इमारतीला आग, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू


सांगली : विटा शहरात एका तीन मजली इमारतीला आग लागली. इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या स्टील फर्निचरच्या दुकानातून आगीची सुरुवात झाली. आगीने क्षणात रौद्ररूप धारण केले आणि ती तिन्ही मजल्यांवर पसरली. या दुर्घटनेत इमारतीमधील एका कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन वर्षांच्या एका चिमुकलीचा समावेश आहे. दोन जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


प्राथमिक अंदाजानुसार आग शॉर्ट सर्किटमुळे लागली. आगीत पूर्ण इमारत जळून खाक झाली. आग प्रकरणी नियमानुसार चौकशी होईल आणि दोषी आढळलेल्यांवर कारवाई होईल.


आग रात्री उशिरा लागली. ज्यावेळी आग लागली त्यावेळी जोशी कुटुंब गाढ झोपेत होते त्यामुळे आग पसरली तरी त्यांना संकटाची जाणीव झाली नाही. जेव्हा लक्षात आले त्यावेळी वेळ निघून गेली होती.


 

सांगली जिल्ह्यातील विटा शहरात इमारतीला आग, चौघांचा मृत्यू


विष्णू जोशी (४७) - कुटुंबप्रमुख


सुनंदा विष्णू जोशी (४२) - कुटुंबप्रमुखाची पत्नी


प्रियांका योगेश जोशी (२५) - कुटुंबप्रमुखाची मुलगी


सृष्टी इंगळे (२) - कुटुंबप्रमुखाची नात


Comments
Add Comment

Sangli Bailgada Race : धुरळा उडवला, फॉर्च्युनर जिंकली! 'हेलिकॉप्टर बैज्या अन् ब्रेक फेल' जोडीने सांगलीत मारले मैदान; पुढच्यावर्षी विजेत्याला थेट BMW कार मिळणार

सांगली : सांगलीमध्ये चंद्रहार पाटील (Chandrahaar Patil) यांनी आयोजित केलेल्या 'श्रीनाथ केसरी' बैलगाडी शर्यतीचा अंतिम निकाल

तेजस लढाऊ विमानांसाठी मोठा करार!

भारत अमेरिकेकडून ११३ जीई इंजिन खरेदी करणार,  स्वदेशी जेट उत्पादनाला मिळणार चालना हैदराबाद : हिंदुस्तान

राज्यात तापमानाचा पारा घसरला! महाबळेश्वरपेक्षा जळगावात थंडी वाढली

मुंबई: हिमालयात चार दिवसांपूर्वी झालेल्या हिमवृष्टीमुळे मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील तापमानाचा पारा

पंढरपुरातील पांडुरंगाच्या नवीन लाकडी रथाचे प्रस्थान

कोकणातील कारागिरांनी पूर्ण केले पवित्र कार्य पंढरपूर : पंढरपूर येथील श्री क्षेत्र विठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथे

गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी टीईटी परीक्षेकरिता आधुनिक तंत्राचा वापर

मुंबई: शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) बोगस उमेदवारांसह इतर कोणतेही गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य परीक्षा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नोंदणी ब्रिटिश सरकारकडे करणे अपेक्षित होते का ?

सरसंघचालक मोहन भागवत यांचा काँग्रेसला सवाल मुंबई : "आरएसएसची स्थापना १९२५ मध्ये झाली; मग आम्ही ब्रिटिश सरकारकडे