राज्यात गारठा वाढला !

उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडीचा सर्वाधिक प्रभाव, जळगावमध्ये तापमान ,१० अंश सेल्सियसवर


मुंबई  : राज्यात पावसाने विश्रांती घेतली असून थंडीचे जोरदार आगमन झाले. पारा घसरू लागल्याने हुडहुडी वाढली आहे. सध्या उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडीचा जोर जास्त आहे. पश्चिम महाराष्ट्रात सौम्य तर कोकणात थंडी कमी आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. दरम्यान उत्तर भारतात गारठा वाढल्याने राज्यातही त्याचा परिणाम होत आहे, दरम्यान जळगावमध्ये महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमानाची नोंद झाली आहे.
उत्तर भारतात सध्या बर्फवृष्टी होत आहे याचा परिणाम महाराष्ट्रातील हवामानावरही देखील विशेषकरून उत्तर महाराष्ट्रातील जळगावमध्ये पारा केवळ १० अंश सेल्सियसपर्यंत घसरला. नाशिकमध्ये किमान तापमान १२ अंश सेल्सियस इतके राहण्याची शक्यता आहे. मुंबई तसेच कोकणात आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज तसेच राज्यातील इतर भागांपेक्षा थंडी कमी राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि परिसरात किमान तापमान १६ अंश सेल्सियस पेक्षा कमी झाले आहे. सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वरमध्ये किमान तापमान १३.२ अंश सेल्सियस इतके नोंदविले गेले. तर कोल्हापूरमध्ये १९ अंश सेल्सियस इतके नोंदविले. मराठवाड्यातील जालना, संभाजीनगर आणि परभणीमध्ये किमान तापमान १३ अंश सेल्सियस दरम्यान आहे. याशिवाय नांदेड, धाराशिव, लातूर, हिंगोली व बीडमध्येही थंडी वाढली आहे, तर विदर्भातील अमरावतीत पारा चांगलाच घसरला असून तापमान १३ अंश सेल्सियसपर्यंत नोंदवले गेले आहे. कोकणपट्ट्यात हवामान उबदार पण धुकेदार राहील. पुणे आणि नाशिक विभागात सकाळ-संध्याकाळ गारठा वाढणार आहे. पुढील आठवड्याच्या शेवटी तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबईमध्ये मात्र १४ नोव्हेंबरपर्यंत कमाल तापमानात फारसा दिलासा मिळेल अशी शक्यता नाही.

Comments
Add Comment

Ahilyanagar : जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान ; निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह, राजकीय वातावरण तापले

अहिल्यानगर (राहुरी प्रतिनिधी) : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Ahilyanagar District Central Cooperative Bank) होवू घातलेल्या

Ahilyanagar : श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई; एमडी तस्कर जेरबंद, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर (श्रीरामपूर) : श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी मोठी

Ketan Agrawal Murder Case : 'मला त्याला स्लो पॉयझन देऊन मारायचं होतं..';केतन हत्याकांड प्रकरणातील 'त्या' गुप्त कटामागचा मास्टरमाइंड कोण?

केतन अग्रवाल हत्याकांडात धक्कादायक दावा; 'स्लो पॉयझन' देण्याचाही कट असल्याची तपासात चर्चा पुणे : केतन

Minister Radhakrishna Vikhe Patil : मतदार यादीत घुसखोरांना जागा नाही ; पुनरिक्षण मोहिमेत कार्यकर्त्यांनी पुढे या : ना. राधाकृष्ण विखे पाटील

Ahilyanagar (Shevgaon) : मतदार यादीची सखोल पुनरिक्षण मोहीम भविष्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे.सरकारी स्तरावर काम सुरू असले

Wardha Murder : वर्ध्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना! 12 वर्षांच्या मुलीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; नराधमांनी ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा

वर्धा : वर्धा  (wardha) जिल्ह्यातील रोठा गावातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली

Pune Metro : पुणेकरांसाठी गुड न्यूज! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला नवा मुहूर्त; वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका!

पुणे : पुण्यातील ट्रॅफिक जॅम, विशेषतः हिंजवडी आयटी पार्क परिसरात होणाऱ्या रोजच्या वाहतूक कोंडीने त्रस्त