राज ठाकरे संतापले; निष्क्रिय शाखाध्यक्षांना थेट काढून टाकण्याचे आदेश

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत कमालीचे संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले. कामाचा निरुत्साह आणि अपेक्षित कामगिरी न दिसल्यामुळे त्यांनी शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची जोरदार कानउघडणी केली. "जर काम करायची इच्छा नसेल, तर लगेच पद सोडा," अशा कठोर शब्दांत राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना फटकारले.


राज ठाकरे यांनी बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. "इतके दिवस तुम्ही काय काम केले, ते दाखवा. मतदार याद्या पूर्ण का केल्या नाहीत?" असा थेट आणि रोखठोक प्रश्न त्यांनी विचारला. बूथ पातळीवरील कामे, पक्ष बांधणी आणि पक्ष संघटना यांसारख्या विषयांवर पदाधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने राज ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.


पदाधिकाऱ्यांच्या कामाच्या या थंड प्रतिसादामुळे राज ठाकरे यांचा संताप अनावर झाला. त्यांनी थेट आदेश देत, ज्यांनी काम केले नाही, अशा सर्व पदाधिकाऱ्यांना त्वरित काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. या नाराजीनंतर राज ठाकरे यांनी बैठक लवकर संपवून लगेच निघून जाणे पसंत केले. राज ठाकरे पदाधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर किती गंभीर आहेत, हे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.


Comments
Add Comment

Sangli School Van Accident : धक्कादायक! स्कूल व्हॅनचा भीषण अपघात; पाच वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू

सांगली : सांगलीतील शिराळा तालुक्यातून आटूगडेवाडी येथे स्कूल व्हॅनचा भीषण अपघात होऊन पाच वर्षीय मुलीचा जागीच

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ बनविण्यासाठी युवा कल्पनांना व्यासपीठ देण्यात येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

· ‘द गव्हर्नन्स चॅलेंज २०२६’चे चौथे पर्व घोषित · ३० नामांकित व्यवस्थापन व सार्वजनिक धोरण संस्थांमधील

Maharashtra News : राज्यातील प्रत्येक विभागात भव्य लोककला महोत्सव; आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्रातील लोककला आणि लोककलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी आता राज्याच्या प्रत्येक विभागात भव्य

ST Employees Salary : एसटीच्या 86 हजार कर्मचाऱ्यांना दिलासा; 11 ऑगस्टला खात्यात जमा होणार जुलैचे वेतन

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86 हजार कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन 11 ऑगस्ट रोजी

Nitesh Rane : मंत्री नितेश राणेंनी घेतली 'ताज हॉटेल्स'च्या सीईओंची भेट

मुंबई : राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी

Food Poisoning : आश्रमशाळेच्या जेवणातून विद्यार्थ्यांना विषबाधा; २७ मुले, ५ मुली उपजिल्हा रुग्णालयात

नांदेड : देगलूर तालुक्यातील हणेगावच्या वसंतराव नाईक निवासी आश्रमशाळेत जेवणातून