कॅप्टन सूर्या चौथ्या सामन्यात मोठा निर्णय घेणार ? उपकर्णधार शुभमन गिलची जागा धोक्यात!

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी २० मालिकेचा चौथा सामना गुरुवारी, ६ नोव्हेंबर रोजी क्वीन्सलँडमधील कॅरारा ओव्हल मैदानावर रंगणार आहे. सध्या मालिका १-१ अशी बरोबरीत आहे, त्यामुळे हा सामना मालिकेचा निर्णायक टप्पा ठरणार आहे.


तिसऱ्या सामन्यात काही बदल करून टीम इंडियाने विजय मिळवला आणि मालिकेत पुनरागमन केलं. आता चर्चेचा विषय आहे तो चौथ्या सामन्याचा संघ. या सामन्यासाठी वन डे टीमचा कॅप्टन आणि टी २० टीमचा व्हाईस कॅप्टन अर्थात उपकर्णधार असलेल्या शुभमन गिलला वगळणार की संघात ठेवणार या प्रश्नाचे उत्तर थोड्याच वेळात मिळणार आहे.


शुभमनला मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांत फारशी चमक दाखवता आलेली नाही. त्याने आतापर्यंत एकूण ५७ धावा केल्या आहेत आणि सलग दहा टी २० सामन्यांत एकदाही अर्धशतक झळकावलेलं नाही. ही कामगिरी ना संघासाठी उपयोगाची ठरत आहे, ना त्याच्या लौकिकाला साजेशी आहे.


अभिषेक शर्मा सतत चांगली कामगिरी करत असताना गिल मात्र संघर्ष करताना दिसतो आहे. त्यामुळे टीम मॅनेजमेंट आता गिलऐवजी संजू सॅमसनला पुन्हा संधी देणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.


गौतम गंभीर यांच्या कोचिंगखाली शुभमनला संघात स्थान मिळावे म्हणून संजूच्या ओपनिंग पोजिशनमध्ये बदल करण्यात आला होता. संजू पूर्वी सलामीला खेळत होता, पण गिलच्या पुनरागमनानंतर त्याला मिडल ऑर्डरमध्ये हलवण्यात आलं. मात्र या बदलाचा काही विशेष परिणाम दिसला नाही, उलट तिसऱ्या सामन्यात संजूला संघातून बाहेर बसावं लागलं.


आता चौथ्या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादव आणि कोच गंभीर पुन्हा संघरचनेत बदल करतील का, याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे.


संभाव्य भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल / संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, जितेश शर्मा (विकेटकीपर), हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती आणि अर्शदीप सिंह.

Comments
Add Comment

राष्ट्रीय खोखोपटू सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेत प्रमुख अधिकारी (प्र) म्हणून नियुक्ती

मुंबई : राष्ट्रीय खोखोपटू तथा क्रीडा प्रसारक श्री. सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेच्या दुकाने व आस्थापना

WPL 2026 Final: बंगळूरची विजयी घोडदौड दिल्ली थांबवू शकणार का?

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. रॉयल चॅलेंजर्स

IND vs PAK : "आयसीसीचे मुख्यालय भारतात असते तर बॉम्बने उडवले असते..."; पाकिस्तानी अभिनेत्याचे वादग्रस्त विधान

रविवारी (१ फेब्रुवारी) पाकिस्तान सरकारने जाहीर केले की त्यांचा संघ २०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी मैदानात उतरेल,

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन निवडणुकीची स्थगिती कायम, रोहित पवारांच्या अडचणीत वाढ

नवी दिल्ली  : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि आमदार रोहित पवार यांना सर्वोच्च न्यायालयाने जोरदार

IND vs PAK : पाकिस्तान नेहमीप्रमाणे "यू-टर्न" घेईल; सुनील गावस्कर यांची पाकिस्तानवर टीका

मुंबई: टी-२० विश्वचषकापूर्वी पाकिस्तान सरकारने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे.

जोकोविचला नमवत कार्लोसची ऑस्ट्रेलियन ओपनला गवसणी

मेलबर्न : ऑस्ट्रेलियन ओपन २०२६च्या पुरुष एकेरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्पेनच्या युवा खेळाडू कार्लोस