लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी ; ई-केवायसीची मुदत वाढवली

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सरकारकडून एक मोठा दिलासा देण्यात आला आहे. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी करणं अनिवार्य ठरवण्यात आलं आहे. साधारण दोन महिन्यांपूर्वी महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी महिलांना ई-केवायसी पूर्ण करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, अद्याप अनेक महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नव्हती. काहींना तांत्रिक अडचणींमुळे हे शक्य झालं नव्हतं.


या पार्श्वभूमीवर सरकारने ई-केवायसीसाठीची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता लाभार्थींना १८ नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण करता येणार आहे. २८ ऑक्टोबर रोजी झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे लाडक्या बहिणींना आणखी काही दिवसांची मुभा मिळाली आहे.


दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यास सुरुवात झाली आहे. पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये लवकरच १५०० रुपयांचा निधी जमा होणार आहे.


अनेक महिलांना ई-केवायसी प्रक्रियेत तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः ज्या महिलांकडे पती किंवा वडिलांचं आधार कार्ड नाही, त्यांच्यासाठी ही प्रक्रिया अधिक कठीण ठरत आहे. त्यामुळे सरकारकडून अशा महिलांसाठी स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून देण्याचा विचार सुरू असल्याची माहिती मिळते.

Comments
Add Comment

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत

'मशिदीवर पुन्हा भोंगे लावण्याचे उबाठाचे वचन'

मुंबई :मशिदीवरील भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देत उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रचार केला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री