राज्यावर पावसाचं संकट कायम ; हवामान विभागाचा इशारा

मुंबई : एरवी सप्टेंबर - ऑक्टोबर दरम्यान पाऊस पडणे थांबते. पण यंदा नोव्हेंबर महिना आला तरी राज्यातच नाही तर देशातही ठिकठिकाणी पाऊस पडत आहे. या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे शेतीचं आणि पशुधनाचं नुकसान झालं आहे. राज्यात आणखी किमान तीन दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.


महाराष्ट्रात किमान तीन दिवस हलक्या ते माध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. हा पाऊस पडत असताना ठिकठिकाणी विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. पुणे, सांगली, सातारा येथे ढगाळ वातावरण असेल. विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचीही शक्यता असल्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. मोंथा चक्रीवादळांनंतर आणखी एका वादळाचा फटका बसणार असल्याने पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम असेल; असे हवामान विभागाने सांगितले.


हवामान विभागाचा इशारा


नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच देशातील हवामानात मोठा बदल होत आहे. पश्चिमी विक्षोभ सक्रिय झाल्यामुळे देशाच्या अनेक भागात पाऊस आणि वादळे येऊ शकतात. तसेच ८ नोव्हेंबर पर्यंत उत्तराखंड, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.


रत्नागिरी, सांगली, सातारा, अहिल्यानगर, पुणे या भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस येईल. बीड, नांदेड, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, परभणी, ठाणे, रायगड, जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असेल आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. राज्यातील इतरही जिल्ह्यांमध्ये पाऊस हजेरी लावण्याचे संकेत वर्तवले जात आहेत, यादरम्यान वेगाने वारेही वाहण्याची शक्यता आहे.


८ नोव्हेंबर पर्यंत संकेत आहे


हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, सोमवारपासून सक्रिय झालेल्या पश्चिमी विक्षोभाचा उत्तर प्रदेशवर सौम्य परिणाम होऊ शकतो. बहुतेक ठिकाणी पावसाची अपेक्षा नाही. मध्य आणि पश्चिम भारतात हवामान बदल दिसून येत आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, पूर्व मध्य प्रदेशात वादळ आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण आणि गोवा किनारपट्टी भागात 5 ते 6 नोव्हेंबर दरम्यान वादळ येण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Rahuri : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात ; लालपरी, कारच्या अपघातात तीनजण गंभीर

Rahuri : नगर-मनमाड महामार्गावर (Nagar-Manmad highway) कोल्हार खुर्द शिवारात राज्य परिवहन महामंडळाची बस व कारचा समोरासमोर भीषण

Ahilyanagar : धुवाधार पावसाचा कहर ! घाटघर येथे ३२१ मिमी पावसाची नोंद, अनेक धबधबे, किल्ले आणि ट्रेकिंग मार्गांवर प्रवेशबंदी

Ahilyanagar : अकोले तालुक्यात मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून हरिश्चंद्रगड-भंडारदरा (Harishchandragad and Bhandardara) परिसरात

Tukaram Maharaj Palkhi Sohala 2026 : तुकोबाराय व माऊलींच्या पालखी स्वागतासाठी पिंपरी-चिंचवड सज्ज

पुणे : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी

Satara : महाबळेश्वरमध्ये 24 तासांत 513 मिमिची नोंद, 100 वर्षांतील विक्रमी पाऊस

Satara : मराठवाडा वगळता राज्यातील इतर भागात मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबई (Mumbai), पुणे , नाशिक याठिकाणी पावसाने मोठ्या

Chandrashekhar Bawankule : गौण खनिजाची चोरी रोखण्यासाठी कोकणासह प्रमुख शहरांमध्ये 'ड्रोन' सर्वेक्षण

- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा; गौण खनिजांच्या देखरेखीसाठी कोकणात हायटेक

Maharashtra Monsoon Update : मान्सून 'ब्रेक'वर जाणार! ८ जुलैपासून राज्यात पावसाचा जोर ओसरणार; पुढील १० दिवस महत्त्वाचे

मुंबई : मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात जुलैच्या सुरुवातीलाच मुसळधार पावसाने हजेरी लावली असली, तरी संपूर्ण राज्यात