Yojana : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्राने (Maharashtra) देशभरात आपली वेगळी छाप उमटवली

Minister Pratap Sarnaik : एसटी बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात खासगी वाहनांना 'नो एन्ट्री'; मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

- अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात राज्यव्यापी धडक मोहीम मुंबई : महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या 'एसटी'

Maharashtra Monsoon 2026 : मान्सून महाराष्ट्राच्या दारात! पुढील ४८ तास निर्णायक; अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट

मुंबई : राज्यातील नागरिक आणि शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपण्याच्या मार्गावर असून नैऋत्य मान्सून

El Nino : एल निनोची धास्ती! दुष्काळाच्या भीतीने शेतकरी अस्वस्थ; मदतीसाठी हेल्पलाइनवर कॉल्समध्ये ६२% वाढ

मुंबई : राज्यात यंदा ‘एल निनो’च्या (El Nino) संभाव्य प्रभावामुळे पावसाबाबत अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले असून,