खासदार डॉ. सवरा पालघरचे निवडणूक प्रभारी

आमदार राजन नाईक वसई-विरारचे निवडणूक प्रमुख


पालघर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी राज्यातील निवडणूक प्रमुख आणि निवडणूक प्रभारींच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. पालघरचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांची वसई-विरार आणि पालघरच्या निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वसई विरारच्या निवडणूक प्रमुखपदी नालासोपाराचे आमदार राजन नाईक यांची तर पालघरच्या निवडणूक प्रमुखपदी बाबजी काठोळे यांचे नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे संघटनात्मक दृष्ट्या राज्यात ७५ जिल्हे आहेत. आणि या सर्व ठिकाणी जिल्हाध्यक्ष सुद्धा आहेत. पक्षाचे संघटन वाढविण्याच्या दृष्टीने भाजपचे सर्व उपक्रम या सर्वच जिल्ह्यांमध्ये राबविल्या जातात. दरम्यान, जानेवारी २०२६ पूर्वी राज्यात नगरपालिका, नगरपंचायत, नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुका कालच जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्यात ७५ निवडणूक प्रमुख नेमले आहेत. तर ३५ निवडणूक प्रभारींची नियुक्ती सुद्धा केली आहे. पालघर आणि वसई विरार जिल्ह्यामधील निवडणुकांसाठी निवडणूक प्रभारी म्हणून खासदार डॉ. सवरा यांना जबाबदारी देण्यात आल्याने या बाबीचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला चांगलाच फायदा होणार आहे.

Comments
Add Comment

Bullet Train : बुलेट ट्रेनचे राज्यातील काम जोरात, तंत्रज्ञांनी पालघर जिल्ह्यात केली कमाल

पालघर : मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर आहे. केंद्रातल्या मोदी सरकार आणि राज्यातल्या फडणवीस

Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन: पालघरमध्ये तिसऱ्या डोंगराळ बोगद्याचे काम फत्ते; अवघ्या ५ महिन्यांत महाराष्ट्रातील 'हे' मोठे आव्हान पूर्ण

पालघर : देशातील पहिल्या हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाच्या (high-Speed Railway Project) म्हणजेच 'मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन'च्या

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातात ठार १३ जणांवर अंत्यसंस्कार, पीडित कुटुंबांचे पालकत्व शासन स्वीकारणार

डहाणू : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील धनिवरी येथे १८ मे रोजी झालेल्या भीषण अपघातातील १३ मृतांवर आज अत्यंत

Palghar Accident : काळजाचा ठोका चुकवणारं दृश्य! एकाच रांगेत १२ मृतदेह, बापूगावात महिलांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश

पालघर : आनंदाने नटलेले घर, साखरपुड्याच्या निमित्ताने जमलेले सर्व नातेवाईक आणि उत्साहाचे वातावरण... पण नियतीच्या

Palghar Accident : साखरपुड्याच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १३ जणांचा मृत्यू; मृतांच्या वारसांना मदत जाहीर

डहाणू : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील धानोरी येथे रविवारी दुपारी एक अत्यंत भीषण आणि

Mumbai- Ahemdabad Expressway Accident : डहाणूमध्ये 100 वऱ्हाड्यांनी भरलेल्या ट्रकला भरधाव कंटेनरची धडक; 12 जणांचा जागीच मृत्यू, 25 हून अधिक गंभीर

डहाणू : साखरपुड्याचा आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या पाहुण्यांवर काळाने अचानक