दादरच्या स्टार मॉलला आग, अग्निशमनच्या पाच जवानांचा श्वास गुदमरला


मुंबई : दादर येथील स्टार मॉल शुक्रवारी दुपारी आग लागली. अग्निशमन दलाने प्रयत्नांची शर्थ करुन ही आग आटोक्यात आणली. आग आटोक्यात आणत असताना अग्निशमन दलाच्या पाच जवानांचा श्वास गुदमरला. यात एक फायर स्टेशन ऑफिसर आणि चार फायरमन आहेत. या पाच जणांना मुंबईच्या केईएम रुग्णालयात दाखल केले आहे. वेळेत उपचार सुरू झाल्यामुळे अग्निशमन दलाच्या एक फायर स्टेशन ऑफिसर आणि चार फायरमन यांची प्रकृती स्थिर आहे. सध्या पाचही जणांवर वरिष्ठ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.



शुक्रवार ७ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता स्टार मॉलच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या मॅकडोनल्ड्सच्या किचनमध्ये आग लागली. आगीची बातमी मिळताच अग्निशमन दल, पोलीस, १०८ ॲम्ब्युलन्स आणि स्थानिक वॉर्ड कर्मचारी (Ward Staff) घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या जवानांनी कसलीही दिरंगाई न करता आग विझवण्याच्या कामाला सुरुवात केली. जेमतेम १५ ते २० मिनिटांत अग्निशमन दलाने ही आग 'लेव्हल १' (L-1) अर्थात किरकोळ स्वरूपाची असल्याचे घोषित करून पूर्णपणे नियंत्रणात आणली. अग्निशमन दलाने वेळेत कारवाई केल्यामुळे संभाव्य मोठे संकट टळले.


Comments
Add Comment

Dabewala E-Bikes : डबेवाल्यांना लवकरच १०५ ई बाईक्स; महापौर रितू तावडे यांनी केली घोषणा!

मुंबईतील एक प्रवेशद्वार डबेवाला संकल्पनेवर मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत प्रस्तावित प्रवेशद्वारांपैकी एक

Deccan Queen Railway Festival : प्रतिष्ठित 'डेक्कन क्वीन' रेल्वे महोत्सव होणार साजरा

मध्य रेल्वेचा मुंबई विभाग २७ मार्च २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे, गौरवशाली 'डेक्कन क्वीन

धक्कादायक! मुलुंडमध्ये १६ वर्षीय मुलीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; आरोपी अटकेत

मुंबई : मुलुंड परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेने मुंबईत खळबळ उडाली आहे. केवळ बोलणं बंद केल्याच्या रागातून एका

खरातला दिली गेलेली पाण्याची जोडणी मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर, शीतल म्हात्रेंचा गंभीर आरोप

मुंबई: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण सध्या राज्यभरत चांगलचं गाजत आहे. नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक

किनारी रस्ता प्रकल्पात पादचारी भुयारी मार्गात छत उभारण्याचा प्रस्ताव फेटाळला

मुंबई: महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील भाग–२ मधील पादचारी भुयारी

नवी मुंबईचा प्रवास वेगवान होणार, ठाणे-बेलापूर मार्गावरील प्रवास आता सिग्नलमुक्त

नवी मुंबई: नवी मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी महानगरपालिकेने एका महत्त्वाच्या प्रकल्पाला मंजुरी