पिंपरखेड परिसरातील नरभक्षक बिबट्या ठार ; वनविभागाची कारवाई

पुणे : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरखेड परिसरात गेल्या काही आठवड्यांपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला अखेर वनविभागाने ठार मारले आहे. या नरभक्षक बिबट्याने तब्बल तिघांचा जीव घेतल्यानंतर परिसरात निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणाला आता काहीसा विराम मिळाला आहे.


गेल्या २० दिवसांत या बिबट्याने सलग तीन जणांचा बळी घेतला होता. १२ ऑक्टोबर रोजी सहा वर्षांची शिवन्या बोंबे, २२ ऑक्टोबर रोजी ७० वर्षांच्या भागुबाई जाधव आणि २ नोव्हेंबर रोजी १३ वर्षांचा रोहन बोंबे हे तिघेही त्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडले. या घटनांनंतर परिसरात संतप्त नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले, तसेच ३ नोव्हेंबर रोजी तब्बल १८ तासांसाठी महामार्ग रोखून धरला. आंदोलकांनी संतापाच्या भरात वनविभागाचे गस्ती वाहन आणि स्थानिक बेस कॅम्पला आग लावली होती.


परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पुण्याचे वनसंरक्षक आशिष ठाकरे यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक, नागपूर यांच्या परवानगीने बिबट्याला पकडणे किंवा ठार मारण्याचे आदेश दिले. या मोहिमेसाठी रेस्क्यू संस्था पुणे येथील पशुवैद्य डॉ. सात्विक पाठव, तसेच शार्प शूटर प्रसाद दाभोळकर आणि जुबिन पोस्टवला यांची नेमणूक करण्यात आली.


पथकाने कॅमेरा ट्रॅप, ठसे निरीक्षण आणि थर्मल ड्रोनच्या मदतीने शोधमोहीम हाती घेतली. अखेर रात्री साडेदहाच्या सुमारास बिबट्याचा मागोवा घेतल्यानंतर त्याला बेशुद्ध करण्यासाठी डार्ट मारण्यात आला, मात्र तो निष्फळ ठरला. त्यानंतर चवताळलेल्या बिबट्याने पथकावर हल्ला केला, तेव्हा शार्प शूटरने अचूक नेम साधत त्याला ठार केले. प्राथमिक तपासानुसार हा सुमारे पाच ते सहा वर्षांचा नर बिबट असल्याचे स्पष्ट झाले आहे.


Comments
Add Comment

Wipro Office Religious Harassment : TCS नंतर आता विप्रोही वादाच्या भोवऱ्यात? धर्म बदलण्यास नकार दिल्याने नोकरी गमवावी लागली; पुण्यातील माजी कर्मचारीचा गंभीर आरोप

पुणे : नाशिकमधील TCS कार्यालयात कथित धार्मिक छळ आणि धर्मांतराच्या दबावाच्या आरोपांनंतर आता पुण्यातील आयटी कंपनी

Shrirampur ATS Raid : पाकिस्तानी गँगस्टरच्या सोशल मीडिया नेटवर्कचा महाराष्ट्रात शिरकाव? श्रीरामपूरमध्ये ATS ची मोठी कारवाई, चार जण ताब्यात

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात मोठी कारवाई करत चार संशयितांना

Minister Makarand Jadhav-Patil : राज्यात नवे पुनर्वसन धोरण येणार

मंत्री मकरंद जाधव-पाटील; कालानुरूप सर्व बदल समाविष्ट करणार मुंबई : राज्यातील दरडप्रवण गावांचे कायमस्वरूपी

HSRP Number Plates : वाहनधारकांसाठी महत्त्वाची सूचना! ३० जूनपूर्वी HSRP नंबर प्लेट बसवणे अनिवार्य; अन्यथा कारवाईची शक्यता

राज्यातील लाखो वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ अंतर्गत सर्व शासकीय आणि

Shivrajyabhishek Sohala : शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी शिवभक्तांसाठी विशेष बससेवा सुरू; आता दादरहून थेट सांदोशीपर्यंत प्रवास करता येणार

रायगड : शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रायगडावर जाणाऱ्या शिवभक्तांसाठी दिलासादायक बातमी समोर आली

Raigad Crime : सोन्याच्या दागिन्यांसाठी महिलेचे अपहरण करून खून; दोघांना अटक

रायगड : सोन्याच्या दागिन्यांच्या लालसेपोटी एका महिलेचे अपहरण करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना मांडवा