Buldhana Horror : बुलढाण्यात थरार! मुलाने कुऱ्हाडीने आई-वडिलांची हत्या करून स्वतःही संपवले जीवन, २ चिमुकल्यांचा जीव थोडक्यात बचावला

बुलढाणा : नात्यांना काळीमा फासणारी एक हादरवणारी आणि हृदयद्रावक घटना बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील सावरगाव डुकरे येथे घडली आहे. शेतीच्या वादातून एका मुलाने दारूच्या नशेत आपल्या जन्मदात्या आई आणि वडिलांची क्रूर हत्या केली आणि त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली. या दुर्दैवी घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सावरगाव डुकरे येथील एका कुटुंबात शेतीच्या तुकड्यावरून काही दिवसांपासून वाद सुरू होता. गुरुवारी रात्रीच्या सुमारास मुलगा दारूच्या नशेत घरी आला. त्याने याच वादातून आपल्या आई-वडिलांवर कुऱ्हाडीने वार केले. वार इतके क्रूर होते की आई आणि वडिलांचा जागीच मृत्यू झाला. जन्मदात्यांची निर्घृण हत्या केल्यानंतर, या कृत्याच्या धक्क्याने किंवा पश्चात्तापाने त्याने घरामध्येच गळफास घेऊन आपले जीवन संपवले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



व्यसनाच्या विळख्याने घडवले तिहेरी हत्याकांड


अत्यंत शांत आणि साधे म्हणून ओळखले जाणारे चिखली तालुक्यातील सावरगाव डुकरे हे गाव गुरुवारी रात्री एका भीषण तिहेरी हत्याकांडाने हादरले. दारूच्या व्यसनामुळे एका कुटुंबाचे अस्तित्वच एका क्षणात संपले आहे. या हादरवून टाकणाऱ्या घटनेत वडील सुभाष दिगंबर डुकरे (६७) आणि आई लता सुभाष डुकरे (५५) यांची निर्घृण हत्या झाली आहे, तर आरोपी मुलगा विशाल सुभाष डुकरे (३२) याने स्वतः गळफास घेऊन आपले जीवन संपवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या भीषण कृत्यामागे विशाल डुकरेचे दारूचे व्यसन हेच मूळ कारण होते. विशालला दारूचे व्यसन जडल्यापासून घरात वारंवार वाद आणि भांडणे होत होती. या व्यसनाने कुटुंबाची शांतता हिरावून घेतली होती. गावकरी सांगतात की, विशाल लहानपणी अत्यंत हुशार आणि शाळेत पहिला येणारा विद्यार्थी होता. मात्र, हळूहळू तो दारूच्या नादी लागून बिघडत गेला. कामधंदा सोडून तो दिवसभर दारूच्या नशेत असायचा. आई-वडिलांना शिवीगाळ आणि मारहाण करणे हे त्याचे रोजचे झाले होते. व्यसनाच्या या विळख्यामुळे त्याचे लग्न मोडले, मित्र दूर झाले आणि कुटुंबातील शांतता कायमची हरपली. अखेर दारूच्या नशेतच त्याने कुऱ्हाडीने वार करत जन्मदात्यांची क्रूर हत्या केली आणि त्यानंतर स्वतःही आयुष्य संपवले. या भीषण घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ चिखली घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. व्यसनाच्या विळख्यात अडकून कुटुंबाचे झालेले हे भीषण हत्याकांड संपूर्ण जिल्ह्याला चटका लावून गेले आहे.



चिमुकल्यांचा जीव थोडक्यात बचावला


या भीषण घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अवघ्या काही वेळातच पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, अमोल गायकवाड आणि सुधीर पाटील यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तपासाला गती देण्यासाठी फॉरेन्सिक टीमने तातडीने तपासणी सुरू केली आहे. मृतांमध्ये वडील सुभाष दिगंबर डुकरे (६७), आई लता सुभाष डुकरे (५५) आणि मुलगा विशाल सुभाष डुकरे (३२) यांचा समावेश आहे. या संपूर्ण घटनेतील एक दिलासा देणारी बाजू समोर आली आहे, ती म्हणजे मृतांच्या कुटुंबातील दोन लहान मुले सुदैवाने वाचली. मृतक आरोपी विशालचा मोठा भाऊ शरद पाटील यांचा ११ वर्षांचा मुलगा युवराज आणि ६ वर्षांची मुलगी आर्या, हे दोघेही 'त्या' रात्री घरी नव्हते. गावात बोलले जाते की, या दोन्ही चिमुकल्यांना आजी-आजोबांवर (सुभाष आणि लता) खूप लळा होता आणि ते रोज रात्री त्यांच्याकडेच झोपायला जात असत. परंतु, गेल्या दोन-तीन दिवसांपासून ते आजी-आजोबांकडे गेले नव्हते. त्यांच्या याच अनुपस्थितीमुळे त्यांच्यावरील मोठे संकट टळले आणि त्यांचे प्राण थोडक्यात बचावले. या घटनेमुळे सावरगाव डुकरे गावात खोलवर शोककळा पसरली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

Comments
Add Comment

Nitesh Rane : राज्यातील आदिवासी भागात 'मत्स्यक्रांती'चे वारे; मंत्री नितेश राणे यांनी घेतला 'धरती आभा अभियाना'चा आढावा

- ५ वर्षांत १८० प्रकल्प मंजूर मुंबई : राज्यातील दुर्गम आणि आदिवासी बहुल भागांमधील आर्थिक सक्षमीकरणाला गती

Devendra Fadnavis : राज्यातील तीर्थक्षेत्रे, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी ९९३ कोटी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी

- दर्जेदार सुविधांसह कालमर्यादेत कामे पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई : राज्यातील ऐतिहासिक, धार्मिक आणि

Nitesh Rane : बुरोंडीत मच्छीमार जेट्टी उभारणीला गती; दापोलीच्या मत्स्यव्यवसायाला मिळणार नवे बळ – मंत्री नितेश राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील बुरोंडी येथे प्रस्तावित मच्छीमार जेट्टी प्रकल्पाला आता गती

Nitesh Rane : इंधन बचतीसाठी मंत्री नितेश राणे यांचा मेट्रोने प्रवास

मुंबई : जागतिक इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला

Pratap Sarnaik : 'एसटी'चा प्रवास महागणार?

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे संकेत; ३१ मेपर्यंत वाट पाहण्याची भूमिका मुंबई : अमेरिका आणि इराणमधील

Chandrashekhar Bawankule : भर कार्यक्रमात महसूलमंत्र्यांना कागदाने वारा! अमरावतीच्या जनता दरबारातील 'तो' व्हिडिओ चर्चेत

अमरावती : राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या एका अनोख्या व्हिडिओची जोरदार चर्चा रंगली आहे. अमरावती जिल्ह्यातील