इमारतीला आग, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू


सांगली : विटा शहरात एका तीन मजली इमारतीला आग लागली. इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या स्टील फर्निचरच्या दुकानातून आगीची सुरुवात झाली. आगीने क्षणात रौद्ररूप धारण केले आणि ती तिन्ही मजल्यांवर पसरली. या दुर्घटनेत इमारतीमधील एका कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन वर्षांच्या एका चिमुकलीचा समावेश आहे. दोन जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


प्राथमिक अंदाजानुसार आग शॉर्ट सर्किटमुळे लागली. आगीत पूर्ण इमारत जळून खाक झाली. आग प्रकरणी नियमानुसार चौकशी होईल आणि दोषी आढळलेल्यांवर कारवाई होईल.


आग रात्री उशिरा लागली. ज्यावेळी आग लागली त्यावेळी जोशी कुटुंब गाढ झोपेत होते त्यामुळे आग पसरली तरी त्यांना संकटाची जाणीव झाली नाही. जेव्हा लक्षात आले त्यावेळी वेळ निघून गेली होती.


 

सांगली जिल्ह्यातील विटा शहरात इमारतीला आग, चौघांचा मृत्यू


विष्णू जोशी (४७) - कुटुंबप्रमुख


सुनंदा विष्णू जोशी (४२) - कुटुंबप्रमुखाची पत्नी


प्रियांका योगेश जोशी (२५) - कुटुंबप्रमुखाची मुलगी


सृष्टी इंगळे (२) - कुटुंबप्रमुखाची नात


Comments
Add Comment

नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता

मुंबई: विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत,

नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; कृषीमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, नमो

‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानपरिषदेत मंजूर

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून चर्चेत असलेले आणि अत्यंत कडक तरतुदी असलेले ‘महाराष्ट्र

सिंधुदुर्गच्या विकासाला बुस्टर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०० टक्के 'व्हिजीएफ'ला मंजुरी

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती देणारा निर्णय मंगळवारी राज्य

नंदूरबार,छत्रपती संभाजीनगरमधील गैरव्यवहारासाठी 'एसआयटी स्थापन; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेत घोषणा

​मुंबई: नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथील भूसंपादन गैरव्यवहार आणि छत्रपती संभाजीनगरमधील ब्रिजवाडी येथील ५४

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी