निवडणूक प्रमुख आणि जिल्हा निवडणूक प्रभारी यांची यादी जाहीर; स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपने रणशिंग फुंकले!

सिंधुदुर्गच्या प्रभारीपदी मंत्री नितेश राणे तर निवडणूक प्रमुखपदी प्रमोद जठार यांची निवड


मुंबई : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक-२०२५ आणि जिल्हा निवडणूक तयारीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र स्तरावर संघटनात्मक नियुक्त्यांची मोठी घोषणा केली आहे. पक्षाने विविध जिल्ह्यांसाठी निवडणूक प्रमुख आणि जिल्हा निवडणूक प्रभारी यांची यादी जाहीर करून निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. या नियुक्त्यांमध्ये प्रामुख्याने सिधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, उल्हासनगर, पालघर, नाशिक, पुणे, सोलापूर आणि सातारा यासह एकूण ३५ संघटनात्मक जिल्ह्यांचा समावेश आहे.


सिंधुदुर्गसाठी निवडणूक प्रमुख म्हणून प्रमोद जठारतर निवडणूक प्रभारी म्हणून मत्सव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची निवड करण्यात आली आहे.


रत्नागिरी शहर निवडणूक प्रमुख म्हणून विनय नातू तर रत्नागिरी दक्षिणची जबाबदारी अतुल काळसेकर यांच्याकडे देण्यात आली आहे. तर निरंजन डावखरे यांची दोन्ही विभागांसाठी प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


ठाणे शहर : संजय केळकर हे निवडणूक प्रमुख तर गणेश नाईक हे प्रभारी म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. नाशिक शहर आणि उत्तर : नाशिक शहरसाठी राहुल ढिकले आणि नाशिक उत्तरसाठी राहुल आहेर यांची निवड करण्यात आली असून, जिल्ह्याच्या प्रभारीपदाची धुरा गिरीश महाजन यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.


पुणे शहर आणि पुणे उत्तर (बारामती) साठी अनुक्रमे गणेश बिडकर आणि महेश लांडगे यांची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे.पुणे विभाग आणि पिंपरी-चिंचवडच्या निवडणूक तयारीचे प्रमुख म्हणून मुरलीधर मोहोळ हे काम पाहणार आहेत.


अहमदनगर : अहमदनगर शहर, उत्तर आणि दक्षिणसाठी श्रीमती मेधा विधाते, डॉ. संजय रिठे पाटील यांच्यासह राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे प्रभारीपदाची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.


सोलापूर : सोलापूर शहर आणि सोलापूर दक्षिणसाठी सचिन कल्याणशेट्टी यांच्यासह जयकुमार गोरे हे प्रभारी असतील.सातारा: सातारा जिल्ह्याच्या प्रभारीपदी शिवेंद्रराजे भोसले यांची नियुक्ती झाली आहे.


या यादीमध्ये अनुभवी नेत्यांसह अनेक तरुण नेत्यांना संधी देण्यात आली आहे. ज्यामुळे भाजप आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी सज्ज झाल्याचे स्पष्ट होते. या नियुक्त्यांच्या माध्यमातून पक्षाने निवडणुकीची मजबूत संघटनात्मक बांधणी सुरू केल्याचे दिसत आहे.

Comments
Add Comment

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी

ग्रामीण भागातील घरबांधणी आता होणार सुलभ; बांधकाम परवानगीचे अधिकार तालुका स्तरावर देण्याचे संकेत!

- मंत्री उदय सामंत यांचे विधानपरिषदेत आश्वासन मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या घराच्या

Jalna: गॅस एजन्सीचे गोडाऊन फोडले अन् ११० सिलिंडर चोरले, जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जालना: जालना तालुक्यातील रामनगर परिसरात गॅस एजन्सीच्या गोडाऊनमध्ये चक्क गॅस सिलिंडरची मोठी चोरी झाल्याचा

Weather Update: महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांना अलर्ट, ताशी ३० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार

मुंबई: महाराष्ट्रावर ऐन उन्हाळ्यात अस्मानी संकट घोंघावत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला उष्णतेच्या लाटेने

लालपरीचा कायापालट, २२ हजार बसेस पूर्णपणे बदलणार; मंत्री सरनाईकांची माहिती

मुंबई : ग्रामीण महाराष्ट्राची लाईफलाईन मानली जाणारी लालपरी आता मोठ्या बदलाच्या दिशेने वाटचाल करत आहे. राज्य

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, गॅस बुकींगनंतर ९६ तासांत सिलेंडर घरपोच होणार; जिल्हाधिकाऱ्यांचे एजन्सींना आदेश

पुणे: मराठी नववर्षारंभ म्हणजेच गुढी पाडव्याचा सण अवघ्या दोन-तीन दिवसांवर येऊन ठेपला असताना गॅस टंचाईमुळे