इमारतीला आग, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू


सांगली : विटा शहरात एका तीन मजली इमारतीला आग लागली. इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या स्टील फर्निचरच्या दुकानातून आगीची सुरुवात झाली. आगीने क्षणात रौद्ररूप धारण केले आणि ती तिन्ही मजल्यांवर पसरली. या दुर्घटनेत इमारतीमधील एका कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन वर्षांच्या एका चिमुकलीचा समावेश आहे. दोन जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


प्राथमिक अंदाजानुसार आग शॉर्ट सर्किटमुळे लागली. आगीत पूर्ण इमारत जळून खाक झाली. आग प्रकरणी नियमानुसार चौकशी होईल आणि दोषी आढळलेल्यांवर कारवाई होईल.


आग रात्री उशिरा लागली. ज्यावेळी आग लागली त्यावेळी जोशी कुटुंब गाढ झोपेत होते त्यामुळे आग पसरली तरी त्यांना संकटाची जाणीव झाली नाही. जेव्हा लक्षात आले त्यावेळी वेळ निघून गेली होती.


 

सांगली जिल्ह्यातील विटा शहरात इमारतीला आग, चौघांचा मृत्यू


विष्णू जोशी (४७) - कुटुंबप्रमुख


सुनंदा विष्णू जोशी (४२) - कुटुंबप्रमुखाची पत्नी


प्रियांका योगेश जोशी (२५) - कुटुंबप्रमुखाची मुलगी


सृष्टी इंगळे (२) - कुटुंबप्रमुखाची नात


Comments
Add Comment

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात

संक्रांतीच्या उत्सवाला गालबोट; अहिल्यानगर जिल्ह्यात पतंग उडवताना चिमुकल्याचा....

अहिल्यानगर : मकर संक्रांतीच्या दिवशी आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यात एक हृदयद्रावक