मुंबईतल्या काँग्रेस आमदाराचे दोन मतदारयाद्यांमध्ये नाव, चोर कोण, दोष कुणाचा?

मुंबई: काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सध्या मतदारयाद्यांमधील घोळांचा पाढा वाचायला सुरुवात केली आहे. त्यांच्यासोबतच राज्यातील विरोधक सुद्धा मतदारयांद्याबाबत आक्रमक झाले आहेत. मात्र निवडणूक आयोगाची चूक दाखवण्यात व्यस्थ असणाऱ्या विरोधकांना स्वत:च्या पक्षातील आमदाराचे नाव दोन मतदारयाद्यांमध्ये असलेले माहित आहे का? हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.


मुंबईतील काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री अस्लम शेख यांच्या नावाची दोन मतदारयाद्यांमध्ये नोंदणी असल्याचा प्रकार ७ नोव्हेंबर रोजी समोर आला. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी हे प्रकरण समोर आणले आहे. याबाबत साटम यांनी मतदारयाद्यांचे फोटो शेअर करत सांगितले आहे. दरम्यान, अमित साटम यांच्या आरोपानंतर शेख यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. शेख यांनी याबाबतीत निवडणूक आयोगाची चूक असल्याचे म्हटले आहे.




माझे नाव अजून कुठल्या निवडणूक याद्यांमध्ये आहे, याबाबत मला स्वप्न पडले का? तसेच माझे नाव दोन मतदारयाद्यांमध्ये असणे ही निवडणूक आयोगाची चूक आहे, असे म्हणत शेख यांनी मतदार यादीमध्ये दुबार नाव आल्याची चूक निवडणूक आयोगाच्या माथी फोडली आहे.

Comments
Add Comment

गोरेगाव मुलुंड पश्चिमेतील उड्डाणपूल प्रकल्पाला गती, मुंबई मेट्रो ४च्या खालून जाणार पूल

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : तानसा जलवाहिनी ते नाहूर रेल्वे पूल येथपर्यंतचा १.८९ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल

महापालिकेच्या आपला दवाखान्यामध्येही मुख कर्करोगाची तपासणी

गर्भाशय मुख आणि स्तन कर्करोगाचे दवाखान्यांसह प्रसुतीगृहांमध्ये तपासणी शिबीर मुंबई (विशेष प्रतिनिधी)

गोरेगावात लिफ्टमध्ये हायड्रोजन फुग्यांचा स्फोट; तीन जण थोडक्यात बचावले

मुंबई : मुंबईतील गोरेगाव परिसरात हायड्रोजन गॅस भरलेल्या फुग्यांमुळे मोठा धोका निर्माण झाल्याची घटना समोर आली

भारतीय कृषी क्षेत्रावर तसा विपरीत परिणाम होऊ नये

अंदाजपत्रकातून विकासाला गती येण्यासाठी आणखी काही ठोस पावलांची अपेक्षा बारामती : केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत

शक्तीपीठ महामार्गाच्या आराखड्यात बदल

राज्य सरकारचा निर्णय; कागल आणि हातकणंगलेचा भाग वगळला मुंबई : राज्यातील साडेतीन शक्तीपीठांना जोडणाऱ्या

Pune Mumbai Expressway News : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गॅस गळतीमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला, पहाटेपर्यंत बचावकार्य सुरू

मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मंगळवारी संध्याकाळी ५ वाजेपासून सुरू झालेला वाहतुकीचा खोळंबा तब्बल १२