अमिताभ बच्चन यांनी विकले २ आलिशान फ्लॅट्स; १२ कोटींना झाला व्यवहार

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील गोरेगाव येथे असलेले त्यांचे दोन लक्झरी फ्लॅट्स विकले आहेत. हा व्यवहार १२ कोटी रुपयांना झाला असल्याची माहिती प्रॉपर्टी नोंदणी कागदपत्रांमधून समोर आली आहे. विशेष म्हणजे, अमिताभ बच्चन यांनी हे फ्लॅट्स २०१२ मध्ये ८.१२ कोटी रुपयांना खरेदी केले होते. याचा अर्थ, मागील १३ वर्षांत त्यांना या व्यवहारात सुमारे ४७% बंपर नफा मिळाला आहे. हे दोन्ही फ्लॅट्स गोरेगाव ईस्ट येथील ओबेरॉय एक्सक्विझिट बिल्डिंगच्या ४७ व्या मजल्यावर होते.


पहिला फ्लॅट आशा ईश्वर शुक्ला यांनी ६ कोटी रुपयांना खरेदी केला. यासाठी ३० लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी आणि ३०,००० रुपयांची नोंदणी फी (रजिस्ट्रेशन फीस) लागली. हा व्यवहार ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी रजिस्टर झाला. दुसरा फ्लॅट ममता सूरजदेव शुक्ला यांनी देखील ६ कोटी रुपयांना खरेदी केला. यासाठीही तेवढीच स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी फी लागली. हा करार १ नोव्हेंबर २०२५ रोजी रजिस्टर झाला. दोन्ही फ्लॅट्ससोबत चार कार पार्किंगची जागा देखील विकण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Bandra : वांद्रे पूर्वेतील गरीब नगरमध्ये तोडक कारवाईदरम्यान राडा; पोलिसांवर पेव्हर ब्लॉक भिरकावणारा गजाआड

मुंबई : मुंबईतील वांद्रे पूर्व येथील 'गरीब नगर' (Garib Nagar) परिसरात सुरू असलेल्या तोडक कारवाईदरम्यान एक अत्यंत

Mumbai Accident : वर्सोवा-जुहू लिंक रोडवर भीषण अपघात; भरधाव बसने अनेक गाड्यांना दिली धडक

मुंबई : मुंबईतील वर्सोवा-जुहू लिंक रोडवर एका भरधाव बसने अक्षरशः धुमाकूळ घातल्याची धक्कादायक घटना घडली. चालकाचे

Cyber Crime : मुंबईत सायबर गुन्ह्यातील १०० कोटी वाचविण्यात यश

मुंबई : गेल्या काही वर्षांत सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून सायबर पोलिसांनी

आता गावकऱ्यांना मिळणार मोफत मिळकत पत्रिका

सनद फी माफ करण्याची महसूलमंत्री बावनकुळेंची घोषणा; ग्रामविकास विभाग प्रस्ताव तयार करणार मुंबई : ग्रामपंचायत

वाई येथे लघुकुंभमेळ्याचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते संपन्न

वाईच्या लघुकुंभ मेळ्याची महती संपूर्ण राज्यात पसरणार:-जयकुमार गोरे सातारा वाई नगरीला “दक्षिण काशी” अशी ओळख

गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्यांना आता 'मकोका' लागणार!

गृह विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी; बेकायदेशीर कत्तलखान्यांवर कारवाईसाठी संयुक्त भरारी पथके आणि सीमांवर