आज मध्यरात्री कल्याण-बदलापूर दरम्यान विशेष पॉवर ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेवर शुक्रवारी मध्यरात्री कल्याण आणि बदलापूर दरम्यान चार ठिकाणी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक शुक्रवार रात्री १.५० ते पहाटे ३.२० वाजेपर्यंत १ तास ३० मिनिटे इतका असेल.
या ब्लॉकमुळे अप मेल/एक्सप्रेस गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात येणार असून भुवनेश्वर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणार्क एक्सप्रेस व विशाखापट्टणम – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस कर्जत –पनवेल–दिवा मार्गे वळविण्यात येतील: कल्याण स्थानकावर नियोजित थांबा असलेल्या गाड्यांना प्रवाशांच्या सोयीसाठी पनवेल आणि ठाणे येथे थांबा देण्यात येईल, जेणेकरून कल्याण येथे चढणारे किंवा उतरणारे प्रवासी आपला प्रवास सुलभपणे करू शकतील.


हैदराबाद - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हुसैन सागर एक्सप्रेस वांगणी स्थानकावर पहाटे ३.१३ ते ३.२० वाजेपर्यंत थांबविण्यात येईल. उशिरा धावणाऱ्या मेल व एक्सप्रेस गाड्या तसेच सुट्टी विशेष गाड्या आवश्यकतेनुसार संचालनात्मक कारणास्तव वळविण्यात येतील. या ब्लॉक कालावधीत कल्याण आणि कर्जत स्थानकांदरम्यान उपनगरी सेवा उपलब्ध राहणार नाहीत.

Comments
Add Comment

दिल्लीत झळकलेला महाराष्ट्राचा मानाचा चित्ररथ आता गिरगावात!

- कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव मुंबई : नवी दिल्ली

गुढीपाडव्याच्या दिवशी बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बीकेसीच्या पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला

मृणालताई गोरे विस्तारित उड्डाणपूलाच्या वाढीव खर्चावरून शंका; स्थायी समितीचे सदस्य करणार प्रत्यक्ष जागेची पाहणी

मुंबई: मृणालताई गोरे रेल्वे उड्डाणपुलाला जोडणाऱ्या राम मंदिर रोड ते गोरेगाव पश्चिम पर्यंतच्या रिलीफ रोड

सहली आडून कंत्राटदारांचे खिसे भरण्याचा घाट भाजपने उधळला

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शाळांमधील मुलांची राणीबाग आणि बोरीवली नॅशनल पार्कमध्ये सहल आयोजित करण्याचा

अखेर महापौर चषक स्पर्धा होणार; सन २०२६-२७ मध्ये होणाऱ्या महापौर चषक क्रीडा स्पर्धांसाठी पाच कोटी रुपये निधीची तरतूद

मुंबई: डिजिटल युगात मुले भ्रमणध्वनीभोवती गुरफटली आहेत. मुले मैदानी खेळ विसरली आहेत. मुलांचा ‘स्क्रीन टाईम’ कमी