इमारतीला आग, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू


सांगली : विटा शहरात एका तीन मजली इमारतीला आग लागली. इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या स्टील फर्निचरच्या दुकानातून आगीची सुरुवात झाली. आगीने क्षणात रौद्ररूप धारण केले आणि ती तिन्ही मजल्यांवर पसरली. या दुर्घटनेत इमारतीमधील एका कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन वर्षांच्या एका चिमुकलीचा समावेश आहे. दोन जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


प्राथमिक अंदाजानुसार आग शॉर्ट सर्किटमुळे लागली. आगीत पूर्ण इमारत जळून खाक झाली. आग प्रकरणी नियमानुसार चौकशी होईल आणि दोषी आढळलेल्यांवर कारवाई होईल.


आग रात्री उशिरा लागली. ज्यावेळी आग लागली त्यावेळी जोशी कुटुंब गाढ झोपेत होते त्यामुळे आग पसरली तरी त्यांना संकटाची जाणीव झाली नाही. जेव्हा लक्षात आले त्यावेळी वेळ निघून गेली होती.


 

सांगली जिल्ह्यातील विटा शहरात इमारतीला आग, चौघांचा मृत्यू


विष्णू जोशी (४७) - कुटुंबप्रमुख


सुनंदा विष्णू जोशी (४२) - कुटुंबप्रमुखाची पत्नी


प्रियांका योगेश जोशी (२५) - कुटुंबप्रमुखाची मुलगी


सृष्टी इंगळे (२) - कुटुंबप्रमुखाची नात


Comments
Add Comment

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आणखी एक अपघात, वाहतुकीची कोंडीच कोंडी

पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ पुण्याकडून मुंबईच्या दिशेने प्रोपिलीन वायू

आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल मिसिंग लिंकचे कामही लवकरात लवकर

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १२ हेक्टर जागा मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय १०० विद्यार्थी प्रवेश ⁠४३०

पुणे एक्सप्रेस वे अपघात प्रकरणी महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेच्या १३९ फेऱ्या रद्द

मुंबई : पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या

एक्सप्रेवेवर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी अन् २५ किलोमीटर पर्यंत रांगा; नेमकं पुण्यात घडलं काय ?

लोणावळा : मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवारी सायंकाळी घडलेल्या एका अपघातामुळे संपूर्ण मार्गावर

Congress: काँग्रेसमधला वाद चव्हाट्यावर, नगरसेवक थेट दिल्लीत पोहोचले, बैठकीत नेमकं घडलं काय?

दिल्ली: चंद्रपूर महापालिकेत सर्वाधिक जागा जिंकूनही काँग्रेसमध्ये गटातील राजकारणामुळे सत्ता गमावण्याची वेळ