वंदे मातरम् गीताच्या कार्यक्रमाकरता भाजपकडून अबू आझमी यांना निमंत्रण

मुंबई (खास प्रतिनिधी): वंदे मातरम गीताच्या १५० वर्षपूर्ती निमित्त मुंबई भाजप तर्फे मुंबईमध्ये शुक्रवार ७ नोव्हेंबर २०२५ रोजी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. स्वातंत्र्य लढ्यातील सेनानी व शहिदांना वंदन आणि देशप्रेमाचे प्रतीक असलेल्या वंदे मातरम गीताच्या १५० वर्षपूर्ती निमित्त सहा ठिकाणी कार्यक्रम होणार आहे. यातील ईशान्य मुंबईतील कार्यक्रम मानखुर्द पी एम जी पी कॉलनीत होणार असून या कार्यक्रमाचे निमंत्रण भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी समाजवादी पक्षाचे आमदार अबू असीम आझमी यांना दिले आहे.


भाजप मुंबई अध्यक्ष आमदार अमीत साटम यांनी आझमी यांना पत्र पाठवून या कार्यक्रमाला निमंत्रित राहण्याचे कळवले आहे. साटम यांनी आपल्या पत्रात असे म्हटले आहे की, शुक्रवारी ७ नोव्हेंबर २०२५ रोजी राष्ट्रगीत "वंदे मातरम्" या गीताला १५० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने वंदे मातरम् गीताच्या कथनाचा एक विशेष कार्यक्रम आपल्याच घराजवळच सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आलेला आहे.


वंदे मातरम् हे राष्ट्रीय गीत देशभक्ती, एकता आणि प्रेरणेचे प्रतीक आहे. आपण सुद्धा या गीताचे कथन व गायन आमच्यासोबत करावे, या करिता सदर कार्यक्रमाला मी आपणास निमंत्रित करत आहे. आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहून वंदे मातरम् कथनामध्ये सहभागी व्हाल, अशी अपेक्षा आहे,असे म्हटले आहे.



अबू आझमी यांनी वंदे मातरम् गीत शाळांमध्ये म्हणण्यास जाहीर विरोध केला आहे, त्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांनी त्यांना निमंत्रित केल्याचे बोलले जात आहे .

Comments
Add Comment

Central Railway : मुसळधार पावसानंतर रेल्वेची शर्यत! लोणावळा–कर्जत मार्गावर १,१०० हून अधिक कामगारांचे युद्धपातळीवर काम; एक रेल्वे मार्ग सुरू

मुंबई : लोणावळा–कर्जत घाट विभागात मुसळधार पावसामुळे झालेल्या दरडी कोसळण्याच्या घटनेनंतर मध्य रेल्वेने रेल्वे

Hasan Mushrif : राज्यात नर्सिंग शिक्षणाच्या विस्ताराला मान्यता - मंत्री हसन मुश्रीफ

- कमी शुल्कामध्ये दर्जेदार शिक्षण उपलब्ध होणार मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्थेसाठी कुशल परिचारिकांची

Devendra Fadnavis : सावंतवाडीत आता 'राजधानी'सह ३ महत्त्वाच्या गाड्या थांबणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

- रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून मंजुरीचे पत्र मुंबई : कोकण रेल्वेवरील प्रवाशांसाठी आणि विशेषतः

Pratap Sarnaik : एसटी महामंडळाचा कायापालट होणार; जुन्या बसेस बदलून ताफ्यात ई-बसेस येणार

- दुर्गम भागासाठी २००० मिडी बसेस सज्ज; मंत्री प्रताप सरनाईक यांची विधानपरिषदेत घोषणा मुंबई : भविष्यात एसटी

Devendra Fadnavis : मुंबईच्या पूर नियंत्रणासाठी १३ हजार कोटींचा आराखडा; मुख्यमंत्र्यांची घोषणा

- 'फडणवीसांना बदनाम करा, पण महाराष्ट्राला नको', विरोधकांना आवाहन मुंबई : "मुंबईला दरवर्षी भेडसावणाऱ्या

Mumbai Tree Collapse : वादळ आणि पावसात उन्मळून पडणाऱ्या झाडांचे जोखीम मूल्यांकन सुरू

मुंबई : मुंबईतील वाढत्या वादळी वाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर वृक्षसंवर्धन आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी मुंबई