बिहारमध्ये कमळ फुलणार!

ओपनियन पोलच्या अंदाजानुसार एनडीएचे बिहारमध्ये सरकार


नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा ६ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. १२१ जागांसाठी या टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्याचा प्रचार आता संपला आहे ज्यानंतर ओपिनियन पोल समोर आले आहेत ज्यात पुन्हा एकदा एनडीए सरकार बिहारमध्ये स्थापन होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसंच बिहारमध्ये भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरेल असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.


आयएनएस मॅटराइज म्हटले आहे की, एनडीएला १५३ ते १५६ जागा मिळू शकतात. विरोधी पक्षांच्या महाआघाडीला ७६ ते ८७ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


बिहारमध्ये निवडणुकीचा पहिला टप्पा ६ तारखेला पार पडणार आहे. त्याआधीच ओपनियन पोलचा हा अंदाज समोर आला आहे. जदयूला ६१ ते ६५ जागा मिळतील तर चिराग पासवान यांच्या लोजपाला ४ ते ५ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर हिंदुस्थानी अवाम मोर्चाला या निवडणुकीत ४ ते ५ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.



महाआघाडीला किती जागा मिळतील?


विरोधकांच्या महाआघाडीबाबत ओपिनियन पोलमध्ये जो अंदाज वर्तवण्यात आला आहे त्यानुसार राजदला ६२ ते ६६ जागा मिळतील तर काँग्रेसला ७ ते ९ जागा मिळू शकतात असा अंदाज आहे. तर विकसनशील इन्सान पार्टीला १ ते २ जागा मिळतील असा अंदाज आहे. बिहार निवडणुकीच्या प्रचाराचा रणसंग्राम गेल्या महिन्याभरापासून रंगला आहे. आज प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर ओपिनियन पोलचा अंदाज आला आहे.



इतर पक्षांना किती जागांचा अंदाज?


असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयएमआयएम पक्षाला १ ते २ जागा मिळतील असा अंदाज आहे. प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाला १ ते ३ जागा मिळतील तर अपक्षांना १ ते ४ जागा मिळतील असा अंदाज आहे. आयएनएस मॅटराइजने ओपिनियन पोल घेताना ७३ हजार २८७ लोकांशी चर्चा केली आहे. यामध्ये ३८ हजार १०९, १९ हजार ७८७ महिला आणि १५ हजार ३९० तरुणांचा समावेश होता. या सर्वेच्या अंदाजानुसार एनडीएला १३३ ते १४३ जागा मिळू शकतात. तर महाआघाडीला ९३ ते १०२ जागा मिळू शकतात.

Comments
Add Comment

भारत-ओमानची मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी

करारामुळे द्विपक्षीय संबंधांना नवी ऊर्जा मस्कत : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुलतान हैथम बिन तारिक यांच्याशी

IND vs SA : संजूचा नादच खुळा! १००० धावांचा टप्पा पार करत अभिषेक-सूर्याच्या पंगतीत पटकावले स्थान

भारतीय संघाचा धडाकेबाज सलामीवीर संजू सॅमसनने दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या शेवटच्या टी-२० सामन्यात आपल्या

पंतप्रधान येत्या २० आणि २१ डिसेंबरला आसाम दौऱ्यावर

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २० आणि २१  डिसेंबरला आसामला भेट देणार आहेत. दिनांक २० डिसेंबर रोजी दुपारी ३

SIR तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा पश्चिम बंगाल दौरा, ३२०० कोटींचे प्रकल्प सुरू

मुंबई : सध्या पश्चिम बंगालमध्ये SIR मुद्द्यावरून तणावपूर्ण वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारताला मोठ्या लढाईत गुंतवून ठेवण्याचा डाव ?

कोलकाता : बांगलादेशमध्ये एकीकडे जमिनीवर भारतविरोधी आंदोलनांना धार येत असतानाच, दुसरीकडे समुद्रातही तणाव

ओला-उबरला टक्कर; १ जानेवारीपासून भारत टॅक्सी ॲप सुरू होणार

मुंबई : प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे ती म्हणजे, ओला आणि उबरसारख्या खासगी टॅक्सी सेवांना पर्याय ठरणारे भारत