द. आफ्रिकेविरुद्ध रोहित-विराट खेळणार नाही?

तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका; १३ नोव्हेंबरपासून सुरू


मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय एकदिवसीय संघात पुनरागमन केल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी मने जिंकली. मात्र आता, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अनधिकृत एकदिवसीय मालिकेत ते खेळण्याची शक्यता कमी असल्याचे मानले जात आहे.


माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्ध होणाऱ्या ३ सामन्यांच्या एकदिवसीय (व्हाईट बॉल) मालिकेसाठी संघात स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे. भारत ‘अ’ आणि दक्षिण आफ्रिका ‘अ’ यांच्यातील ही तीन लिस्ट ‘अ’ सामन्यांची मालिका १३ नोव्हेंबरपासून सुरू होईल. दुसरा सामना १६ नोव्हेंबरला, तर तिसरा आणि शेवटचा सामना १९ नोव्हेंबरला खेळवला जाईल. ही तिन्ही सामने राजकोटमध्ये डे-नाईट स्वरूपात पार पडतील. तसेच दक्षिण आफ्रिकेच्या मुख्य संघाविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका ३० नोव्हेंबरपासून सुरू होईल.


रोहित आणि विराट सध्या फक्त ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये (वन-डे) खेळत आहेत, त्यामुळे त्यांना या मालिकेच्या संघात संधी मिळण्याची शक्यता फारच कमी आहे.


हाती आलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयकडून भारत ‘अ’ संघाची घोषणा एक-दोन दिवसांत होऊ शकते. परंतु, निवडकर्त्यांनी या तीन सामन्यांसाठी काही वेगळ्या योजना आखल्या असून, या मालिकेसाठी दोन्ही दिग्गज खेळाडूंचा समावेश करण्याची शक्यता नाही.


सध्या भारत ‘अ’ संघ बंगळूरुमधील सीओई मैदानावर दक्षिण आफ्रिका अ विरुद्ध दोन सामन्यांच्या रेड बॉल मालिकेत खेळत आहे. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील संघाने २ नोव्हेंबरला संपलेला पहिला ४ दिवसांचा सामना जिंकला आहे, तर दुसरा सामना ६ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.


रिपोर्टनुसार, भारतीय निवड समिती लवकरच बैठक घेऊन टेंबा बावुमाच्या संघाविरुद्ध होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करणार आहे. त्याच बैठकीत भारत ‘अ’ संघाची निवड होण्याचीही शक्यता आहे.


कसोटी संघाबद्दल बोलायचे झाले तर, अलीकडे वेस्ट इंडिजविरुद्ध खेळलेल्या संघात फारसे बदल अपेक्षित नाहीत, फक्त एन. जगदीसनच्या जागी ऋषभ पंतचा समावेश होऊ शकतो. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांची मालिका अनुक्रमे १४ ते १८ नोव्हेंबर (कोलकाता) आणि २२ ते २६ नोव्हेंबर (गुवाहाटी) दरम्यान होईल.कसोटीनंतर ३ वन-डे आणि ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाईल, ज्यासाठी रोहित आणि विराट यांची निवड जवळपास निश्चित आहे.



विक्रमी भागीदारीतून भारताला विजय


रोहित आणि विराट, ज्यांनी भारताचं नेतृत्व सर्व फॉरमॅटमध्ये केलं आहे, हे नुकतेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या ३ वन-डे सामन्यांच्या मालिकेत खेळले होते. त्या मालिकेत रोहित पहिल्या सामन्यात अपयशी ठरला, तर कोहली पहिल्या दोन सामन्यांत फारसा चमकला नाही. मात्र, तिसऱ्या सामन्यात दोघांनी शानदार खेळी करत विक्रमी भागीदारीतून भारताला विजय मिळवून दिला.

Comments
Add Comment

Umpire Killed Over Run-Out Argument : विशाखापट्टणम हादरलं! रनआऊट दिलं म्हणून थेट अंपायरचीच केली हत्या

विशाखापट्टणम येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने क्रीडा क्षेत्र हादरले आहे. स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या

IPL 2026 Avesh Khan : लखनऊच्या विजयावरून वाद, आवेश खानच्या 'त्या' कृतीमुळे सनरायझर्स नाराज

मुंबई : रविवार ५ एप्रिल रोजी खेळल्या गेलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या सामन्यात सनरायझर्स

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुची चेन्नई सुपर किंग्सवर 43 धावांनी मात

बंगळूरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (आरसीबी) संघाने चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) संघाचा ४३ धावांनी पराभव केला. आयपीएल

FIDE Candidates Tournament 2026 : भारतीय ग्रँडमास्टर वैशालीचा सलग दुसरा विजय

सायप्रस : भारतीय ग्रँडमास्टर आर. वैशालीने फिडे कॅन्डिडेट्स टूर्नामेंट २०२६ च्या सातव्या फेरीत शानदार कामगिरी

Mohammed Shami : ज्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगला त्यानेच...; झहीर खानला पछाडत शमीने रचला नवा विक्रम!

आयपीएल २०२६ स्पर्धेत रविवारी (५ एप्रिल) डबल हेडर सामन्यांचा थरार रंगला असून हैदराबादच्या मैदानावर झालेल्या

Bangladesh Cricket Board : बांगलादेश क्रिकेट बोर्डात खळबळ, तीन संचालकांचा राजीनामा

बांगलादेश क्रिकेट बोर्डात (बीसीबी) गोंधळाचे वातावरण आहे. ढाका येथे झालेल्या प्रदीर्घ संचालक मंडळाच्या