‘भुयारी रस्ता रोड नेटवर्क’ सविस्तर प्रकल्प अहवालासाठी प्रक्रिया सुरू

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) ने प्रस्तावित एकात्मिक भुयारी रस्ता प्रकल्पासाठी’ सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. विद्यमान रस्ते नेटवर्क आणि जलद गतीने विस्तारत असलेल्या मेट्रो रेल्वे नेटवर्कसोबत हे मुंबईसाठी तिसरे प्रवासाचे माध्यम ठरणार आहे.


या दूरदृष्टीपूर्ण उपक्रमांतर्गत, मुंबई कोस्टल रोड, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील हाय-स्पीड रेल्वे स्थानक आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जोडणारा भूमिगत कॉरिडॉर उभारण्याचा संकल्प आहे. यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि एस.व्ही.रोड वरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर, भूमिगत मार्गामुळे वाहतुकीवरील दाब कमी होईल, अवजड वाहनांची हालचाल भुयारी रस्ता रस्ता वळवली जाईल आणि शहरात वाहतूक कोंडी कमी होईल.


टेक्नो-इकॉनॉमिक फिजिबिलिटी स्टडी आणि डीपीआर अत्याधुनिक पद्धतीने केली जाणार आहे. निवडलेला सल्लागार भूगर्भीय, पर्यावरणीय आणि सामाजिक घटकांचा अभ्यास करून मार्गाची रचना तयार करेल आणि एमएमआरडीएला निविदा व्यवस्थापन प्रक्रियेत तांत्रिक सहाय्य देईल. स्मार्ट आणि शाश्वत मुंबईकडे निर्णायक पाऊल प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हे भुयारी रस्ता नेटवर्क मुंबईचे भूमिगत एक्स्प्रेसवे ठरेल.


या भुयारी मार्गाबाबत भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मुंबईचे जागतिक आर्थिक केंद्र म्हणून रूपांतर तिच्या कार्यक्षम वाहतूक प्रणालीवर अवलंबून आहे. प्रस्तावित भुयारी रस्ता नेटवर्क हे बहुपातळी जोडणीच्या दिशेने मोठे पाऊल आहे.”




भुयारी रस्ता नेटवर्कच्या अंमलबजावणीचे टप्पे



  • पहिला टप्पा : वरळी सी लिंक- बीकेसी- विमानतळ लूप  सुमारे १६ किमी)
    मुंबई कोस्टल रोडला बीकेसी आणि विमानतळाशी जोडणारा मार्ग, तसेच मुंबई- अहमदाबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरशी एकत्रित होणारा भाग. या टप्प्यात पश्चिम द्रुतगती महामार्ग व एस. व्ही. रोडवरील कोंडी कमी करण्यावर भर असेल.

  • दुसरा टप्पा : पूर्व–पश्चिम जोडणी (सुमारे १० किमी)
    पूर्व द्रुतगती मार्ग आणि पश्चिम द्रुतगती मार्ग यांना जोडून क्रॉस-शहर प्रवासाचा कालावधी मोठ्या प्रमाणात कमी करणे.

  •  तिसरा टप्पा : उत्तर–दक्षिण जोडणी (सुमारे ४४ किमी)
    संपूर्ण मुंबईभर अखंड भूमिगत मार्ग तयार करून प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी नवी जोडणी उभारणे.



“भुयारी रस्ता नेटवर्कमुळे मुंबईतील वाहतुकीचा चेहरामोहरा बदलणार आहे. हे नेटवर्क विद्यमान रस्त्यांवरील ताण कमी करून पूर्व-पश्चिम व उत्तर-दक्षिण जोडणी सशक्त करेल तसेच नव्या नागरी जागा उपलब्ध करून देईल.सध्या या प्रकल्पाचा फक्त सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला जाणार आहे, ज्यामध्ये तांत्रिक व्यवहार्यता, पर्यावरणीय परिणाम आणि आर्थिक व्यवहार्यता यांचा सखोल अभ्यास केला जाईल. डीपीआर अंतिम होऊन मंजूर झाल्यानंतर, प्रकल्पाची अंमलबजावणी वाहतुकीच्या गरजेनुसार आणि टप्प्याटप्प्याने करण्यात येईल.” - डॉ. संजय मुखर्जी, भाप्रसे, महानगर आयुक्त, एमएमआरडीए

Comments
Add Comment

Chakan-Talegaon Industrial Belt : चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्याचा कायापालट होणार? खड्ड्यांसाठी प्री-कास्ट, जिओ पॉलिमर टेक्नो पॅचचा वापर

मुंबई : चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योग आणि स्थानिक नागरिकांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना

BJP Yuva Morcha : ‘वंदे मातरम्’च्या अवमानाच्या निषेधार्थ भाजयुमो मुंबईचे जोरदार आंदोलन

मुंबई : १५ ऑगस्ट रोजी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी

Maharashtra New Doctors Appointed : राज्यात १,४४० डॉक्टरांची लवकरच नियुक्ती - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

- आरोग्यमंत्र्यांनी साधला सहा लाखाहून अधिक नागरिकांची जनसंवाद मुंबई : राज्यात उपलब्ध झालेल्या १,४४० डॉक्टरांची

Prakash Abitkar : आरोग्य समित्यांच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्य समस्या जाणून घेणार

मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या विविध

Maharashtra Agriculture Department : महाराष्ट्राच्या कृषी विभागाची दमदार कामगिरी; केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान

- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे स्वीकारणार पुरस्कार मुंबई : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)

FDA Notice to SRK : ‘विमल इलायची’ जाहिरातीवर FDAचा दणका; अजय, शाहरुख आणि टायगरला नोटीस

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे