बिहारमध्ये कमळ फुलणार!

ओपनियन पोलच्या अंदाजानुसार एनडीएचे बिहारमध्ये सरकार


नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा ६ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. १२१ जागांसाठी या टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्याचा प्रचार आता संपला आहे ज्यानंतर ओपिनियन पोल समोर आले आहेत ज्यात पुन्हा एकदा एनडीए सरकार बिहारमध्ये स्थापन होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसंच बिहारमध्ये भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरेल असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.


आयएनएस मॅटराइज म्हटले आहे की, एनडीएला १५३ ते १५६ जागा मिळू शकतात. विरोधी पक्षांच्या महाआघाडीला ७६ ते ८७ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


बिहारमध्ये निवडणुकीचा पहिला टप्पा ६ तारखेला पार पडणार आहे. त्याआधीच ओपनियन पोलचा हा अंदाज समोर आला आहे. जदयूला ६१ ते ६५ जागा मिळतील तर चिराग पासवान यांच्या लोजपाला ४ ते ५ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर हिंदुस्थानी अवाम मोर्चाला या निवडणुकीत ४ ते ५ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.



महाआघाडीला किती जागा मिळतील?


विरोधकांच्या महाआघाडीबाबत ओपिनियन पोलमध्ये जो अंदाज वर्तवण्यात आला आहे त्यानुसार राजदला ६२ ते ६६ जागा मिळतील तर काँग्रेसला ७ ते ९ जागा मिळू शकतात असा अंदाज आहे. तर विकसनशील इन्सान पार्टीला १ ते २ जागा मिळतील असा अंदाज आहे. बिहार निवडणुकीच्या प्रचाराचा रणसंग्राम गेल्या महिन्याभरापासून रंगला आहे. आज प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर ओपिनियन पोलचा अंदाज आला आहे.



इतर पक्षांना किती जागांचा अंदाज?


असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयएमआयएम पक्षाला १ ते २ जागा मिळतील असा अंदाज आहे. प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाला १ ते ३ जागा मिळतील तर अपक्षांना १ ते ४ जागा मिळतील असा अंदाज आहे. आयएनएस मॅटराइजने ओपिनियन पोल घेताना ७३ हजार २८७ लोकांशी चर्चा केली आहे. यामध्ये ३८ हजार १०९, १९ हजार ७८७ महिला आणि १५ हजार ३९० तरुणांचा समावेश होता. या सर्वेच्या अंदाजानुसार एनडीएला १३३ ते १४३ जागा मिळू शकतात. तर महाआघाडीला ९३ ते १०२ जागा मिळू शकतात.

Comments
Add Comment

Gudi Padwa 2026 : गुढीपाडवा, उगादीसह विविध नववर्ष सणानिमित्त पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना गुढीपाडवा, उगादी, चेतीचंद, नवरेह आणि सजिबू

२० हजार लोकांना रोजगार देणारा फॉर्म्युला गृहमंत्री अमित शाहांनी सांगितला; पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करून ४२ दिवसांत ३५ कोटी रुपये कमावले

नवी दिल्ली: पाच कोटींची गुंतवणूक, ३५ कोटींची कमाई! आणि याला फार काळ लोटलेला नाही. इतकेच नाही, तर २०,००० हून अधिक

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या