लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी ; ई-केवायसीची मुदत वाढवली

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सरकारकडून एक मोठा दिलासा देण्यात आला आहे. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी करणं अनिवार्य ठरवण्यात आलं आहे. साधारण दोन महिन्यांपूर्वी महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी महिलांना ई-केवायसी पूर्ण करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, अद्याप अनेक महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नव्हती. काहींना तांत्रिक अडचणींमुळे हे शक्य झालं नव्हतं.


या पार्श्वभूमीवर सरकारने ई-केवायसीसाठीची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता लाभार्थींना १८ नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण करता येणार आहे. २८ ऑक्टोबर रोजी झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे लाडक्या बहिणींना आणखी काही दिवसांची मुभा मिळाली आहे.


दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यास सुरुवात झाली आहे. पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये लवकरच १५०० रुपयांचा निधी जमा होणार आहे.


अनेक महिलांना ई-केवायसी प्रक्रियेत तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः ज्या महिलांकडे पती किंवा वडिलांचं आधार कार्ड नाही, त्यांच्यासाठी ही प्रक्रिया अधिक कठीण ठरत आहे. त्यामुळे सरकारकडून अशा महिलांसाठी स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून देण्याचा विचार सुरू असल्याची माहिती मिळते.

Comments
Add Comment

अटल सागरी सेतूवरून २६ महिन्यांत २ कोटी वाहनांचा प्रवास!

मुंबई : मुंबईला वेगाने विकसित होत असलेल्या तिसऱ्या मुंबईशी जोडणाऱ्या अटल सागरी सेतूवरून २६ महिन्यांत २ कोटी

चॅटबॉटमुळे नागरिकांना अचूक माहिती;

१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स उपक्रमात शालेय शिक्षण विभागाचा गौरव मुंबई : शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने १५०

 रामनवमी भंडाऱ्यासाठी मंत्री लोढा यांच्याकडून मंडळांना गॅसची मद

गिरगावच्या ओम श्री सदगुरू साईनाथ मंडळाकडून मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे आभार धार्मिक कार्यात सहकार्याची

Vijaypat Singhania : एका सहीमुळे बदललं विजयपत सिंघानिया यांचं आयुष्य, १२०० कोटींची संपत्ती असतानाही रहावं लागलं भाड्याच्या घरात

मुंबई : पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित, रेमंड ग्रूपचे माजी अध्यक्ष आणि उद्योगविश्वातील दिग्गज व्यक्तिमत्व डॉ.

मुंबईत मूर्तिकारांना निशुल्क मंडप परवानगी, तात्पुरती विनामुल्य जागा

मुंबई: पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सव साजरा करण्यासाठी तसेच मुंबई महानगरात पर्यावरणपूरक मूर्ती घडविण्याकरीता

गारगाईच्या कंत्राटदाराला आणले गुडघ्यावर; महापालिकेच्या स्थायी समितीत उबाठाला जमले नाही ते महायुतीने करून दाखवले

मुंबई: गारगाई नदीवर प्रस्तावित धरण प्रकल्पाच्या कामाच्या प्रस्तावाबाबत स्थायी समिती सदस्यांनी विविध प्रश्न