भारतातील अस्वच्छ शहरांमध्ये मुंबईचा समावेश, दिल्लीलाही टाकले मागे

मुंबई: स्वच्छता सर्वेक्षण २०२४-२५ च्या अहवालात स्वच्छतेच्या आधारावर भारतातील शहरांचे क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. यात मुंबई सर्वात खालच्या क्रमांकावर असून दहा लाखाहून अधिक लोकसंख्येच्या सर्वात अस्वच्छ शहरात मुंबई ३३ व्या स्थानी आली आहे.


सर्वेक्षण यादीत मदुराई सर्वात खालच्या क्रमांकावर म्हणजे ४०व्या स्थानावर आहे. त्यानंतर लुधियाना (३९), चेन्नई (३८), रांची (३७), बंगळुरु (३६),धनबाद (३५) आणि फरीदाबाद (३४) अशा क्रमाने शहरांची यादी जाहीर केली आहे. तर प्रदुषणात अग्रेसर असलेले दिल्ली स्वच्छतेमध्येपण मागेच आहे. कारण सर्वेक्षण यादीत दिल्ली ३१व्या क्रमांकावर आहे.


अहवालानुसार गुजरातचे अहमदाबाद हे शहर स्वच्छतेच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर भोपाळ, लखनऊ, जयपूर, जबलपूर ही शहरे टॉप फाईव्हमध्ये आहेत. तर हैदराबाद, पिंपरी-चिंचवड, पुणे, विशाखापट्टणम, आग्रा सारखी अन्य शहरे देखील स्वच्छतेच्या यादीत अग्रेसर आहेत.


रँकिंग कशी तयार केली ?


स्वच्छता सर्वेक्षण २०२४-२०२५ मध्ये रँकींगचे अनेक पॅरामीटर निश्चित केले गेले. त्यात साफसफाई, कचरा व्यवस्थापन, सॅनिटेशन, वापर होणाऱ्या पाण्याचे नियोजन, वैद्यकीय कचऱ्याचे नियोजन यांचा समावेश होता. तसेच मूल्यांकनामध्ये निवासी आणि व्यावसायिक विभाग, सार्वजनिक जागा, शाळा, झोपडपट्ट्या, पाण्याचे स्रोत आणि पर्यटन क्षेत्राचा समावेश केला गेला होता.


Comments
Add Comment

BMC : नाना शंकरशेठ यांच्या स्मारक उभारणीची प्रतीक्षा संपली, महापालिका स्वनिधीतून उभारणार स्मारक

बांधकामासाठी कंत्राटदाराची अखेर निवड मुंबई (सचिन धानजी) : आधुनिक मुंबईचे शिल्पकार, शिक्षणप्रेमी आणि समाजसुधारक

BMC : नालेसफाईचे काम १०० टक्के तर मग गाळ आणि कचऱ्याचे तुडुंब नाले भरलेले कसे?

मनसेचे महापालिका गटनेते यशवंत किल्लेदार यांचा सवाल मुंबई (विशेष प्रतिनिधी): सत्ताधारी आणि प्रशासन कितीही ओरडून

BMC News : मुंबईत १,१२४ दुकानांना मराठीतील फलकांची ऍलर्जी

महिनाभरात ३५ हजारांहून अधिक दुकानांच्या तपासणीतून झाले उघड मुंबई : मराठी भाषेतील नामफलक सक्तीच्या

BMC : महापालिकेच्या किती कर्मचाऱ्यांनी अद्यापही जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही

स्थायी समिती सदस्याने केली विचारणा समितीपुढे माहिती सादर करण्याची केली मागणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई

Artificial intelligence (AI) : एआयने शोधली कंत्राटदारांची हातचलाखी

नालेसफाई कामांमध्ये कंपन्यांना ९.२५ कोटी रुपयांचा दंड मुंबई : नाले स्वच्छतेच्या कामात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)

EL Nino : 'अल निनो'मुळे दुष्काळाचा धोका ? पाणी जपून वापरण्याचे हवामान खात्याचे आवाहन

मुंबई : भारतीय हवामान विभागाने व्‍यक्‍त केलेल्‍या अंदाजानुसार यावर्षी एल निनो परिस्थितीचा प्रभाव राहण्‍याची