कुलाबा कॉजवे परिसरातील ६७ अनधिकृत फेरीवाल्यांना हटवले, महानगरपालिकेच्या ए विभागाकडून कारवाई

मुंबई (खास प्रतिनिधी): कुलाबा कॉजवे परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात त्वरीत कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपाचे माजी नगरसेवक ऍड मकरंद नार्वेकर यांनी दिल्यानंतर महापालिकेच्या ए विभागाच्या वतीने मंगळवारी ४ नोव्हेंबर २०२५ रोजी तोडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण ६७ अनधिकृत फेरीवाल्यांनी केलेले अतिक्रमण हटविण्यात आले.


अनधिकृत बांधकामे निष्कासित करणे आणि नागरी नियमांचे पालन सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात कारवाई केली जात आहे.


अनधिकृत बांधकामे निष्कासित करणे आणि नागरी नियमांचे पालन सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने उप आयुक्त (परिमंडळ १) चंदा जाधव, ए विभागाचे सहायक आयुक्त जयदीप मोरे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.





या कारवाई अंतर्गत वाहतुकीस तसेच पादचाऱ्यांना अडथळा ठरणाऱ्या कुलाबा कॉजवे येथील एकूण ६७ अनधिकृत फेरीवाल्यांवर निष्कासन कारवाई करण्यात आली. मुंबई महानगरपालिकेच्या ए विभागाकडून ही कारवाई करण्यात आली. यापुढेही अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई सातत्याने सुरू राहणार आहे, असे महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Dabewala E-Bikes : डबेवाल्यांना लवकरच १०५ ई बाईक्स; महापौर रितू तावडे यांनी केली घोषणा!

मुंबईतील एक प्रवेशद्वार डबेवाला संकल्पनेवर मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत प्रस्तावित प्रवेशद्वारांपैकी एक

Deccan Queen Railway Festival : प्रतिष्ठित 'डेक्कन क्वीन' रेल्वे महोत्सव होणार साजरा

मध्य रेल्वेचा मुंबई विभाग २७ मार्च २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे, गौरवशाली 'डेक्कन क्वीन

धक्कादायक! मुलुंडमध्ये १६ वर्षीय मुलीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; आरोपी अटकेत

मुंबई : मुलुंड परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेने मुंबईत खळबळ उडाली आहे. केवळ बोलणं बंद केल्याच्या रागातून एका

खरातला दिली गेलेली पाण्याची जोडणी मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर, शीतल म्हात्रेंचा गंभीर आरोप

मुंबई: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण सध्या राज्यभरत चांगलचं गाजत आहे. नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक

किनारी रस्ता प्रकल्पात पादचारी भुयारी मार्गात छत उभारण्याचा प्रस्ताव फेटाळला

मुंबई: महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील भाग–२ मधील पादचारी भुयारी

नवी मुंबईचा प्रवास वेगवान होणार, ठाणे-बेलापूर मार्गावरील प्रवास आता सिग्नलमुक्त

नवी मुंबई: नवी मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी महानगरपालिकेने एका महत्त्वाच्या प्रकल्पाला मंजुरी