Coastal Road : २४ तास खुला, पण 'सुरक्षित' नाही! वरळी-वांद्रे सी लिंक दरम्यान पथदिवे बंद; मुंबईकर प्रशासनावर नाराज

मुंबई : मुंबईतील कोस्टल रोड (Coastal Road) वाहतुकीसाठी २४ तास खुला (24 Hours Open) झाल्यानंतर त्यावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, या वाढलेल्या वर्दळीसोबतच या मार्गावरच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. कोस्टल रोडवर अनेक ठिकाणी अनियंत्रित वेगमर्यादेमुळे अपघाताची काही प्रकरणे घडली आहेत. या गंभीर परिस्थितीत, वरळी (Worli) ते वांद्रे सी लिंक (Bandra Sea Link) दरम्यान असलेल्या मार्गावरील खांबांवरील पथदिवे वारंवार बंद राहत आहेत. यामुळे वाहनचालकांना संपूर्ण अंधारातून प्रवास करावा लागत आहे. पथदिवे बंद असल्याने आणि वेगमर्यादेवर नियंत्रण नसल्यामुळे गंभीर अपघात होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन मार्गावरील दिवे सुरू करण्याची आणि वेगमर्यादेचे नियम काटेकोरपणे पाळण्याची मागणी नागरिक करत आहेत.



कोस्टल रोडवर वेगाचे उल्लंघन आणि अंधार; मुंबईकरांचा संताप


दरम्यान कोस्टल रोडवरील दिवे बंद असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. एका प्रवाशाने सोशल मीडियावरुन या गंभीर समस्येबाबत तक्रार केली आहे. या पार्श्वभूमीवर, मुंबईकरांनी प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. कोस्टल रोडच्या उभारणीसाठी तब्बल १४ हजार कोटी रुपये (₹14,000 Crore) खर्च करूनही प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असेल, तर विजेच्या खांबांसाठी मुंबईकरांनी आपल्या खिशातून पैसे द्यायचे का? असा संतप्त सवाल मुंबईकरांनी उपस्थित केला आहे. कोस्टल रोड सुरू झाल्यापासून सप्टेंबरपर्यंत आठ हजारांहून अधिक वाहनांनी वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. विशेषतः, बोगद्यात वाहनांचा वेग ताशी १४१ ते १४७ किमीपर्यंत पोहोचल्याचे उघड झाले आहे. भरधाव वेग आणि कोस्टलवरील वळणांच्या मार्गावर असलेला अंधार, यामुळे भविष्यात अपघातांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने तातडीने दिव्यांची समस्या सोडवावी आणि वेगमर्यादेवर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी जोर धरत आहे.



कोस्टल रोडवरील भुयारी मार्गातही अंधार! नागरिकांना मोबाईलचा आधार


मुंबईकरांना समुद्राचे सौंदर्य जवळून न्याहाळता यावे म्हणून महानगरपालिकेने (BMC) कोस्टल रोडवर प्रोमेनाड खुला करून दिला आहे. मात्र, कोस्टल रोडप्रमाणेच, त्यावर जाण्यासाठी बांधलेल्या पादचारी भुयारी मार्गातही अंधार असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. भुयारी मार्गातून प्रवास करताना नागरिकांना मोबाईलच्या लाईटचा वापर करावा लागत आहे. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. ऑक्टोबर महिन्यात कोस्टल रोडवर वेगमर्यादेचे उल्लंघन करत एक कार संरक्षक कठडा तोडून थेट समुद्रात कोसळल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत रोडच्या लोखंडी रेलिंगचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीबद्दल पालिकेने संबंधित तरुणाला दोन लाख ६५ हजार रुपये नुकसानभरपाई भरण्यासाठी पत्र पाठवले आहे. कोस्टल रोडवर दिवे बंद असणे आणि पादचारी मार्गातही अंधार असणे, ही बाब १४ हजार कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या या प्रकल्पाच्या व्यवस्थापनावर मोठी टीका करणारी आहे.

Comments
Add Comment

Minister Adv. Ashish Shelar : पुन्हा अतिक्रमणे वाढून देऊ नका; मुंबई उपनगर पालकमंत्री अँड आशिष शेलार यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेत आज उपनगर जिल्ह्यातील शासकीय

Cyber Police : बदलत्या काळातील गुन्ह्यांचे आव्हान स्वीकारण्यासाठी सज्ज होत काम करण्याची गरज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

३६ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा-२०२६ चा समारोप मुंबई  : महाराष्ट्र पोलीस दलाने बदलत्या काळातील

Legislature's security system : विधिमंडळाच्या सुरक्षा यंत्रणेत होणार मोठे बदल

सभापती राम शिंदेंनी दिले निर्देश; संसदीय आयुधांचा गैरवापर टाळण्यासाठी विशेष उपाययोजना मुंबई : विधिमंडळ

Shree Kshetra Chondi Development Plan : चोंडीच्या नियोजनबद्ध विकासातून पर्यटनाला चालना मिळणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

• पर्यटकांसाठी दर्जेदार सुविधा उभाराव्यात • श्री क्षेत्र चोंडी विकास आराखडा आढावा बैठक मुंबई  : पुण्यश्लोक

Central Railway News : मध्य रेल्वे मार्गावर कोणताही व्यत्यय न आणता मेट्रो लाईन 2ब वरील महत्त्वपूर्ण स्टील स्पॅन उभारणी पूर्ण

कुर्ला ते टिळक नगर रेल्वे ट्रॅक दरम्यान 41.5 मीटर लांबीचा, 178 टन वजनाचा स्ट्रक्चर मुंबई :  मुंबई महानगर प्रदेश विकास

Thane Zilla Parishad : ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मुलं आता अवकाशाच्या दिशेने; ‘मिशन भरारी’ उपक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवला हिरवा झेंडा

59 ग्रामीण विद्यार्थ्यांची 'इस्रो' सफर; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘ग्रामीण ते अवकाश’ व्हिजन ठाणे जिल्हा