जंजिरा किल्ला तब्बल नऊ दिवसांनी पर्यटकांसाठी झाला खुला

मुरुड : मुरुड जंजिरा किल्ला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची मांदियाळी येत असते. अचानक हवामानात बदल झाल्यामुळे शिडाच्या बोटी बंद करण्याचा निर्णय बंदर खात्याने घेतला. त्यामुळे जंजिरा किल्ला नऊ दिवस बंद होता. यामुळे आलेल्या लाखो पर्यटकांना किल्ल्या पाहण्यास न मिळाल्याने हिरमोड झाल्याचे पाहायला मिळाले. अखेर तब्बल नऊ दिवसांनी पर्यटकांना जंजिरा किल्ला पाहण्यासाठी खुला झाला आहे, असे पुरातत्व विभागाचे बहुउद्देशीय कर्मचारी प्रकाश घुगरे यांनी सांगितले.


रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील राजपुरी येथे असलेला जगप्रसिद्ध जंजिरा किल्ला पाहण्यासाठी दिवाळी सुट्टीतील वीकेंडला पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. परंतु हवामान खात्याने दिलेल्या इशारतानुसार, अचानक हवामानात बदल घडून आले व समुद्रातील हवेने वेग धरला. त्यामुळे शिडाच्या बोटी समुद्रात चालवणे अवघड होऊ लागले. पर्यटकांना कोणत्याही प्रकारचा धोका उद्भवू नये म्हणून त्यांच्या सुरक्षेसाठी बंदर विभागाने बोटी बंद करण्याचा निर्णय घेतला.


मुंबई, ठाणेसह राज्यातला अनेक जिल्ह्यातून व महाराष्ट्राबाहेरून सुद्धा पर्यटक मोठ्या प्रमाणात आलेले दिसून येत होते. या आलेल्या पर्यटकांच्या आनंदावर हवामानाने अचानक विरजन टाकले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटकांची हिरमोड झाल्याचे दिसून आले. दिनांक ०३ नोव्हेंबर रोजी बोटी सुरु करण्यात आल्याने तब्बल नऊ दिवसांनी पर्यटकांना किल्ला पाहण्यासाठी सुरू केला आहे.


या किल्ल्याच्या मागील बाजूस ब्रेक वॉटर बंधारा टाकून त्या ठिकाणी जेट्टी उभारण्यात आलेले आहे. ती लवकरात लवकर सुरू करावी जेणेकरून पर्यटकांना सुरक्षित किल्ला पाहता येईल, अशी मागणी पर्यटकांमधून व स्थानिकांमधून जोर धरत आहे.

Comments
Add Comment

जगभरातील बालमृत्यूच्या घटनांमध्ये भारत दुसऱ्या स्थानी

नवी दिल्ली : जगभरात जवळपास १० लाख मुले पाच वर्षांचे वय गाठण्याआधीच मृत्युमुखी पडली. कुपोषणाशी संबंधित घटक-जसे की

अमेरिकेसाठी होणार सोशल मीडिया खात्यांची तपासणी; १५ डिसेंबरपासून नियम

न्यूयॉर्क : अमेरिकेत जायचे असेल, तर सोशल मीडियावर जपून पोस्ट करणे गरजेचे आहे. कारण, अमेरिकन व्हिसा मिळवताना सोशल

'बब्बर खालसा'ला ब्रिटन सरकारचा दणका

लंडन  : खलिस्तानवादी दहशतवादी संघटना बब्बर खालसाच्या आर्थिक नाड्या आवळल्यास ब्रिटन सरकारने सुरुवात केली. या

२००९ पासून अमेरिकेतून १८,८२२ भारतीय हद्दपार

मंत्री एस. जयशंकर यांची राज्यसभेत माहिती नवी दिल्ली : अमेरिकेने २००९ पासून एकूण १८,८२२ भारतीय नागरिकांना हद्दपार

अंदमान येथे होणार स्वा. सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण

अंदमान : अंदमान येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी रचलेल्या ‘सागरा प्राण तळमळला’ या अजरामर गीताला

ठाणे घोडबंदर रोडवर आज वाहतूक कोंडीची शक्यता

दुरुस्तीच्या कामांमुळे जड वाहनांना प्रवेशबंदी ठाणे : ठाण्याचा घोडबंदर रोडवर उद्या (ता. ७) मोठ्या प्रमाणात वाहतूक