मुख्यमंत्री असताना कधी घराबाहेर पडले नाही, पराभवानंतर आता लोकांमध्ये जाण्याची जाणीव झाली!

उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांचे धारदार टीकास्त्र


नागपूर : शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा करत असताना, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सलग दुसऱ्या दिवशी त्यांच्या दौऱ्यावर जोरदार टीका केली आहे. "मुख्यमंत्री असताना त्यांनी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी कधीच ‘कारपेट’ सोडले नाही. आता सततच्या पराभवानंतर त्यांना लोकांमध्ये जावे लागत असल्याची जाणीव झाली आहे," असा बोचरा टोला फडणवीसांनी नागपूर येथे लगावला.


उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचा दावा करत, एकरी ५० हजार रुपये आणि जमीन खरवडून गेलेल्या शेतकऱ्यांना एकरी साडेतीन लाख रुपये मदतीची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "उद्धव ठाकरे बाहेर पडले याचा मला आनंद आहे. कारण मुख्यमंत्री असताना ते कारपेटवरून खाली उतरले नाहीत. आता पराभवानंतर किमान त्यांच्या लक्षात आले की लोकांमध्ये जावे लागते."



'निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आले...'


मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाकरे यांच्या दौऱ्यामागचे कारणही स्पष्ट केले. ते म्हणाले, "निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते आलेले आहेत. सरकारचं पॅकेज लोकांच्या खात्यात पोहोचतच आहे. त्यामुळे त्यांना फारसा प्रतिसाद मिळत नाहीये." इतकंच नव्हे तर, "लोकांना पकडून त्यांच्या भेटीसाठी आणले जात आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली आहे," असा गंभीर आरोपही त्यांनी केला.



मदत वाटपाला विलंब का? मुख्यमंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण


शेतकऱ्यांना अद्याप आर्थिक मदत मिळाली नसल्याचे आरोप होत असल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले. त्यांनी मान्य केले की, "हे खरं आहे की, काही ठिकाणी अजून पॅकेज पोहोचलेलं नाही. त्या ठिकाणच्या लोकांच्या मनात संभ्रम आहे." परंतु, आरबीआयच्या नियमानुसार रोज जास्तीत जास्त ६०० कोटी रुपयेच वितरित करता येतात. "त्यामुळेच उशीर लागत आहे. मात्र, रोज याच गतीने मदत वाटप सुरू असून, आता जवळपास संपूर्ण पॅकेज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल," असे आश्वासन त्यांनी दिले.


निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना फारसा प्रतिसाद मिळणार नाही, असे मतही मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेवटी व्यक्त केले.

Comments
Add Comment

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder)

आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा