...म्हणून रोहित आर्यशी बोलले नव्हते माजी मंत्री दीपक केसरकर

मुंबई: मागील आठवड्यात पवईच्या आर.ए. स्टुडिओमध्ये ओलीस ठेवलेल्या मुलांच्या घटनेनंतर सर्वत्रच भीतीदायक वातावरण पसरले आहे. याप्रकरणाबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. ज्यात माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे नाव पुढे आले आहे. या प्रकरणातील आरोपीने एन्काऊंटरच्या आधी दीपक केसरकर यांच्याशी बोलायचे आहे असे पोलिसांना सांगितले. मात्र यावेळी केसरकरांनी नकार दिला होता. याबाबतची सविस्तर माहिती केसरकरांनी दिली आहे.


पवईत तीन तासांहून अधिक वेळ चाललेल्या ओलीस नाट्यादरम्यान घटनेतील मृत आरोपी रोहीत आर्यने पोलिसांना माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले होते. यावेळी एका पोलीस अधिकाऱ्याने केसरकर यांना फोन करून परिस्थितीचा आढावा दिला. मात्र केसरकरांनी रोहीत आर्यसोबत बोलण्यास नकार दिला.




केसरकरांनी रोहीतसोबत बोलण्यास नकार का दिला, याबाबत त्यांनी माहिती दिली आहे. केसरकर यांना जेव्हा पोलिसांचा फोन आला तेव्हा त्यांनी पोलिसांना सांगितले की, "जेव्हा मला कळले की हा मुद्दा थकबाकीशी संबंधित आहे, तेव्हा मी पोलिसांना सांगितले की ज्या विभागाकडे त्यांची थकबाकी प्रलंबित आहे त्या विभागातील संबंधित अधिकाऱ्यांशी रोहीत आर्यचे बोलणे करू द्या. मला कल्पना नव्हती की हे प्रकरण इतके गंभीर होईल." यानंतर झालेल्या चकमकीत रोहीतचा एन्काऊंटर झाला. त्यामुळे या प्रकरणात आता केसरकरांचा अप्रत्यक्षपणे संबंध जोडला गेला आहे.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis On Raj Thackeray : राज ठाकरे इतिहासातील सर्वात मोठ्या पराभवाचे धनी ठरतील; फडणवीसांनी मांडलं पराभवाचं गणित, ठाकरेंच्या 'वारशा'वरही ओढले ताशेरे

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी चक्क त्यांच्या राजकीय

निवडणूक प्रक्रियेत गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई

मुंबई : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ अनुषंगाने गुरुवार, l १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान

मुंबई विद्यापीठात अत्याधुनिक सीओआरएस स्टेशन उभारणार

भारतीय सर्वेक्षण विभागासोबत सामंजस्य करार मुंबई : देशातील भू-स्थानिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण

वांद्र्यांतील रस्ते विकास महामंडळाच्या मुख्यालयावर फेब्रुवारीत हातोडा

पुनर्विकासातून ८ हजार कोटींचा महसूल अपेक्षित मुंबई : वांद्रे रेक्लेमेशन येथील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास

उमेदवारांना अनावश्यक 'एनओसी'ची सक्ती का?

जनहित याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी मुंबई : गरज नसतानाही निवडणूक निर्णय अधिकारी

मुंबईतील काही ठिकाणी मतदान केंद्रांत बदल

राजकीय पक्षांसह उमेदवारांना माहिती देण्याचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांचे निर्देश मुंबई : मुंबई