आज मध्यरात्री कल्याण-बदलापूर दरम्यान विशेष पॉवर ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेवर शुक्रवारी मध्यरात्री कल्याण आणि बदलापूर दरम्यान चार ठिकाणी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक शुक्रवार रात्री १.५० ते पहाटे ३.२० वाजेपर्यंत १ तास ३० मिनिटे इतका असेल.
या ब्लॉकमुळे अप मेल/एक्सप्रेस गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात येणार असून भुवनेश्वर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणार्क एक्सप्रेस व विशाखापट्टणम – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस कर्जत –पनवेल–दिवा मार्गे वळविण्यात येतील: कल्याण स्थानकावर नियोजित थांबा असलेल्या गाड्यांना प्रवाशांच्या सोयीसाठी पनवेल आणि ठाणे येथे थांबा देण्यात येईल, जेणेकरून कल्याण येथे चढणारे किंवा उतरणारे प्रवासी आपला प्रवास सुलभपणे करू शकतील.


हैदराबाद - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हुसैन सागर एक्सप्रेस वांगणी स्थानकावर पहाटे ३.१३ ते ३.२० वाजेपर्यंत थांबविण्यात येईल. उशिरा धावणाऱ्या मेल व एक्सप्रेस गाड्या तसेच सुट्टी विशेष गाड्या आवश्यकतेनुसार संचालनात्मक कारणास्तव वळविण्यात येतील. या ब्लॉक कालावधीत कल्याण आणि कर्जत स्थानकांदरम्यान उपनगरी सेवा उपलब्ध राहणार नाहीत.

Comments
Add Comment

गोरेगाव मुलुंड पश्चिमेतील उड्डाणपूल प्रकल्पाला गती, मुंबई मेट्रो ४च्या खालून जाणार पूल

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : तानसा जलवाहिनी ते नाहूर रेल्वे पूल येथपर्यंतचा १.८९ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल

महापालिकेच्या आपला दवाखान्यामध्येही मुख कर्करोगाची तपासणी

गर्भाशय मुख आणि स्तन कर्करोगाचे दवाखान्यांसह प्रसुतीगृहांमध्ये तपासणी शिबीर मुंबई (विशेष प्रतिनिधी)

गोरेगावात लिफ्टमध्ये हायड्रोजन फुग्यांचा स्फोट; तीन जण थोडक्यात बचावले

मुंबई : मुंबईतील गोरेगाव परिसरात हायड्रोजन गॅस भरलेल्या फुग्यांमुळे मोठा धोका निर्माण झाल्याची घटना समोर आली

भारतीय कृषी क्षेत्रावर तसा विपरीत परिणाम होऊ नये

अंदाजपत्रकातून विकासाला गती येण्यासाठी आणखी काही ठोस पावलांची अपेक्षा बारामती : केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत

शक्तीपीठ महामार्गाच्या आराखड्यात बदल

राज्य सरकारचा निर्णय; कागल आणि हातकणंगलेचा भाग वगळला मुंबई : राज्यातील साडेतीन शक्तीपीठांना जोडणाऱ्या

Pune Mumbai Expressway News : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गॅस गळतीमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला, पहाटेपर्यंत बचावकार्य सुरू

मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मंगळवारी संध्याकाळी ५ वाजेपासून सुरू झालेला वाहतुकीचा खोळंबा तब्बल १२