लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी ; ई-केवायसीची मुदत वाढवली

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सरकारकडून एक मोठा दिलासा देण्यात आला आहे. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी करणं अनिवार्य ठरवण्यात आलं आहे. साधारण दोन महिन्यांपूर्वी महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी महिलांना ई-केवायसी पूर्ण करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, अद्याप अनेक महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नव्हती. काहींना तांत्रिक अडचणींमुळे हे शक्य झालं नव्हतं.


या पार्श्वभूमीवर सरकारने ई-केवायसीसाठीची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता लाभार्थींना १८ नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण करता येणार आहे. २८ ऑक्टोबर रोजी झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे लाडक्या बहिणींना आणखी काही दिवसांची मुभा मिळाली आहे.


दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यास सुरुवात झाली आहे. पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये लवकरच १५०० रुपयांचा निधी जमा होणार आहे.


अनेक महिलांना ई-केवायसी प्रक्रियेत तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः ज्या महिलांकडे पती किंवा वडिलांचं आधार कार्ड नाही, त्यांच्यासाठी ही प्रक्रिया अधिक कठीण ठरत आहे. त्यामुळे सरकारकडून अशा महिलांसाठी स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून देण्याचा विचार सुरू असल्याची माहिती मिळते.

Comments
Add Comment

X अर्थात Twitter बंद पडलं, युझर त्रस्त

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) जो आधी ट्विटर (Twitter) या नावाने ओळखला जात होता तो शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी

काँग्रेसमुळे मुंबईत ठाकरे बंधूंच्या ७ जागा पडल्या

मुंबई : ज्या काँग्रेसपायी उबाठाने भाजपशी नाते तोडले, त्याच काँग्रेसमुळे मुंबई पालिका निवडणुकीत त्यांना ७

भावनिक आवाहनाला न फसता महाराष्ट्राच्या विकासाला मतदारांची पसंती - भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

मुंबई : वर्षानुवर्षे भाजपा कार्यकर्त्याने यशाच्या दिशेने पार्टीला नेण्याचे स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न साकार

BMC Election 2026 : भाजपची ऐतिहासिक मुसंडी तर ठाकरे, काँग्रेसचं काय? २९ महापालिकांच्या रणसंग्रामाचे 'A to Z' अपडेट्स!

मुंबई : भाजपचे निर्विवाद वर्चस्व राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) दणदणीत

 कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मलबार हिलचा गड राखला, भाजपाचे पाचही उमेदवार विजयी - मलबार हिल मध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबईतला आपला मलबार हिलचा गड राखला आहे. त्यांच्या

BMC Election 2026 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची २९ पैकी १४ महापालिकेत घसरगुंडी! पुणे-पिंपरी चिंचवडमध्येही भोपळा फुटला नाही

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल आज समोर येत असून, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील