मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक बिनविरोध निवड

मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड झाली आहे. अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलेल्या सर्वांनी उमेदवारी मागे घेतल्याने नाईक यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. अशाप्रकारे अजिंक्य नाईक पुन्हा एकदा एमसीएचे अध्यक्ष बनले आहेत.


अध्यक्षपदासाठी जितेंद्र आव्हाड, प्रसाद लाड, मिलिंद नार्वेकर, डायना एडलजी आणि विहंग सरनाईक यांनी अर्ज दाखल केले होते मात्र या सर्वांनी उमेदवारीतून माघार घेतल्याने नाईक बिनविरोध अध्यक्ष झाले.


आता मुंबई क्रिकेट असोसिएशनमधील उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव आणि खजिनदार या पदांसाठी निवडणूक होणार आहे.


मुंबई क्रिकेट असोसिएशनचे तत्कालीन अध्यक्ष अमोल काळे यांचे निधन झाल्यानंतर नाईक अध्यक्ष झाले होते. नंतर आता पुन्हा एकदा त्यांची बिनविरोध अध्यक्षपदी निवड झाली आहे. अजिंक्य नाईक हे २३ जुलै २०२४ रोजी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सर्वात तरुण अध्यक्ष बनले होते. वयाच्या ३८ व्या वर्षी अध्यक्षपदी विराजमान होण्याचा मान त्यांनी मिळवला होता.


अध्यक्षपदासाठीची निवडणूक बिनविरोध पार पडल्याने आता इतर पदांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ही निवडणूक १२ नोव्हेंबर रोजी होईल. उपाध्यक्षपदासाठी ९, सचिवपदासाठी १०, सहसचिवपदासाठी ९ आणि खजिनदारपदासाठी ८ अर्ज आले आहेत. तसेच कार्यकारिणी सदस्यांसाठी तब्बल ४८ अर्ज दाखल झाले आहेत. पुढील काही दिवसांत या महत्त्वाच्या पदांवर कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Smruti Mandhana | अखेर स्मृतीने मौन सोडले, पलाशसोबत लग्न न करण्याचा निर्णय!

मुंबई: मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या स्मृती आणि पलाशच्या लग्नाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. स्मृतीने

टीम इंडिया 'यशस्वी', रो'Hit' चा विक्रम, विशाखापट्टणममध्ये भारताने साजरा केला मालिका विजय

विशाखापट्टणम : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात विशाखापट्टणम येथे झालेला निर्णायक एकदिवसीय सामना भारताने

भारताने दक्षिण आफ्रिकेचा डाव ४८ व्या षटकात गुंडाळला, जिंकण्यासाठी हव्या २७१ धावा

विशाखापट्टणम : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात विशाखापट्टणम येथे निर्णायक एकदिवसीय सामना सुरू आहे. हा सामना

आयपीएलमध्ये विदेशी खेळाडूंना मिळणार केवळ १८ कोटीच!

लिलावापूर्वीच बीसीसीआयच्या नियमांचा अनेक खेळाडूंना फटका मुंबई  : आयपीएल २०२६ च्या मिनी लिलावाची सध्या तयारी

इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची विराटला ७ वर्षांनी संधी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना ६ डिसेंबर

टी-२० सामन्याची तिकीट विक्री सुरू असताना चाहत्यांवर लाठीचार्ज

कटक : भारतात क्रिकेट केवळ एक खेळ नसून तो धर्म आहे. या शब्दाची सत्यता पुन्हा एकदा ओडिशातील कटक शहरात सिद्ध झाली. ९