...म्हणून रोहित आर्यशी बोलले नव्हते माजी मंत्री दीपक केसरकर

मुंबई: मागील आठवड्यात पवईच्या आर.ए. स्टुडिओमध्ये ओलीस ठेवलेल्या मुलांच्या घटनेनंतर सर्वत्रच भीतीदायक वातावरण पसरले आहे. याप्रकरणाबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. ज्यात माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे नाव पुढे आले आहे. या प्रकरणातील आरोपीने एन्काऊंटरच्या आधी दीपक केसरकर यांच्याशी बोलायचे आहे असे पोलिसांना सांगितले. मात्र यावेळी केसरकरांनी नकार दिला होता. याबाबतची सविस्तर माहिती केसरकरांनी दिली आहे.


पवईत तीन तासांहून अधिक वेळ चाललेल्या ओलीस नाट्यादरम्यान घटनेतील मृत आरोपी रोहीत आर्यने पोलिसांना माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले होते. यावेळी एका पोलीस अधिकाऱ्याने केसरकर यांना फोन करून परिस्थितीचा आढावा दिला. मात्र केसरकरांनी रोहीत आर्यसोबत बोलण्यास नकार दिला.




केसरकरांनी रोहीतसोबत बोलण्यास नकार का दिला, याबाबत त्यांनी माहिती दिली आहे. केसरकर यांना जेव्हा पोलिसांचा फोन आला तेव्हा त्यांनी पोलिसांना सांगितले की, "जेव्हा मला कळले की हा मुद्दा थकबाकीशी संबंधित आहे, तेव्हा मी पोलिसांना सांगितले की ज्या विभागाकडे त्यांची थकबाकी प्रलंबित आहे त्या विभागातील संबंधित अधिकाऱ्यांशी रोहीत आर्यचे बोलणे करू द्या. मला कल्पना नव्हती की हे प्रकरण इतके गंभीर होईल." यानंतर झालेल्या चकमकीत रोहीतचा एन्काऊंटर झाला. त्यामुळे या प्रकरणात आता केसरकरांचा अप्रत्यक्षपणे संबंध जोडला गेला आहे.

Comments
Add Comment

RTE अंतर्गत आले दोन लाख ८८ हजार अर्ज

मुंबई : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी राज्यातील दोन लाख ८८ हजारांहून

Rejuvenation of rivers : राज्यातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी स्वतंत्र प्राधिकरणाची स्थापना

मुंबई : राज्यातील नद्यांचे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी आणि नद्यांना पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी राज्य

आर्थिक वर्षाच्या अखेरीस मंत्रालयात 'जीआर'चा पाऊस

चार दिवसांत ९५१ निर्णयांचा धडाका; सुट्ट्यांच्या दिवशीही प्रशासन 'ऑन ड्युटी' मुंबई : आर्थिक वर्षाच्या अखेरीस

Land surveyors : भूकरमापकांना आता वाढीव वेतनश्रेणीसह पदोन्नती

मुंबई : राज्यातील भूकरमापकांना आता वाढीव वेतनश्रेणीसह पदोन्नती मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Navsari : नवसारी येथे असलेल्या उभारणार भव्य क्रीडा संकुल

मुंबई : अमरावती शहरातील क्रीडाप्रेमींसाठी आनंदाची बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज

जैन धर्म हा हिंदू संस्कृतीचाच भाग, अल्पसंख्यांकांमधून बाहेर पडण्याची वेळ - कॅबिनेट मंत्री श्री मंगलप्रभात लोढा

मुघल, इंग्रज आणि तत्कालीन काँग्रेसच्या फोडा आणि राज्य करा नीतीमुळेच हिंदू विभागले : मंत्री लोढा यांचा