पाण्याची गळती आणि दुषित पाणी समस्येवर लक्ष द्या, आयुक्तांचे जल अभियंता विभागाला निर्देश

मुंबई : मुंबई उत्तर मुंबईतील पाण्याच्या समस्येबाबत महापालिका आयुक्तांसोबतच लोकप्रतिनिधींची बैठक पार पडली. या बैठकीत वाढीव पाण्याचे नियोजन करणे शक्य नसले तरी या भागांतील दुषित पाणी पुरवठा आणि जलवाहिनीची गळती या दोन समस्या प्राधान्याने सोडवण्याच्या निर्देश महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ भूषण गगराणी यांनी दिले आहेत. पाण्याच्या गळती दुरुस्तीसाठी आवश्यक असल्यास गळतीचा शोध घेत रस्ता तथा पदपथ खोदण्याची परवानगी तातडीने दिली जावी, जेणेकरून गळती दुरुस्तीची कामे त्वरीत होवून नागरिकांना पाण्याचा पुरवठा सुरळीत होईल,असे त्यांनी स्पष्ट केले.


दहिसर ते मालाड या भागातील पाणी समस्येबाबत उत्तर मुंबई लोकसभेचे खासदार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी चार दिवसांपूर्वी महापालिका आयुक्तांसोबत झालेल्या आढावा बैठकीत आपल्या स्तरावर लोकप्रतिनिधींची एक बैठक घेवून ही समस्या निकालात काढण्याचा प्रयत्न करावा असे निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांनी उत्तर मुंबईतील लोकप्रतिनिधींची बैठक बोलावली होती. या बैठकीला भाजपाचे आमदार योगेश सागर, मनिषा चौधरी, संजय उपाध्याय यांच्यासह उत्तर मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष बाळा तावडे, गणेश खणकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.


या बैठकीत उत्तर मुंबईसह पश्चिम उपनगरातील पाणी समस्येवर चिंता व्यक्त करण्यात आली. पश्चिम उपनगराची लोकसंख्या वाढत असतानाही या भागाला पाण्याचा पुरवठा फारच कमी आहे, त्यातुलनेत शहरात लोकसंख्या कमी होत असतानाही तेथील पाणी पुरवठा कमी झालेला नाही. त्यामुळे पाणी पुरवठ्यात असमानता असून लोकसंख्येनुसार समानता आणली जावी अशी मागणी भाजपाच्या लोकप्रतिनिधींनी केली. परंतु, मुंबईची पाण्याची मागणी आणि पुरवठा यामध्येच तफावत असल्याने असे करता येणार नाही हे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. त्यामुळे अखेर तात्पुरती व्यवस्था म्हणून दुषित पाण्याची समस्या आणि गळती दुरुस्ती यावर तातडीने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल,असे आश्वासन दिले. त्यामुळे जलावहिन्यांमधील गळतीची तातडीने दुरस्ती केली जावी, यासाठी खोदकाम करावे लागत असल्यास त्याला तातडीने परवानगी दिली जावी असे निर्देश आयुक्तांनी दिले आहे. तसेच दुषित पाण्याची समस्याही तातडीने हाती घेवून ती निकालात काढण्यावर भर दिला जावा, जेणेकरून या परिसरातील नागरिकांना होत असलेल्या पाणी समस्या निकालात काढली जाईल,असे आयुक्तांनी जलअभियंता विभागाला निर्देश दिले आहेत.

Comments
Add Comment

Dadar Savarkar Mandai : दादर पश्चिम येथील सावरकर मंडईच्या दुरुस्तीचा अखेर मुहूर्त सापडला

मुंबई ( विशेष प्रतिनिधी) दादर पश्चिम येथील मागील अनेक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या

BMC : मुंबईत बेकायदेशीरपणे डेब्रिज टाकणाऱ्यांना बसणार चाप

- सचिन धानजी महापालिका विकसित करणार 'एकात्मिक बांधकाम व पाडकाम कचरा व्यवस्थापन पोर्टल' दिल्लीत यशस्वी प्रयोग

Vinayak Raut : विनायक राऊत प्रकरणाला नवे वळण! अटकपूर्व जामिनासाठी धाव, भोंदूबाबा अटकेत; सूनेच्या आरोपांनी खळबळ

मुंबई : उबाठा गटाचे माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) आणि त्यांच्या कुटुंबीयांवरील कौटुंबिक छळ व जादूटोणाविरोधी

Mumbai Crime : संतापजनक! मुंबईत सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार, संतप्त नागरिकांचा रस्ता रोको आंदोलन

मुंबई : मुंबई (Mumbai) येथील पायधुनी परिसरात अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका ७ वर्षांच्या

Local Train News : केवळ स्थानकावरील प्लॅटफॉर्मवरूनच ट्रेनमध्ये चढावे व उतरावे; मध्य रेल्वेचे प्रवाशांना आवाहन

मध्य रेल्वे प्रवाशांना विनंती करते की त्यांनी केवळ स्थानकावरील प्लॅटफॉर्मवरूनच ट्रेनमध्ये चढावे व उतरावे आणि

Pratap Sarnaik : आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून ५ हजार ५०० विशेष बसेस सोडणार..

ग्रुप बुकींग असल्यास राज्याच्या कोणत्याही गावातून थेट पंढरपूर पर्यंत बस मिळणार. पंढरपूर :- आषाढी यात्रेच्या