मंगळवारपासून डॉक्टरांचा आमरण उपोषणाचा इशारा

मुंबई :  मुंबईतील रुग्णालये आणि खासगी दवाखान्यांमधून निर्माण होणारा जैवरासायनिक कचरा संकलनाचे काम राज्य शासनाने एस. एम. एस. इंव्होक्लीन प्रा.लि. या कंपनीकडे दिलेले आहे. मात्र या कंपनीकडून डॉक्टरांकडून शासन-निर्धारित दरांपेक्षा जास्त शुल्क आकारणी, निकृष्ट सेवा आणि कर्मचाऱ्यांकडून गैरवर्तन होत असल्याचा गंभीर आरोप नॅशनल इंटिग्रेटेड डॉक्टर्स असोसिएशन तर्फे करण्यात आला आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सविस्तर निवेदन देण्यात आले असून ११ नोव्हेंबर २०२५ पासून मंत्रालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.


शासनाने निश्चित केलेले जैवरासायनिक कचरा संकलनाचे दर न पाळता कंपनीकडून डॉक्टरांकडून अतिरिक्त शुल्क आकारणी केली जात असल्याचा आरोप डॉक्टरांकडून केला जात आहे. कंपनीकडून कचरा उचलण्यात अनियमितता दाखवली जात असून काही दवाखान्यांत कचरा अनेक दिवस पडून राहतो, असे असोसिएशनचे कार्याध्यक्ष डॉ योगेश भालेराव यांनी सांगितले. तर कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून डॉक्टरांना धमकावणे, उद्धट वर्तन आणि सेटलमेंटच्या नावाखाली लाच मागण्याचे प्रकार घडत असल्याचे असोसिएशनने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. कंपनीकडे बृहन्मुंबई महानगरपालिका व शासनाकडून मिळालेल्या अधिकारांचा गैरवापर होत असल्याचा आरोप डॉक्टरांमध्ये वाढत आहे. अतिरिक्त व गैरकायदेशीर शुल्क परत न केल्यास मोठा भ्रष्टाचार उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे असोसिएशनचे म्हणणे आहे. कंपनीचे संचालक सौरभ शर्मा यांनी चर्चेत सुधारणा करण्याचे आश्वासन दिले असले तरी ते आजतागायत अमलात आणले गेलेले नाही.


डॉक्टर वर्गाची अनेक वर्षे फसवणूक होत आहे. जर त्वरित कार्यवाही झाली नाही, तर ११ नोव्हेंबर २०२५ रोजी मंत्रालयासमोर आमरण
उपोषण करू.  - डॉ. अमोल आंबेकर, अध्यक्ष, नॅशनल इंटिग्रेटेड डॉक्टर्स असोसिएशन



डॉक्टर संघटनेच्या पाच ठोस मागण्या


एस एमएस इन्व्होक्लीन प्रा. लि. कंपनीच्या कामकाजाची सखोल चौकशी झाली पाहिजे, डॉक्टरांकडून केलेली अवाजवी शुल्क आकारणी तात्काळ परत करावी , मुंबईसाठी नवीन, पारदर्शक व उत्तरदायी जैवरासायनिक कचरा व्यवस्थापन प्रणाली सुरू करण्यात यावी, सदर कंपनीला दिलेले कंत्राट रद्द करणे आणि नवीन निविदा प्रक्रिया (टेंडर) लागू करावे.

Comments
Add Comment

Palghar Accident : काळजाचा ठोका चुकवणारं दृश्य! एकाच रांगेत १२ मृतदेह, बापूगावात महिलांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश

पालघर : आनंदाने नटलेले घर, साखरपुड्याच्या निमित्ताने जमलेले सर्व नातेवाईक आणि उत्साहाचे वातावरण... पण नियतीच्या

Water Shortage : राज्यातील १५ जिल्ह्यांत पाणीटंचाई

६३३ गावे, १ हजार ६५२ वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू मुंबई : राज्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे

महाराष्ट्रात होणार २५ हजार ४०० मेगावॅट अणुऊर्जा निर्मिती

६ लाख ५० हजार कोटींची गुंतवणूक; १ लाख २३ हजार ५०० नोकऱ्या उपलब्ध होणार मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

ॲमिटी विद्यापीठाला पनवेलमध्ये १५ एकर जमीन; मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई : ॲमिटी विद्यापीठाची मूळ संस्था असलेल्या रितनंद बलवेद एज्युकेशन फाऊंडेशन या शैक्षणिक संस्थेला मौजे भाताण

Tushar Gaikwad : खासदार वर्षा गायकवाड यांचे बंधू तुषार गायकवाड यांचे निधन

मुंबई : उत्तर-मध्य मुंबईच्या काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचे धाकटे बंधू तुषार एकनाथ गायकवाड (Tushar Gaikwad) यांचे

Mumbai Encroachment Crackdown : वांद्रे येथील 'गरीब नगर'मध्ये अनधिकृत बांधकामांवर हातोडा!

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ५ दिवसीय महा-पाडकाम मोहिमेला सुरुवात मुंबई : मुंबईतील वांद्रे (Bandra) पूर्व भागात