द. आफ्रिकेविरुद्ध रोहित-विराट खेळणार नाही?

तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका; १३ नोव्हेंबरपासून सुरू


मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय एकदिवसीय संघात पुनरागमन केल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी मने जिंकली. मात्र आता, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अनधिकृत एकदिवसीय मालिकेत ते खेळण्याची शक्यता कमी असल्याचे मानले जात आहे.


माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्ध होणाऱ्या ३ सामन्यांच्या एकदिवसीय (व्हाईट बॉल) मालिकेसाठी संघात स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे. भारत ‘अ’ आणि दक्षिण आफ्रिका ‘अ’ यांच्यातील ही तीन लिस्ट ‘अ’ सामन्यांची मालिका १३ नोव्हेंबरपासून सुरू होईल. दुसरा सामना १६ नोव्हेंबरला, तर तिसरा आणि शेवटचा सामना १९ नोव्हेंबरला खेळवला जाईल. ही तिन्ही सामने राजकोटमध्ये डे-नाईट स्वरूपात पार पडतील. तसेच दक्षिण आफ्रिकेच्या मुख्य संघाविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका ३० नोव्हेंबरपासून सुरू होईल.


रोहित आणि विराट सध्या फक्त ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये (वन-डे) खेळत आहेत, त्यामुळे त्यांना या मालिकेच्या संघात संधी मिळण्याची शक्यता फारच कमी आहे.


हाती आलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयकडून भारत ‘अ’ संघाची घोषणा एक-दोन दिवसांत होऊ शकते. परंतु, निवडकर्त्यांनी या तीन सामन्यांसाठी काही वेगळ्या योजना आखल्या असून, या मालिकेसाठी दोन्ही दिग्गज खेळाडूंचा समावेश करण्याची शक्यता नाही.


सध्या भारत ‘अ’ संघ बंगळूरुमधील सीओई मैदानावर दक्षिण आफ्रिका अ विरुद्ध दोन सामन्यांच्या रेड बॉल मालिकेत खेळत आहे. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील संघाने २ नोव्हेंबरला संपलेला पहिला ४ दिवसांचा सामना जिंकला आहे, तर दुसरा सामना ६ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.


रिपोर्टनुसार, भारतीय निवड समिती लवकरच बैठक घेऊन टेंबा बावुमाच्या संघाविरुद्ध होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करणार आहे. त्याच बैठकीत भारत ‘अ’ संघाची निवड होण्याचीही शक्यता आहे.


कसोटी संघाबद्दल बोलायचे झाले तर, अलीकडे वेस्ट इंडिजविरुद्ध खेळलेल्या संघात फारसे बदल अपेक्षित नाहीत, फक्त एन. जगदीसनच्या जागी ऋषभ पंतचा समावेश होऊ शकतो. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांची मालिका अनुक्रमे १४ ते १८ नोव्हेंबर (कोलकाता) आणि २२ ते २६ नोव्हेंबर (गुवाहाटी) दरम्यान होईल.कसोटीनंतर ३ वन-डे आणि ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाईल, ज्यासाठी रोहित आणि विराट यांची निवड जवळपास निश्चित आहे.



विक्रमी भागीदारीतून भारताला विजय


रोहित आणि विराट, ज्यांनी भारताचं नेतृत्व सर्व फॉरमॅटमध्ये केलं आहे, हे नुकतेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या ३ वन-डे सामन्यांच्या मालिकेत खेळले होते. त्या मालिकेत रोहित पहिल्या सामन्यात अपयशी ठरला, तर कोहली पहिल्या दोन सामन्यांत फारसा चमकला नाही. मात्र, तिसऱ्या सामन्यात दोघांनी शानदार खेळी करत विक्रमी भागीदारीतून भारताला विजय मिळवून दिला.

Comments
Add Comment

Chinnaswamy Stadium IPL 2026 : चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीचे सामने आयोजित करण्यास हिरवा कंदील

आयपीएल २०२६ दरम्यान बंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे सामने आयोजित करण्यातील

Virat Kohli Ideal RCB team : एबीपासून स्टार्कपर्यंत दिग्गजांचा समावेश; जाणून घ्या किंग कोहलीचा ऑल टाईम फेव्हरेट आरसीबी संघ

मुंबई : भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू म्हणजेच आरसीबीसाठी आपली ‘ऑल-टाइम

Mumbai: पोलिसांच्या छापेमारीत धक्कादायक प्रकार उघड; श्रीमंत पुरुषांना जाळ्यात अडकवून ...

मुंबई: सध्या बाजारात विविध प्रकारचे डेटिंग अॅप सुरू आहेत. मोठ्या संख्येने तरुण-तरुणी या डेटिंग अॅपवर सक्रिय

BCCI Naman Awards 2026: गिल-मानधना यांचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पुरस्काराने सन्मान; बिन्नी, द्रविड आणि मिताली यांचाही सन्मान

नवी दिल्ली: भारताचा कसोटी कर्णधार शुभमन गिल आणि स्मृती मानधना यांना २०२४-२०२५ मधील उत्कृष्ट कामगिरीसाठी रविवारी

२०२६ या खेळाडूसाठी ठरलं लकी; वर्ल्डकप जिंकला आणि आता होणार बाबा; व्हिडिओ झाला व्हायरल

मुंबई : सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात भारताने तिसऱ्यांदा टी २० विश्वचषकावर आपले नाव कोरले. आणि भारतीयांचा

पाकिस्तानच्या 'या' खेळाडूला आपलाच संताप पडला महागात; आयसीसीकडून डिमेरिट पॉइंटची शिक्षा

पाकिस्तानचा फलंदाज सलमान आघा Salman Agha पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात धावबाद झाल्यानंतर