आज मध्यरात्री कल्याण-बदलापूर दरम्यान विशेष पॉवर ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेवर शुक्रवारी मध्यरात्री कल्याण आणि बदलापूर दरम्यान चार ठिकाणी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक शुक्रवार रात्री १.५० ते पहाटे ३.२० वाजेपर्यंत १ तास ३० मिनिटे इतका असेल.
या ब्लॉकमुळे अप मेल/एक्सप्रेस गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात येणार असून भुवनेश्वर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणार्क एक्सप्रेस व विशाखापट्टणम – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस कर्जत –पनवेल–दिवा मार्गे वळविण्यात येतील: कल्याण स्थानकावर नियोजित थांबा असलेल्या गाड्यांना प्रवाशांच्या सोयीसाठी पनवेल आणि ठाणे येथे थांबा देण्यात येईल, जेणेकरून कल्याण येथे चढणारे किंवा उतरणारे प्रवासी आपला प्रवास सुलभपणे करू शकतील.


हैदराबाद - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हुसैन सागर एक्सप्रेस वांगणी स्थानकावर पहाटे ३.१३ ते ३.२० वाजेपर्यंत थांबविण्यात येईल. उशिरा धावणाऱ्या मेल व एक्सप्रेस गाड्या तसेच सुट्टी विशेष गाड्या आवश्यकतेनुसार संचालनात्मक कारणास्तव वळविण्यात येतील. या ब्लॉक कालावधीत कल्याण आणि कर्जत स्थानकांदरम्यान उपनगरी सेवा उपलब्ध राहणार नाहीत.

Comments
Add Comment

मानखुर्द, गोवंडी, शिवाजीनगर, चेंबूरमधील नागरिकांना धो धो पाणी, चेंबूर अमर महल ते ट्रॉम्बे जलाशय जलबोगदा महिना अखेर होणार कार्यान्वित

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या चेंबूर अमर महल ते ट्रॉम्बे जलशयापर्यंतच्या

भीम यूपीआयद्वारे 'मुंबई वन' तिकिटांवर २० टक्के सवलत

एमएमआरडीएकडून ३१ डिसेंबरपर्यंत ऑफर मुंबई  : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) त्यांच्या

मुंबई, विदर्भ,मराठवाड्यात थंडीची चाहूल

राज्यभरात तापमान कमी होणार मुंबई  : राज्यात गेल्या १५ ते २० दिवसांपासून परतीचा पाऊस आणि त्यानंतर अवकाळी पावसाने

बीकेसीच्या धर्तीवर वडाळ्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक केंद्र

एमएमआरडीए करणार १५० एकर जागेचा विकास मुंबई  : वडाळ्यातील आपल्या मालकीच्या १५० एकर जागेचा विकास वांद्रे-कुर्ला

सुरेश रैना, शिखर धवनची कोट्यवधींची मालमत्ता ‘ईडी’कडून जप्त

मुंबई :  १,००० कोटी रुपयांच्या सट्टेबाजी प्रकरण ईडीने माजी क्रिकेटपटू सुरेश रैना आणि शिखर धवन यांच्या मालमत्ता

रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात तीन महिला प्रवाशांचा मृत्यू

मुंबई  : मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्याने या आंदोलनाचा फटका प्रवाशांना बसला