केवळ लग्नास नकार देणे भारतीय न्याय संिहतेनुसार अात्महत्येस चिथावणी ठरत नाही: सर्वोच्च न्यायालय

पुरुषाविरुद्ध आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा खटला रद्द


नवी दिल्ली : "एका तरुणीने आपले जीवन संपवण्याचे टोकाचे पाऊल उचलले हे खूप दुःखद आहे. तिला कदाचित वाईट वाटले असेल. एकासंवेदनशील क्षणी तिने जीवन संपविण्याचा निर्णय घेतला. तथापि, न्यायाधीश म्हणून, आम्ही रेकॉर्डवरील पुराव्यांच्या आधारे प्रकरणाचा निर्णय घेण्यास बांधील आहोत," असे निरीक्षण नोंदवत केवळ लग्न करण्यास नकार देणे आयपीसीच्या कलम १०७ अंतर्गत स्पष्ट केल्याप्रमाणे जीवन संपविण्यास प्रवृत्त करणे नव्हे," असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच एका व्यक्तीने विवाहास नकार दिल्याने एका महिलेने जीवन संपविल्याप्रकरणी पुरुषाविरुद्ध आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा खटलाही न्यायालयाने रद्द केला.


महिलेने आत्महत्याप्रकरणी २०१६ मध्ये अमृतसरच्या छेहरता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. महिलेच्या आईने आरोप केला होता की, सरकारी वकील असणाऱ्या या मुलीने विषप्राशन करून जीवन संपवले. याचिकाकर्त्याने तिच्याशी लग्न करण्याचे वचन दिले होते; परंतु नंतर त्याने लग्नास नकार देत विश्वासघात केला. यामुळेच महिलेने जीवन संपवले. या प्रकरणी आयपीसीच्या कलम ३०६ अंतर्गत त्याच्याविरुद्ध दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यास पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने नकार दिल्याच्या निर्णयाला संशयित आरोपीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
निपुण अनेजा विरुद्ध उत्तर प्रदेश राज्य या प्रकरणातील मागील निकालांचा हवाला देण्यात आला.

Comments
Add Comment

लाल किल्ला स्फोट प्रकरणी एनआयएच्या तपासातून हाती आली धक्कादायक माहिती, २०२३ पासूनचा दहशतवाद्यांचा कट उघड

नवी दिल्ली : दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्याबाहेर झालेल्या कार स्फोटाच्या तपासात महत्वाची माहिती समोर आली

प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुले हवीतच; चंद्राबाबू नायडूंचं विधान चर्चेत

तिरुपती : तिरुपती येथे झालेल्या एका कार्यक्रमात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी

वाढदिवसाची पार्टी, धुम्रपानास जबरदस्ती अन् कारमध्ये बलात्कार!

उदयपूरमधील आयटी कंपनीच्या मॅनेजरची 'ती' काळरात्र उदयपूर: राजस्थानमधील उदयपूर येथे एका खाजगी आयटी कंपनीच्या

भारतीय जॉब मार्केटची विक्रमी झेप; 'एआय'मुळे भरती प्रक्रियेला वेग

९ कोटींहून अधिक जॉब अॅप्लिकेशनची नोंद नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आणि रोजगार बाजारपेठेसाठी २०२५ हे

शाळांमध्ये सकाळचा नाश्ता देण्याची केंद्राची सूचना

शिक्षणासोबत पोषणावर भर नवी दिल्ली : शालेय विद्यार्थ्यांना संतुलित व पुरेसे पोषण मिळावे, या उद्देशाने केंद्र

‘जेन-झी’वर माझा विश्वास : पंतप्रधान मोदी

भारताचा ‘विकसित राष्ट्राचा’ निर्धार याच मुलांच्या हाती नवी दिल्ली : जेन-झी पिढीच्या मुलांवर माझा विश्वास असून,