मुंबईतल्या काँग्रेस आमदाराचे दोन मतदारयाद्यांमध्ये नाव, चोर कोण, दोष कुणाचा?

मुंबई: काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सध्या मतदारयाद्यांमधील घोळांचा पाढा वाचायला सुरुवात केली आहे. त्यांच्यासोबतच राज्यातील विरोधक सुद्धा मतदारयांद्याबाबत आक्रमक झाले आहेत. मात्र निवडणूक आयोगाची चूक दाखवण्यात व्यस्थ असणाऱ्या विरोधकांना स्वत:च्या पक्षातील आमदाराचे नाव दोन मतदारयाद्यांमध्ये असलेले माहित आहे का? हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.


मुंबईतील काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री अस्लम शेख यांच्या नावाची दोन मतदारयाद्यांमध्ये नोंदणी असल्याचा प्रकार ७ नोव्हेंबर रोजी समोर आला. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी हे प्रकरण समोर आणले आहे. याबाबत साटम यांनी मतदारयाद्यांचे फोटो शेअर करत सांगितले आहे. दरम्यान, अमित साटम यांच्या आरोपानंतर शेख यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. शेख यांनी याबाबतीत निवडणूक आयोगाची चूक असल्याचे म्हटले आहे.




माझे नाव अजून कुठल्या निवडणूक याद्यांमध्ये आहे, याबाबत मला स्वप्न पडले का? तसेच माझे नाव दोन मतदारयाद्यांमध्ये असणे ही निवडणूक आयोगाची चूक आहे, असे म्हणत शेख यांनी मतदार यादीमध्ये दुबार नाव आल्याची चूक निवडणूक आयोगाच्या माथी फोडली आहे.

Comments
Add Comment

सोन्याचे सफरचंद! किंमत १० कोटी, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

मुंबई: चक्क १० कोटींचे सफरचंद! हे ऐकून तुम्हाला पण धक्का बसला ना? मात्र हे खायचे सफरचंद नसून ते सोने आणि हिऱ्यांनी

Maharashtra Rain Update : पुढील २४ तास अतिधोक्याचे! ८ आणि ९ नोव्हेंबरला मोठे वादळ धडकणार; अनेक राज्यांमध्ये IMD कडून 'महा-अलर्ट' जारी!

मुंबई : राज्यात अखेर थंडीची चाहूल जाणवू लागली आहे. पहाटेच्या वेळी तापमानात घट होऊन गारवा वाढल्याचे चित्र अनेक

मुंबईतील इतर भागांमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांवर कधी होणार कारवाई ?

आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर कुलाबा कॉजवेवरील अनधिकृत फेरीवाले हटवले मुंबई (खास प्रतिनिधी) : कुलाबा कॉजवेवरील

मेट्रोंना विविध सेवा देणारी आता एकच कंपनी

मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्रदेशातील विविध प्राधिकरण आणि कंपन्यांचे मेट्रो प्रकल्पांचे एकत्रिकरण

रविवारी मुख्य व हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

मुंबई (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी रविवारी ९ नोव्हेंबर रोजी उपनगरी

कृषी समृद्धी योजनेस राज्य सरकारची मान्यता

मुंबई (प्रतिनिधी) : "कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निर्मितीसाठी गुंतवणूक करण्याचा निर्णय