जे काही निर्माण करू शकत नाहीत, तेच तोडफोडीची भाषा बोलणार

खासदार श्रीकांत शिंदेंचा पहिल्यांदाच राज ठाकरेंवर वार


बुलढाणा  : राज्यातील गडकिल्ल्यांवरील नमो केंद्रावरून राज ठाकरे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी पहिल्यांदाच त्यांच्यावर टीका केली आहे. हे लोक काहीही निर्माण करू शकत नाहीत, त्यामुळे हे तोडफोडीचीच भाषा करणार अशी टीका श्रीकांत शिंदे यांनी केली. श्रीकांत शिंदे यांनी पहिल्यांदाच राज ठाकरेंवर थेट टीका केली आहे.


राज्य सरकारच्या पर्यटन विभागाकडून शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर नमो केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून पर्यटकांना माहिती व सुविधा देण्यात येणार आहे. शिवरायांच्या किल्ल्यांवर मोदींच्या नावाने केंद्र उभारण्याला राज ठाकरेंनी विरोध केला आहे. हे केंद्र फोडून टाकण्याचा इशाराही त्यांनी दिला. त्याचवरून आता श्रीकांत शिंदे यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली.


राज ठाकरे यांच्यावर टीका करताना श्रीकांत शिंदे म्हणाले की, ‘राज ठाकरे नमो पर्यटन केंद्र फोडण्याचा इशारा देतात, कारण त्यांच्याकडून काहीही चांगले झाले नाही. हे लोक काही निर्माण करू शकत नाहीत, त्यामुळे हे तोडफोडीचीच भाषा करणार. एवढी आगपाखड करण्याची गरज काय? गडकिल्ल्यावर पर्यटकांना माहिती मिळण्यासाठी ते केंद्र सुरू करण्यात येत आहे. गडकिल्ल्यांचे किंवा मंदिरांच्या जीर्णोद्धाराचे काम महायुतीने केले. त्यामुळे नरेंद्र मोदींचे कौतुक करण्याऐवजी ते फोडण्याची भाषा करतात. मात्र कधीकाळी यांनीही नरेंद्र मोदींचे कौतुक केले होते.’


उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, ‘लोकांना कोण खरे, कोण खोटे, कोण देणार आहे, कोण घेणार आहे. हे सगळे माहीत असते. आता अतिवृष्टी झाली, त्यावेळेस महायुती सरकारने ३८ हजार कोटींचे पॅकेज दिले. ज्या वेळेस आमचे कार्यकर्ते शेतकऱ्यांना भेटायला गेले तर त्यांनी काही ना काही सोबत नेले होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काहीही केले नाही. त्यामुळे शेतकरी यांच्या दौऱ्याकडे पाठ
फिरवत आहेत.’


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसदर्भात बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले की, ‘आम्ही लोकसभेची व विधानसभेची निवडणूक महायुती म्हणून लढलो. मात्र ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. त्यामुळे प्रयत्न महायुतीचा असेल, जिथे कार्यकर्त्यांच्या वेगळ्या भावना असतील त्या ठिकाणी वरिष्ठ निर्णय घेतील.’

Comments
Add Comment

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना ₹१५०० येणार की ₹३००० येणार? अपडेट काय ?

Ladki Bahin Yojana: राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना म्हणून ओळखली जाणारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अनेक गरजू

Maharashtra Heat Wave : राज्यभर उष्णतेचा कहर; अकोल्यात ४५.६ अंशांची नोंद, पुढील दोन दिवसांत आणखी वाढीचा अंदाज

महाराष्ट्रात सध्या उन्हाचा प्रचंड तडाखा जाणवत असून राज्यभर तापमानाने अक्षरशः उच्चांक गाठला आहे. मराठवाडा,

Heat Wave: पुढील तीन दिवस जरा जपूनच ! राज्यातील 'हे' शहर जगातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत; नाशिकची स्थिती काय ?

Maharashtra Weather Update : राज्यभरात तपमानानं कहर केल्याचे चित्र आहे. अशातच प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविलेल्या

TCS Nashik Case : मी देवाचे आभार मानते, टीसीएसमध्ये सहा वर्षे काम करुनही मी जिवंत; महिलेने सांगितला धक्कादायक अनुभव

नाशिक : नाशिकच्या टीसीएस या कंपनीतील धर्मांतरण आणि लैंगिक शोषण ( Conversion and sexual abuse) या प्रकरणाची सध्या नाशिकच नव्हे

Ashok Kharat : भोंदू खरातचा आणखी एक कारनामा समोर, फार्म हाऊसवर मुलींसोबत दारु प्यायचा, नशेत... ; सीएचा अशोक खरातविरोधात धक्कादायक खुलासा

नाशिक : स्वतःला दैवी अवतार सांगणारा भोंदू अशोक खरात यांच्या गळाचा आता आणखी आवळला जाणार आहे कारण याप्रकरणाच्या

Drugs Case : मीरा रोडमध्ये २३.३ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त, तिघांना अटक

मीरा रोड : मुंबईलगतच्या मीरा-भाईंदर शहरात पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत वेगवेगळ्या कारवाईत एकूण तेवीस लाख तीस